शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

उमरीत भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दूरवर पायपीट करावी ...

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दूरवर पायपीट करावी लागत आहे. तर जनावरांना सुध्दा पाणी मिळणे कठीण झाले आहे. गावातील नळाला पुरेसे पाणी येत नसून गावालगतचा नाला पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

धादरी-उमरी हे एका गट ग्रामपंचायतमध्ये येणारे दोन गावे आहेत. या दोन्ही गावांच्यामधून एक नाला वाहतो. नाल्याच्या एकीकडे धादरी तर दुसरीकडे उमरी हे गाव आहे. आता उन्हाळा लागला असून गावात भीषण पाणी टंचाई सुरू झाली आहे. नळ योजनेचे पाणी केवळ पाच ते दहा मिनिटे सुरू राहते. पुरेसे पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. दोन्ही गावांच्या मधील नाला पूर्णतः कोरडा झाला आहे. त्यात पाणी नसल्यामुळे आता जेसीबीने नाल्याच्या पात्रात खोदकाम करून पाण्याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे तयार आहे. पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाय योजना करुन टँकरव्दारे पाणी पुरवठ्याची मागणी केली जात आहे.