शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन जिल्ह्यांसाठी एकच नवोदय

By admin | Updated: September 2, 2014 23:51 IST

माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय यानुसार झाली. ही निवासी शाळा गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना

फटका : गुणवंतांची परवडदिलीप वाघमारे - बिजेपारमाजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय यानुसार झाली. ही निवासी शाळा गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना उच्च व शहरातील नामवंत शाळेच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी अस्तित्वात आली. परंतू भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी अजूनही एकच नवोदय विद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सन १९८६ मध्ये पहिले प्रायोगिक तत्वावरील जवाहर नवोदय विद्यालय महाराष्ट्राच्या अमरावती व राजस्थानच्या झंझर येथे सुरू केले होते. या यशस्वी प्रयोगानंतर भारताच्या सर्व राज्यात प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय स्थापन करण्याचे लक्ष्य भारत सरकारच्या मानव विकास विभागाव्दारे ठेवण्यात आले. यात फक्त तामीळनाडू हे एकच असे आहे की त्यात नवोदयच्या शाळा उघडण्यास तेथील राज्य सरकारने विरोध केला. त्याचेही कारण केंद्र सरकारकडून तामीळ लोकांना हिंदी जबरदस्ती थोपविण्यात येईल असा त्यांचा तर्क होता. प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय या धोरणानुसार त्यावेळच्या संयुक्त भंडारा जिल्ह्याकरिता नवेगावबांध येथे शाळा सुरू करण्यात आली. परंतु १९९९ मध्ये जिल्ह्याची विभागणी केल्याने गोंदिया जिल्हा नवीन जिल्हा म्हणून उद्ययास आला. परंतु या जिल्ह्याला अगोदरच अस्तित्वात असलेली नवेगावची शाळा मिळाली. नवेगाव-गोंदिया जिल्ह्यात येत असल्यामुळे आपोआपच शाळा मिळाली. परंतु भंडारा जिल्ह्यासाठी वेगळे नवोदय विद्यालय स्थापन करण्यासाठी नव्याने कसरत करावी लागली. संपूर्ण प्रक्रिया पार करीत असतांना वरठी येथे जमिन व ठिकाण मंजूर झाल्याचे कळले, परंतु तिथे आजपर्यंत शाळेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला नाही. त्यामुळे अजूनही भंडारा जिल्ह्याचे विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव येथेच प्रवेशत घेतात. प्रत्येक वर्षी पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परिक्षा घेवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विद्यार्थ्याना यात तोटा आहे. जर त्वरीत भंडारा जिल्ह्याची जवाहर नवोदय वेगळी करून त्यांना तेथील जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिल्यास दोन्ही जिल्ह्याच्या विद्यार्थ्याना ८०-८० चा वेगळा कोटा मिळेल. यात अजून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने त्यांच्या स्वप्नाची पूर्ती होऊन त्यांचे आयुष्य सुधारेल या विषयावर जिल्ह्याच्या खासदारांनी स्वत: पुढाकार घेऊन भंडारा जिल्ह्याच्या नवोदय स्थापनेसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.