शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

सेवायोजन कार्यालय ठरलेय कुचकामी

By admin | Updated: July 17, 2015 01:18 IST

जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीवर अवलंबून आहे. शेतीची कामे आटोपल्यानंतर चार-पाच महिने कुठलेही काम शिल्लक नसते.

सोनपुरी : जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीवर अवलंबून आहे. शेतीची कामे आटोपल्यानंतर चार-पाच महिने कुठलेही काम शिल्लक नसते. त्यामुळे मजुरीच्या शोधात शहराकडे धाव घ्यावी लागते. हीच अवस्था जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारीची झाली आहे. सेवायोजन कार्यालय देखील नावापुरतेच झाले आहे. सालेकसा तालुक्यात एखादा मोठा उद्योग स्थापन झाल्यास अनेक बेरोजगारांना काम मिळण्याची शक्यता आहे. मात्र येथील बेरोजगार युवक मोठ्या उद्योगाच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यात बेरोजगारांची स्थिती फारच बिकट आहे. तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारीचे सावट आहे. या तालुक्याच्या सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी एक तरी मोठा उद्योग किंवा प्रकल्प तालुक्यात सुरू करण्यात यावा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासूनची आहे. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांची नोंदणी करण्यासाठी सेवायोजन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र नोंदणी करून ही २० ते २७ वर्षामध्ये एखाद्या बेरोजगाराला नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे हे कार्यालय कुचकामी ठरत आहे. नाव नोंदणी व नूतनीकरण आॅनलाईन करण्यात आले असले तरी अद्याप संगणकावर रोजगार संबधी जाहिरात पण दिसत नाही. गोंदिया येथील सेवायोजन कार्यालय येथे संपर्क केला असता येथे बेरोजगारासाठी मार्गदर्शन केंद्र नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसमोर रोजगार मिळविण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकंदर जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालय कुचकामी ठरत आहे. (वार्ताहर)