शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जिल्ह्यातील शाळांत अग्निशमन यंत्रच नाहीत

By admin | Updated: November 8, 2014 22:39 IST

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात

पांढरी : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवण्यावर प्रतिबंध लावला होता. परंतु तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही एकाही शाळेत अग्निशमन यंत्राची व्यवस्था करण्यात आलेली नाही.सुरक्षेच्या या अनास्थेमुळे शाळा व्यवस्थापकाव्दारे शासनाच्या निर्देशाची अवहेलना होत आहे. तसेच प्रशासनाव्दारेही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाच्या निर्देशनुसार, नवीन शाळांच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत: सुरक्षेचे मापदंड लक्षात घेवून केले जाते. तसेच नॅशनल बिल्डींग उपायाचे निरीक्षण करून तसे प्रमाणपत्र होणे गरजेचे असते. सर्व शाळांत अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण कमीत कमी दोन व्यक्तींना असावे व अग्निशमन यंत्राजवळ त्या व्यक्तीचे नाव स्पष्ट अक्षरात लिहीलेले असावे. तसेच सर्व शाळांत प्रथमोपचार पेटी ठेवण्यात यावी, गट शिक्षणाधिकाऱ्याव्दारे प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जावे, पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसाठी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांना जबाबदार ठरविण्यात यावे अशा तरतुदी आहेत. शासनाच्या निर्देशानुसार बालवाडी व पूर्व माध्यमिक शाळा इमारतीच्या खालच्या मजल्यावर असायला हवी. मात्र शासनाव्दारे जाहीर दिशानिर्देशाचे पालन जिल्ह्यात कुठेही होत असल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात एकूण १ हजार ७० प्राथमिक, २९८ उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय ३९ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व २५ ते ३० महाविद्यालये आहेत. या सर्व शाळेत आगीपासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक शाळेत अग्निशमन यंत्र तर दूर, प्रथमोपचार पेटीसुध्दा उपलब्ध नाही. शासनाच्या आदेशाची शाळा प्रशासनाव्दारे उपेक्षाच केली जात आहे. असे असतानाही शिक्षण विभागाव्दारे अद्यापही कोणत्याही शाळा प्रशासनावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शाळा इमारतीचे बांधकामही शासनाव्दारे देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून केले जात नाही. शाळा व्यवस्थापनाकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात असून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ केला जात आहे. (वार्ताहर)