शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

साहेब... पॅसेंजर, लोकल केव्हा येणार रुळावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

सुरेंद्र भांडारकर मुंडीकोटा : हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. जिल्ह्यात सर्वत्र रेल्वेचे जाळे पसरले असल्याने प्रवाशांच्या ...

सुरेंद्र भांडारकर

मुंडीकोटा : हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक प्रमुख रेल्वेस्थानक आहे. जिल्ह्यात सर्वत्र रेल्वेचे जाळे पसरले असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे ही सोयीची आहे. शिवाय तिकीटदरही फारच कमी आहेत; त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ते सोयीचे होते. पण कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या रुळांवर आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बसने अतिरिक्त भाडे माेजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ‘साहेब, पॅसेंजर आणि लोकल गाड्या केव्हा रुळांवर येणार?’ असा सवाल प्रवासी रेल्वे विभागाला करीत आहेत.

आता सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळेच रेल्वे विभागाने काही विशेष आणि एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या आहेत; पण मागील दीड वर्षापासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची अडचण कायम आहे. लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अद्यापही प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. मात्र पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, नागरिकही आता स्वत:ची काळजी घेत आहेत. रेल्वे विभागाने एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या असून पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मदत होऊन आर्थिक भुर्दंड बसणार नाही. गाड्या बंद असल्यामुळे गोरगरीब प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांची अडचण आणि त्यांना बसणारा भुर्दंड लक्षात घेता,पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्याची गरज आहे.

.......

प्रवाशांच्या खिशावरील वाढला भार

जवळपास दीड वर्षापासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद आहेत. गोंदिया ते चंद्रपूर या अंतरासाठी रेल्वे प्रवाशांना केवळ ४० रुपये प्रवास भाडे लागत होते; तर गोंदिया ते तिरोडा १० रुपये, गोंदिया ते बालाघाट १५ रुपये, गोंदिया ते दुर्ग ५० रुपये प्रवासभाडे लागत होते. पण आता गोंदिया-चंद्रपूरसाठी बसने ३०० रुपये तिकिटासाठी मोजावे लागत आहेत; त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे.

...........

पैसे आणि वेळेचाही अपव्यय

बसपेक्षा रेल्वेने कुठेही जलदगतीने प्रवास करता येतो. मात्र आता लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांना तिकिटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत; त्यामुळे पैसे आणि वेळेचाही अपव्यय होत होता.

........

या गाड्या केव्हा होणार सुरू

गोंदिया- बल्लारशा चांदाफोर्ट

गोंदिया- जबलपूर

गोंदिया- बालाघाट

गोंदिया - इतवारी

गोंदिया - दुर्ग

.........................

कोट

पॅसेंजर किंवा लोकल गाड्या सुरू करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्यापही कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत; त्यामुळे या गाड्या केव्हा सुरू होणार, हे अद्यापही सांगता येणार नाही.

- ए. के. राय, जनसंपर्क अधिकारी.

.........