शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

गंभीर परिस्थिती ! 14 बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०,८१६ झाली असून, १६,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४,५२० क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २,६७४, तिरोडा ४७६, गोरेगाव २०२, आमगाव २६९, सालेकसा ११३, देवरी ११८, सडक-अर्जुनी ३८३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३४, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ५१ रुग्ण आहे.

ठळक मुद्दे७४५ बाधितांची पडली भर : वर्षभरातील सर्वच रेकॉर्ड मोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना आपले रौद्र रूप दाखवित असतानाच रविवारी (दि.११) जिल्ह्यात तब्बल १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ७४५ नवीन बाधितांची भर पडली असून १६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंद घेण्यात आली आहे. या आकडेवारी नंतर कोरोनाला घेऊन जिल्ह्यातील सर्वच रेकॉर्ड मोडले गेले आहेत. शिवाय, ही धडकी भरविणारी आकडेवारी बघून तरी आता खबरदारी शिवाय दुसरा पर्याय नाही हे दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.११) आतापर्यंत सर्वाधिक ७४५ बाधितांची भर पडली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३७८, तिरोडा ७४, गोरेगाव ५८, आमगाव ५९, सालेकसा १९, देवरी ३९, सडक-अर्जुनी ६०, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४८ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. तर १६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८८, तिरोडा १८, गोरेगाव ११, आमगाव १७, सालेकसा ४, देवरी ११, सडक-अर्जुनी ८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०,८१६ झाली असून, १६,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४,५२० क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २,६७४, तिरोडा ४७६, गोरेगाव २०२, आमगाव २६९, सालेकसा ११३, देवरी ११८, सडक-अर्जुनी ३८३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३४, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ५१ रुग्ण आहे. यातील ३२८५ रुग्ण घरीचत अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २१८८, तिरोडा २९३, गोरेगाव ११५, आमगाव १४९, सालेकसा ६७, देवरी ५९, सडक-अर्जुनी २१२, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १६८, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ३४ रुग्ण आहे.जिल्ह्यासाठी ठरला काळा दिवस मागील वर्षी मार्च महिन्यातच कोरोना सत्राला सुरुवात झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला होता. मात्र यंदाची स्थिती त्यापासून अधिकाधिक भयावह असून, तब्बल १४ मृत्यू व ७४५ बाधितांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नव्हती. मात्र रविवारी (दि.११)  सर्वांना हादरवून सोडणारी आकडेवारी आल्याने रविवारचा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला आहे. १९०५ अहवाल प्रतीक्षेत  जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापसणी केली जात आहे. यामुळे बाधितांची आकडेवारीही सातत्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये तपासण्यांचे अहवालही प्रलंबित राहत आहेत. मात्र जेवढे जास्त अहवाल प्रलंबित तेवढे जास्त बाधित निघत असल्याचे अनुभव येत आहे. अशात रविवारी १९०५ अहवाल प्रलंबित असल्याने आता सोमवारी किती बाधितांची भर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता ‘घरी रहा’ हाच मंत्र फायद्याचा  शासनाकडून सुरुवातीपासूनच नागरिकांना ‘घरी रहा’ असे आवाहन करीत आहे. मात्र नागरिक कोरोनाला हलक्यात घेत मनमर्जीपणाने वागताना दिसत आहेत. हेच कारण आहे की, अपेक्षा नसावी एवढ्या वाईट परिस्थितीला आता सामोरे जावे लागत आहे. तब्बल १४ जणांचा मृत्यू यापेक्षा अधिक धक्कादायक बाब जिल्ह्यासाठी नाही. त्यामुळे आता ‘घरी रहा-सुरक्षित रहा’ हाच मंत्र सर्वांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या