शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सिया ठाकूर जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:18 IST

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला.यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्यातील ८७.९९ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

ठळक मुद्देविभागात जिल्हा पहिल्या स्थानी : ५० विद्यालयांचा निकाल शंभर टक्के, विज्ञान शाखेचा टक्का वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला.यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्यातील ८७.९९ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. गोंदिया येथील शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिया धनेंद्र ठाकूर हिने सर्वाधिक ९५.८४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. तर याच विद्यालयाचा विद्यार्थी श्रीपाद विजय देशपांडे हा ९५.४० टक्के गुण घेऊन उर्तीण झाला. तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल जितेंद्र साखरे ९५.३८ टक्के गुण प्राप्त केले.बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती. बारावीनंतर खऱ्या अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीत जास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते.त्यामुळेच आपला पाल्य चांगले गुण उर्तीण व्हावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते यासाठीच ते सुध्दा वर्षभर मेहनत घेत असतात.यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १९ हजार ८२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १७ हजार ४४७ विद्यार्थी उर्तीण झाले.मागील वर्षीच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केले असून जिल्ह्याचा निकाल ८७.९९ टक्के लागला आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ९ हजार ६६६ विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. यापैकी ९ हजार २२४ विद्यार्थी (९४.४५) उर्तीण झाले.तर कला शाखेचे एकूण ८ हजार ७३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७ हजार ३८ विद्यार्थी (८०.५९) उर्तीण झाले.वाणिज्य शाखेचे एकूण ९३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८४६ विद्यार्थी (९०.५८) उर्तीण झाले.तर व्होकेशनल शाखेच्या एकूण ३९५ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. यापैकी ३३९ विद्यार्थी (८५.८२) उर्तीण झाले.विशेष म्हणजे मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या बारावीच्या निकालाची टक्केवारी सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.आमगाव तालुका निकालात सरसमागील तीन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्याच्या निकालाच्या टक्केवारीत सातत्याने सुधारणा होत आहे. यंदा गोंदिया येथील शांताबेन मनोहरभाई पटेल विद्यालयाची विद्यार्थिनी सिया ठाकूर हिने ९५.८४ टक्के गुण घेवून जिल्ह्यात अव्वल ठरली. तर तालुका निहाय निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात आमगाव तालुका सरस ठरला आहे. आमगाव तालुक्याचा निकाल ९१.२२, अर्जुनी मोरगाव ९०.३६, गोंदिया ८९.३४, सडक अर्जुनी ८७.२४, सालेकसा ९०.२९, देवरी ८४.९३, तिरोडा ८२.४३ टक्के निकाल लागला. मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत सुधारणा झाली असून गोंदिया जिल्हा नागपूर विभागात अव्वल ठरला आहे.विज्ञान व वाणिज्य शाखेकडे वाढला कलजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढत आहे. दरवर्षी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून निकालाची टक्केवारी सुध्दा सुधारत आहे. यंदा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९४.४५टक्के, कला शाखेचा ८०.५९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.५८ टक्के आणि व्होकेशनल शाखेचा ८५.८२ टक्के निकाल लागला.यावरुन विज्ञान शाखेची टक्केवारी वाढत आहे. गत वर्षाच्या तुलनेत विज्ञान आणि व्होकेशनल शाखेच्या निकालात तीन ते चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य शाखेसह व्होकेशनल शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.सीबीएसई अभ्यासक्रमाकडे वाढतोय कलमहाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाऐवजी सीबीएसई अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल अधिक असून निकालाची टक्केवारी सुध्दा अधिक आहे. त्यामुळेच सीबीएसई निकालात शंभर टक्के निकाल देणाºया शाळा मात्र महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालात माघारल्याचे चित्र आहे.५० विद्यालयांनी मारली सेंचूरीदरवर्षी जिल्ह्याच्या निकालात सुधारणात होत असल्याचे दिलासादायक चित्र असताना विद्यालयांच्या निकालात सुध्दा सुधारणा होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. बारावीच्या निकालात जिल्ह्यातील ५० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक विद्यालय गोंदिया तालुक्यातील असून त्या पाठोपाठ सडक अर्जुनी तालुक्यातील विद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत सुधारणा झाली असून ५० विद्यालयांनी शंभर टक्के टक्केवारी गाठली आहे.यंदाही सावित्रीच्या लेकीच पुढेमंगळवारी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उर्तीण होण्याची टक्केवारी अधिक आहे.त्यामुळे यंदाही जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच पुढे असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ९१६ विद्यार्थिनीनी परीक्षा दिली. त्यापैकी ८८९३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी ८९.६८ टक्के आहे. तर एकूण ९ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८५५४ विद्यार्थी उर्तीण झाले. उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८६.३० टक्के आहे. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत मुलींनी आघाडी घेतली.तीन वर्षांनी गोंदिया तालुक्याने उघडले खातेमागील तीन वर्षांच्या बारावीच्या निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास अर्जुनी मोरगाव तालुका निकालात सरस ठरला होता. शिवाय याच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले होते. मात्र या तालुक्याचा हा विक्रम यंदा गोंदिया तालुक्याने मोडीत काढला असून गोंदिया येथील शांतबेन मनोहरभाई पटेल विद्यालयाची विद्यार्थी सिया ठाकूर हिने विज्ञान शाखेतून ९५.८४ टक्के गुण घेवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले. तर याच शाळेचा विद्यार्थी श्रीपाद देशपांडे यांने ९५.४० टक्के गुण घेवून उर्तीण झाला. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाची सोनल साखरे हिने ९५.३८ टक्के गुण घेवून यश संपादन केले.व्होकेशनल शाखेच्या निकालात सुधारणाविज्ञान आणि वाणिज्य शाखेसह व्होकेशनल शाखेकडे सुध्दा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे या शाखेच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा व्होकेशनल शाखेचा निकाल ८५.८२ टक्के लागला असून कला शाखेच्या तुलनेत ५ टक्के निकाल अधिक लागला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे सुध्दा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीHSC Exam Resultबारावी निकाल