शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सर, तुम्हीच सांगा, आम्ही शौचालयात कसं जायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

पाण्याचा वेढा असलेली ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगावच्या बरडटोली येथे आहे. गेल्या १४ वर्षांपासून याच स्थितीत विद्यार्थी अध्ययन करत आहेत. आजतागायत अनेक अधिकारी, पदाधिकारी होऊन गेलेत मात्र त्यांना या शाळेविषयी कळवळा येऊ नये याचे नवल वाटते. प्रशासन कदाचित एखाद्या दुर्घटनेची वाट तर बघत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. अखेर साहेब तुम्हीच सांगा, आम्ही शौचालयात कसं जायचं अशी विद्यार्थ्यांनी आर्त हाक दिली आहे.

संतोष बुकावन लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शाळेचा दर्शनी भाग टापटीप, सभोवतालचा परिसर कोण बघतोय, शाळेच्या सभोवताली पाणीच पाणी. पाण्याचा वेढा असलेली ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगावच्या बरडटोली येथे आहे. गेल्या १४ वर्षांपासून याच स्थितीत विद्यार्थी अध्ययन करत आहेत. आजतागायत अनेक अधिकारी, पदाधिकारी होऊन गेलेत मात्र त्यांना या शाळेविषयी कळवळा येऊ नये याचे नवल वाटते. प्रशासन कदाचित एखाद्या दुर्घटनेची वाट तर बघत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. अखेर साहेब तुम्हीच सांगा, आम्ही शौचालयात कसं जायचं अशी विद्यार्थ्यांनी आर्त हाक दिली आहे.बरडटोली येथील प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ पर्यंतचे वर्ग भरतात. या शाळेत ४६ चिमुकले शिक्षण घेत आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत कॉन्व्हेंटचे वर्ग सुद्धा येथे भरतात. बरडटोलीच्या प्राथमिक शाळेजवळ इटियाडोह धरणाचा मोठा कालवा आहे. कालव्याचे पाणी झिरपून  शाळेमागील खड्ड्यात साचते. शाळेच्या आवार भिंतीतून शाळेच्या मागील भागात पसरते. हा प्रकार कालव्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह बंद केल्यानंतर घडतो. यामुळे इमारत व आवार भिंतीला धोका संभवतो. इमारतीच्या धोक्यामुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

१४ वर्षांपासून शिक्षण विभाग निद्रावस्थेत- शौचालयाच्या सभोवताली पाणी साचलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना शौचालयात ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण होतो. शाळेची इमारत उतारावर  असल्याने पावसाळ्यात चिलाबोडीचे पाणी शाळेच्या दर्शनी भागात सुद्धा जमा होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात कुठलीच ठोस उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर कुंभकर्णी निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनाला जाग येईल का, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

यापेक्षा दुर्दैव कोणते - आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. पुरोगामी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीचे गोडवे मोठ्या गौरवाने गायले जातात. नव्हे हे युग शिक्षणाचे असल्याचे म्हटले जाते. शाळा आहे, शिक्षण नाही. शिक्षण केवळ कागदोपत्री आहे ही बाब सर्वश्रुत आहे. शिक्षण तर सोडाच पण, आपण शिक्षणासाठी पाठविलेले बाळ शाळेत तरी सुरक्षित आहे का, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. यात शिक्षकांचा मुळीच दोष नाही. दोष आहे व्यवस्थेचा. चिमुकल्यांना जीव मुठीत ठेऊन शौचालयात जावे लागते यापेक्षा दुर्दैव कोणते?

 

टॅग्स :Schoolशाळा