शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गंभीर परिस्थिती ! 14 बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०,८१६ झाली असून, १६,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४,५२० क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २,६७४, तिरोडा ४७६, गोरेगाव २०२, आमगाव २६९, सालेकसा ११३, देवरी ११८, सडक-अर्जुनी ३८३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३४, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ५१ रुग्ण आहे.

ठळक मुद्दे७४५ बाधितांची पडली भर : वर्षभरातील सर्वच रेकॉर्ड मोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना आपले रौद्र रूप दाखवित असतानाच रविवारी (दि.११) जिल्ह्यात तब्बल १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ७४५ नवीन बाधितांची भर पडली असून १६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंद घेण्यात आली आहे. या आकडेवारी नंतर कोरोनाला घेऊन जिल्ह्यातील सर्वच रेकॉर्ड मोडले गेले आहेत. शिवाय, ही धडकी भरविणारी आकडेवारी बघून तरी आता खबरदारी शिवाय दुसरा पर्याय नाही हे दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.११) आतापर्यंत सर्वाधिक ७४५ बाधितांची भर पडली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३७८, तिरोडा ७४, गोरेगाव ५८, आमगाव ५९, सालेकसा १९, देवरी ३९, सडक-अर्जुनी ६०, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४८ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. तर १६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८८, तिरोडा १८, गोरेगाव ११, आमगाव १७, सालेकसा ४, देवरी ११, सडक-अर्जुनी ८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०,८१६ झाली असून, १६,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४,५२० क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २,६७४, तिरोडा ४७६, गोरेगाव २०२, आमगाव २६९, सालेकसा ११३, देवरी ११८, सडक-अर्जुनी ३८३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३४, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ५१ रुग्ण आहे. यातील ३२८५ रुग्ण घरीचत अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २१८८, तिरोडा २९३, गोरेगाव ११५, आमगाव १४९, सालेकसा ६७, देवरी ५९, सडक-अर्जुनी २१२, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १६८, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ३४ रुग्ण आहे.जिल्ह्यासाठी ठरला काळा दिवस मागील वर्षी मार्च महिन्यातच कोरोना सत्राला सुरुवात झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला होता. मात्र यंदाची स्थिती त्यापासून अधिकाधिक भयावह असून, तब्बल १४ मृत्यू व ७४५ बाधितांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नव्हती. मात्र रविवारी (दि.११)  सर्वांना हादरवून सोडणारी आकडेवारी आल्याने रविवारचा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला आहे. १९०५ अहवाल प्रतीक्षेत  जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापसणी केली जात आहे. यामुळे बाधितांची आकडेवारीही सातत्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये तपासण्यांचे अहवालही प्रलंबित राहत आहेत. मात्र जेवढे जास्त अहवाल प्रलंबित तेवढे जास्त बाधित निघत असल्याचे अनुभव येत आहे. अशात रविवारी १९०५ अहवाल प्रलंबित असल्याने आता सोमवारी किती बाधितांची भर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता ‘घरी रहा’ हाच मंत्र फायद्याचा  शासनाकडून सुरुवातीपासूनच नागरिकांना ‘घरी रहा’ असे आवाहन करीत आहे. मात्र नागरिक कोरोनाला हलक्यात घेत मनमर्जीपणाने वागताना दिसत आहेत. हेच कारण आहे की, अपेक्षा नसावी एवढ्या वाईट परिस्थितीला आता सामोरे जावे लागत आहे. तब्बल १४ जणांचा मृत्यू यापेक्षा अधिक धक्कादायक बाब जिल्ह्यासाठी नाही. त्यामुळे आता ‘घरी रहा-सुरक्षित रहा’ हाच मंत्र सर्वांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या