शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

साहेब, आमचेही कर्ज माफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:11 IST

एकीकडे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले असल्याच्या गवगवा करीत आहे. परंतु मागील २० वर्षांपासून आपल्यावरील कर्ज माफ करुन द्या म्हणून सतत शासनाच्या प्रतिनिधींकडे पायपीट करीत असलेले तालुक्यातील ग्राम कुणबीटोला येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देकुणबीटोला येथील शेतकऱ्यांची आर्त हाक : २९ शेतकऱ्यांची २० वर्षांपासून पायपीट

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एकीकडे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले असल्याच्या गवगवा करीत आहे. परंतु मागील २० वर्षांपासून आपल्यावरील कर्ज माफ करुन द्या म्हणून सतत शासनाच्या प्रतिनिधींकडे पायपीट करीत असलेले तालुक्यातील ग्राम कुणबीटोला येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तरिही त्या २९ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. ‘साहेब आमचे ही कर्ज माफ करुन द्या’ म्हणत वाटेल त्यांच्याकडे जाऊन आर्त हाक लावत आहेत. परंतु त्यांच्या हाकेला शासन व शासनाचे प्रतिनिधी कानाडोळा करुन बसले आहेत.तालुक्यातील गोवारीटोला-कुणबीटोला हे गाव वरथेंबी पावसावर अवलंबीत असून या गावात सिंचनाचे कोणतेही साधन नसल्याने वर्षानुवर्षे येथील शेतकरी तोट्याची शेती करीत आहेत. आपल्या गावातही सिंचनाचे साधन व्हावे अशी त्यांची नेहमी इच्छा राहिली. परंतु हे गाव सरासरी पातळी पेक्षा उंचावर असल्याने कालव्याचे साधन सुद्धा करता आले नाही. सन १९९६ मध्ये युती शासनात पाटबंधारे मंत्री असलेले क्षेत्रीय आमदार महादेवराव शिवणकर यांच्याशी संपर्क करुन येथील शेतकऱ्यांनी गावात सिंचनाची सोय करुन देण्याची विनवणी केली. तेव्हा शिवणकर यांनी उपसा सिंचन योजना गावात आणून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या निर्देशानुसार, येथील एकूण २९ शेतकरी एकत्र झाले आणि भागीरथ पाणी पुरवठा संस्था स्थापित केली.पाणी पुरवठा योजना (उपसा सिंचन योजना) स्थापित करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून १३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केली. यासाठी सर्व शेतकºयांनी आपली एकूण ६९ एकर जमीन गहाण ठेवली. घेतलेल्या कर्जाच्या रकमेतून ब्राम्हणटोला गावाजवळून वाहणाऱ्या पुजारीटोला धरणाच्या कालव्यावर प्रत्येकी १० एचपी क्षमतेचे दोन वीज पंप स्थापित करण्यात आले. तिथून गोवारीटोला-कुणबीटोला पर्यंत पाईप लाईन भूमिगत पद्धतीने टाकण्यात आली. सर्व २९ शेतकऱ्यांच्या ६९ एकर जमिनीला सिंचन होईल अशी व्यवस्था करण्यात आली. योजना तर सुरु झाली परंतु खंडीत वीज पुरवठा व अधून-मधून कालव्यात पाणी बंद राहणे यामुळे पुरेसे पाणी शेतीला मिळणे अशक्य झाले. खरीप हंगामात दोन वर्ष व्यवस्थीत पाणी मिळाले परंतु कर्जाची परतफेड होईल एवढे उत्पादन शेतकºयांना मिळाले नाही. अशात उन्हाळी धानपीक टाकण्याचे सुद्धा काही शेतकºयांनी ठरवले. परंतु मुरमाडी व रेताळ स्वरुपाची शेतजमीन असल्याने पाण्याची पूर्तता करणे शक्य झाले नाही.त्यात नियमित वीज पुरवठा नसल्याने सतत पंप सुरु ठेवता येत नव्हते व दोन तीन वर्षानंतर खरीप हंगामात सुद्धा पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले. अनेकवेळा पाण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये वाद ही होऊ लागले. अशात सिंचन योजना अपयशी ठरली व मागील २० वर्षांपासून ही योजना कायमची बंद पडून आहे. पुन्हा शेतकरी वरथेंबी पावसावर अवलंबित झाले. त्यामुळे कर्जाची परतफेड मुळीच शक्य झाले नाही. एक एकर- दोन एकर अशी शेत जमीन असलेले छोटे व गरीब शेतकरी घेतलेले कर्ज कसे परत करतील असा प्रश्न निर्माण झाला आणि शासनाकडे कर्ज माफीची मागणी करु लागले. परंतु या शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी कोणीही पुढाकार घेताना दिसला नाही. योजना बंद झाल्यापासून कर्जमाफीची मागणी करताकरता चार वेळा राज्याचे सरकार बदलले. परंतु या शेतकºयांच्या कर्ज माफीकडे जातीने लक्ष देण्यात आले नाही.योजनेचे साहित्य झाले अस्ताव्यस्तवीज बिल भरण्यास असमर्थ झाल्याने वीज जोडणी कापण्यात आली. पंप सतत बंद पडून असल्याने बिघडले. पाईपलाईनची अनेक ठिकाणी तुटफूट झाली. अशात योजना पूर्ववत करणे म्हणजे लाखोंचा निधी खर्च करावा लागेल असे झाले. तरी सर्व शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पोहचेल याची शाश्वती. नाही कारण मुरमाड जमीन सतत पाणी सोखत असून प्रत्येकाच्या शेतीला सतत पाणी पुरवठा करणे शक्य नाही.कर्जाचा डोंगर वाढत चाललाउपसा सिंचन योजना लावण्यासाठी संस्थेची स्थापना करुन त्यावेळी १३ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. आता त्या कर्जाला व्याजाची रक्कम जोडून एकूण कर्ज तीन पटीने वाढले आहे. अशात त्या गरीब शेतकऱ्यांना परतफेड करणे मुळीच शक्य नसून शासनाने छत्रपती शिवाजी कर्जमाफी योजनेंतर्गत या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा असा आग्रह संबंधीत भागीरथ पाणी पुरवठा योजनेचे सर्व २९ शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज