शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

गोंदियात होणार व्हाईट आर्मीची स्थापना

By admin | Updated: July 26, 2015 01:55 IST

जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात युवकांचे सहकार्य घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या युवकांची गोंदिया व्हाईट आर्मी ...

गोंदिया : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात युवकांचे सहकार्य घेण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या युवकांची गोंदिया व्हाईट आर्मी या नावाचे युवकांचे संघटन करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात कोणतीही घटना घडल्यास ही युवकांची प्रशिक्षित, शिस्तबद्ध फौज तत्काळ त्या ठिकाणी धाव घेवून मदत करेल. यासाठी शहरातील व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. शुक्रवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ढोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर, गोंदिया नगर पालिकेचे प्रशासन अधिकारी राणे, लॉयन्स क्लब ग्रीन सीटीचे संस्थापक अध्यक्ष निर्मल अग्रवाल, लॉयन्स क्लब ग्रीन सीटीचे सचिव अपूर्व अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदियाचे कालूराम अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदिया संजीवनीचे सचिव राजेश कनोजिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ.सूर्यवंशी म्हणाले, २३ जुलै रोजी रात्री ८.०६ मिनिटांनी आलेल्या भूकंपाची तिव्रता ३.९ रिस्टर स्केल इतकी होती. परंतु आता पुन्हा भूकंपाचे धक्के येण्याची शक्यता नसल्याची माहिती जबलपूर व हैद्राबाद येथील संस्थेच्या वैज्ञानिककांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असता दिली. जमिनीत असलेल्या भेगांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाचे पाणी जात असल्यामुळे क्वचीत प्रसंगी असे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. जिल्ह्यातच या भुकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत १० कि.मी. खोलवरील अंतरावर असल्याची माहिती त्यांना वैज्ञानिकांकडून मिळाली. जिल्ह्यात भूकंपाच्या धक्यामुळे कोणत्याही तालुक्यात जिवित व वित्तहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदारांकडून प्राप्त झाली असून प्रत्येक व्यक्तीने सतर्कतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील ८७ गावे नदिकाठांवर आहे असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही गावे पुराने बाधित होणार नाही. यासाठी यंत्रणा व ग्रामस्थांनी समन्वयातून काम करावे. गावातील पाणी पुरवठा योजना पुराने बाधित झाल्यास संबंधित ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पुरेसा औषधसाठा व सुसज्ज रुग्णवाहिका रुग्णालयामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे रुग्णाला वेळीच औषधोपचार मिळण्यास मदत होईल. नाव व होड्या पूर परिस्थितीच्या काळात सुस्थितीत असल्या पाहिजेत असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात लॉयन्स क्लब, जेसीस क्लब, रोटरी क्लब, रेड क्रॉस यासह अन्य सेवाभावी संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले. पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार उद्भवणार नाही. यासाठी गावपातयीवर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व आपत्ती नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू असावेत. धरणातून पाणी सोडण्यात पूर्वी बाधित होणाऱ्या नदीकाठच्या गावांना पूर्वसूचना द्यावी असे त्यांनी सूचविले. (जिल्हा प्रतिनिधी)