शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा कर्मचाऱ्यांवर न.पं.चा कारभार

By admin | Updated: April 10, 2017 01:14 IST

शासनाने तालुका स्तरावरील संपूर्ण ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा दिला. २१ नोव्हेंबर २०१५ ला अर्जुनी नगर पंचायत उदयास आली.

दीड वर्षात कामे शून्य : प्रभारी मुख्याधिकारी नॉट रिचेबल अर्जुनी-मोरगाव : शासनाने तालुका स्तरावरील संपूर्ण ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा दिला. २१ नोव्हेंबर २०१५ ला अर्जुनी नगर पंचायत उदयास आली. नगर पंचायत अस्तित्वात आल्याने नगराचा कायापालट होईल. सर्वांगीण विकास होईल, ही अपेक्षा प्रत्येकाची होती. परंतु सहा कर्मचाऱ्यांवर नगर पंचायतचा कारभार सुरू असून दीड वर्षात कामे शून्य आहेत.गेल्या दीड वर्षात नाल्यांची सफाई व दिवाबत्ती व्यतिरिक्त न.पं. ने काहीही केलेले नाही. त्यामुळे नगरवासीयांचा भ्रमनिराश झाला आहे. न.पं.चा संपूर्ण कारभार सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. एवढेच नाही तर गोरेगाव नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे येथील प्रभार आहे. सोबतच सडक-अर्जुनी येथीलही कामकाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ अशी अवस्था झाली आहे. आकृतीबंधानुसार येथे वीज कर्मचाऱ्यांची गरज आहे. यामध्ये जुन्या कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्ती करावयाची होती; मात्र पदाधिकाऱ्यांनी कारवाईच केली. जुन्या कर्मचाऱ्यांना दोनदा सर्वसामान्य सभेत कायम करून नवीन नियुक्ती करण्याची विनंती केली. अद्यापही ही मागणी प्रलंबित आहे. येथे तीन स्थायी व तीन अस्थायी कर्मचारी, अशा सहा कर्मचाऱ्यांना कर वसुली, कार्यालयीन कामे, फेरफाराची कामे, स्वच्छतालयांची कामे, एवढेच नव्हे तर कॅशबुक, प्रोसिडींग लिहिणे, माहिती अधिकाराची माहिती देण्याचेही काम करावे लागतात. मात्र पगार त्यांना ग्रामपंचायत काळातील १५० रूपये प्रमाणेच दिला जातो. पगारवाढीबद्दलही सर्वसामान्य सभेत कर्मचाऱ्यांनी अर्ज केला. मात्र अजूनही यावर तोडगा निघाला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. आकृतीबंधानुसार पुरेसे कर्मचारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. अल्प मजुरीमुळे कर्मचारी त्रस्त आहेत. अपुरी कर्मचारी संस्था, अल्पवेतन व कामाचा ताण यामुळे नागरी सेवा, सुविधा व कार्यालयीन कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. मुख्याधिकारी नसल्याने नगरवासीयांच्या कामांचा खोळंबा होत आहे. घर बांधणी, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच नागरिकांना लागणारे विविध कार्यालयीन दाखले वेळेवर मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या विधानसभा क्षेत्राला मंत्रिपद मिळाले आहे. नागरिकांनी न.पं.च्या अवस्थेला पूर्ववत करण्यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढाकार घ्यावे, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)- नागरिकांच्या अनेक समस्याउन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी हॅन्डपंपची मागणी आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डासजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे. आरोग्य विभाग व न.पं.ने डास निर्मूलन मोहीम राबवावे, अशी मागणी आहे. नगरातील कित्येक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. माता माऊली रोड, अष्टविनायक नगर, शिक्षक कॉलनी, सिव्हील लाईन, गणेश नगर येथे पक्क्या रस्त्यांची मागणी आहे.रात्रीला कित्येक प्रभागांमध्ये पथदिवे बंद नसल्याची ओरड आहे. बाजार वाडीतील हॅन्डपंप अनेक दिवसांपासून नादुरूस्त असल्याची माहिती आहे. गावतलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरण कधी होणार? गणेश नगर येथील शेकडो वर्षे जुन्या बोळीचे खोलीकरण करून तिथे होणारे अतिक्रमण थांबविण्याची मागणी नागरिक करीत आहे. शासनाने येथील कर्मचारी पदभरती व कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्तीची कामे तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे.