शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

११ वर्गांसाठी सात वर्गखोल्या

By admin | Updated: December 31, 2015 01:45 IST

तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला तीन पिढ्यांचा वारसा आहे.

इमारत झाली जीर्ण : अनेक विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती नाहीगोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला तीन पिढ्यांचा वारसा आहे. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय नोकरी व इतर उच्च पदावरही आहेत. मात्र सद्यस्थितीत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शाळेची इमारत जीर्ण झाली असून ११ वर्गांसाठी केवळ सात वर्गखोल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय होत आहे.उपसरपंच सोनू पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद चिरेखनी शाळेत वर्ग एक ते पाचपर्यंत एकूण मुलामुलींची पटसंख्या १२४ आहे. तर वर्ग सहावी ते आठवीपर्यंची पटसंख्या १५६ आहे. अशी एकूण २८० मुले-मुली या शाळेत शिक्षण घेतात. येथे वर्ग सहावीच्या ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या आहेत. मात्र शालेय इमारत धोकादायक असल्यामुळे व वर्गखोल्यांचा अभाव असल्याने सदर दोन्ही तुकड्या एकाच वर्गखोलीत बसविण्यात येतात. वर्ग सातवीच्याही ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या आहेत. या दोन्ही तुकड्यातील विद्यार्थी वर्गखोलीच्या अभावामुळे सध्या एकाच वर्गखोलीत अध्ययन करतात. तर वर्ग आठवीच्यासुद्धा ‘अ’ व ‘ब’ अशा दोन्ही तुकड्या एकाच वर्गखोलीत बसतात. या तिन्ही वर्गात एकूण सहा तुकड्यांना अध्यापन केले जाते. दाटीवाटीने विद्यार्थी बसत असल्यामुळे शिक्षकांना शिकविताना व विद्यार्थ्यांना शिकून घेताना मोठीच समस्या व अडचण निर्माण होते. मात्र जिल्हा परिषदेकडून अद्यापही वर्गखोल्यांचे बांधकाम व जीर्ण शाळा इमारतीची दुरूस्ती, सुधारणा किंवा नविनीकरण करण्यात आले नाही. चिरेखनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन वर्गखोल्या अत्यंत जीर्णावस्थेत असून धोकादायक आहेत. त्यामुळे जीवितहानीची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तर चार मोठ्या वर्गखोल्या दयनिय अवस्थेत आहेत. या वर्गखोल्यांचे छत कवेलूंचे असून अनेक ठिकाणी कवेलू फुटलेले आहेत. तसेच लाकडे फाटे सडले व तुटलेले आहेत. केवळ तीन वर्ग थोड्या चांगल्या स्थितीत असून तेसुद्धा कवेलूंचेच आहेत.सदर शाळेला एकूण ११ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. सध्या सहा जीर्ण वर्गखोल्या असून आणखी तीन नवीन वर्गखोल्यांची गरज आहे. शैक्षणिक आराखड्यानुसार दरवर्षी याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती तिरोडामार्फत जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाला सादर करण्यात येते. मात्र शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे सदर शाळा नवीन इमारतीपासून वंचित आहे.शालेय इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषदेला पत्र सादर करण्यात आले होते. २ आॅगस्ट २०१४ रोजी जि.प. गोंदियाचे इमारत धोकादायक असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. मात्र नवीन इमारतीचे काम कुठे अडले? हे गुलदस्त्यात आहे. सध्या या जीर्ण व धोकादायक इमारतीमध्येच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही बाब शासन व प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.(प्रतिनिधी)गणित व विज्ञानाचे शिक्षकच नाहीतजि.प. पूर्व माध्यमिक शाळा चिरेखनी येथे सन २०१४-१५ पासून वर्ग आठवी सुरू करण्यात आले. वर्ग आठवीच्या ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या आहेत. परंतु आतापर्यंत गणित व विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांची येथे नियुक्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे एकाच शिक्षकावर अतिरिक्त भार पडत असून विद्यार्थ्यांचे मोठेच नुकसान होत आहे.