शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

साहेब, जरा इकडेही लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:43 IST

ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पण काही शिक्षकांचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा यामुळे शैक्षणिक दर्जा कमकुवत होत चालला आहे.

ठळक मुद्देशिक्षक मस्त, अधिकारी सुस्त : तालुक्याचा शिक्षण विभाग रामभरोसे

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पण काही शिक्षकांचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा यामुळे शैक्षणिक दर्जा कमकुवत होत चालला आहे. याकडे गटशिक्षणाधिकारी सर्याम यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या ११३ आहे. तर तालुक्यात कोकणा (जमि), चिखली, डोंगरगाव (डेपो), शेंडा, पांढरी, डव्वा, कोसमतोंडी, सौंदड या नऊ केंद्रांचा समावेश आहे. यात विद्यार्थी संख्या ७ हजार ५०३ आहे. मुलांच्या विद्यार्जनासाठी ३९२ शिक्षकांची नियुक्ती केली आहे.विद्यार्थ्यांना विद्यार्जनाचे धडे उत्तमप्रकारे दिले जावे यासाठी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. गटशिक्षणाधिकारी म्हणून सर्याम कार्यरत आहेत. सदर अधिकारी सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये रूजू झाले त्यावेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणताही शिक्षक तालुक्यात इतरत्र फिरताना दिसत नव्हता. पण सध्या अधिकाºयांच्या दुर्लक्षीतपणामुळे तालुक्याच्या शैक्षणिक दर्जा खालावत चालल्याचा पालकांचा आरोप आहे. तालुक्यातील १८ ते १५ किमी अंतरावरील शाळेत जावून बघितल्यास आढळते.राजाच तसा तर प्रजा कशी राहणार? असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही अधिकारी दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील काही शाळांतील शिक्षक लाखनी, भंडारा, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, गोंदिया, साकोली, देवरी या ठिकाणावरुन अप-डाऊन करतात. याचे प्रत्यक्ष उदाहरण सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा बसस्थानकावर पहावयास मिळते. पण कुणीही अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. स्वत:च्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अशी अवस्था झाली आहे.तालुक्यातील जवळजवळ सर्वच शाळा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास तसेच मद्यपान व धुम्रपान करण्यास मनाई आहे. तसे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सूचना फलक लावण्यात आले आहे. पण बहुतेक शाळेचे शिक्षकच खर्रा घेवून शाळेत येत असल्याचे पाल्य आपल्या पालकांना सांगतात. त्यामुळे या नियमाचा देखील शाळा परिसरात फज्जा उडत आहे.शाळेत जाण्यापूर्वी रोज दोन खर्रे (पार्सल) शाळेत नेले जातात. पानठेलेवाले १० वाजताच खर्रा तयार ठेवतात. शिक्षकच खर्रा शाळेत खात असतील तर त्याचा वाईट परिणाम मुलांवर होईल. नुसते सूचना फलक लावून होणार नाही. त्याचे पालन खºया अर्थाने होते काय, याकडे अधिकाºयांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.