शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चार गावांसाठी तोडगा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:53 IST

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत.

ठळक मुद्देधापेवाडा प्रकल्पातील पाण्याचे बॅक स्टोरेज : कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतकाचेवानी : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत. यासाठी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात सोमवारी कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दरम्यान दोन्ही राज्यांच्या संबंधित जिल्हाधिकाºयांशी बोलून त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.दिलीप बंसोड यांच्या नेतृत्वात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, कृष्णा भांडारकर, मुन्ना पटले, मध्यप्रदेशचे अजाब शास्त्री, उपसरपंच झनकार कडाऊ, राजेंद्र वानखेडे, दुर्योधन कोडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांची भेट घेण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी पंकज गेडाम, कनिष्ठ अभियंता एन.व्ही. अहिरराव उपस्थित होते.भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या चार गावांचे अंदाजे ९०० च्यावर शेतकरी धापेवाडा डॅमचे पाणी बॅक स्टोरेजमुळे ठप्प झाल्याने शेतात जावू शकत नाही. परिणामी एक महिन्यापासून धान कापणी करण्यात आली. पण शेतात कोणतेही साधन जात नसल्याने सर्व धान पीक शिवारात पडून आहे. शेतातील धानाची नासाडी होत असून काही दिवसांनी एक दानाही हाती लागणे कठीण आहे, असे कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांना सांगण्यात आले.धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा येथील पाणी पिण्याकरिता उपयोगात यावे किंवा पिण्याच्या पाण्याची पातळी टिकून राहावी, याकरिता प्रकल्पात पाणी स्टोरेज केले जात आहे.याचा दुष्परिणामामुळे चारही गावांच्या शेतकºयांना नदी ओलांडून जाता येत नाही. नदीला लागून असलेल्या नाल्यांना थोप असल्यामुळे शेती संबंधित साधन व लोकांना जाणे कठीण झाले आहे.या वेळी माजी आ. बंसोड यांनी, धापेवाडा प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचा स्टोरेज करण्यापूर्वी भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या गावांच्या ग्रामपंचायतींना सूचना देणे गरजेचे होते. असे बोलून महाराष्ट्र राज्यात पाण्याची टंचाई भागविण्याकरिता दुसºया राज्याच्या जनतेवर अन्याय करु शकत नाही. तातडीने उपाययोजना करा. दोन्ही राज्याच्या संबंधित जिल्हाधिकाºयांना विश्वासात घेवून तत्काळ व्यवस्था करायला सांगा किंवा आपण स्वत: करा, असे बजावून सांगितले.यावर कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांनी तत्काळ दोन्ही जिल्हाधिकाºयांना मिळून व्यवस्था कशी करता येईल, याबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.याप्रसंगी बोलेश बिजेवार, राकेश चौरीवार, राजकुमार कावळे, महेश लिल्हारे, शंकर बारेवार, सोमा पगरवार, नारायण लिल्हारे, नान्हू लिल्हारे, गणपत ठवकर, लोकेश्वर कोडेश्वर, लिखीराम लिल्हारे, रविंद्र लिल्हारे, मोरेश्वर कोडेश्वर, रामेश्वर लिल्हारे, बालाराम राऊत, मनोज कोडेश्वर व नारायण कोडेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.नदीच्या दोन्ही तिरावर मजबूत बांधकाम करण्यात यावे. तसे झाल्यास रेताळ जमिनीमुळे किनारपट्टी वाहून जाणार नाही. तसेच कायमस्वरुपी पूल तयार करण्यात यावे, अशी मागणी माजी आ. दिलीप बंसोड व अजाबराव शास्त्री यांनी कार्यकारी अभियंता फाळके यांच्याकडे केली.