शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:42 IST

महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल.

ठळक मुद्देमहिला सक्षमीकरणाचा प्रयत्न : महिला बालविकास सचिवांच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल. त्यासाठी शहरातील जयस्तंभ चौकातील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या जागेवर महिला बचत गटांसाठी भव्य व्यापारी संकुल व सामाजिक कार्यासाठी सभागृह तयार करण्यात येणार आहे. याला राज्य सरकारने मंजुरी दिली असून लवकर कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.आ. अग्रवाल यांनी संदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. तसेच बचत गटासाठी व्यापार संकुल उभारण्यासंदर्भात आढावा घेतला. कुडवा नाका परिसरात ४ कोटी रुपये खर्चून वनभवन तयार करण्यात आले आहे. यामुळे वनविभागाची शहरातील विविध ठिकाणातील कार्यालये आता एकाच ठिकाणी वनभवनात स्थापन केली जाणार आहे. आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे वनभवनाची भव्य इमारत उभरण्यात आली. त्यामुळे जयस्तंभ चौकात असलेल्या उपवनसंरक्षक कार्यालयाचे स्थानांतरण वनभवनात केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे आणि महिला बालविकास सचिव हे देखील बैठकीला उपस्थित होते. आ. अग्रवाल यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.या व्यापारी संकुलाचे काम जलदगतीने कसे पूर्ण करता येईल दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले. या वेळी त्यांनी जिल्हा ग्रंथालय शहराबाहेर असल्याने नागरिकांना तिथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे हे ग्रंथालय सुद्धद शहराच्या मध्यभागी आणण्याची गरज असल्याचे सांगितले. जयस्तंभ चौक येथे व्यापार संकुलासह सभागृह देखील उभारण्यात येणार आहे. यामुळे पंचायत समितस्तरीय कार्यशाळा, महिला बचत गटांचे मेळावे, विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यास सोयी होईल. महिला बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेदसिंगल यांनी आ.अग्रवाल यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.यामुळे महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी यासाठी प्रशासनातर्फे हे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले.बचतगटांसाठी कार्यशाळामहिला बचतगटांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना हक्काची इमारत व व्यापार संकुल उपलब्ध होणार आहे. बचत गटातील महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मुंबई येथून उत्पादन व व्यापार क्षेत्रातील विशेषज्ज्ञांची कार्यशाळा गोंदिया येथे आयोजित करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. यावर सचिव वेदसिंगल यांनी येत्या महिन्यात जिल्ह्यातील महिला बतच गटांसाठी कार्यशाळा आयोजीत करण्याचे निर्देश संबंधीतांना दिले. या कार्यशाळेत महिलांना रोजगारविषयक माहिती दिली जाणार आहे.