शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांत अग्निशमन यंत्रच नाहीत

By admin | Updated: November 8, 2014 22:39 IST

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात

पांढरी : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवण्यावर प्रतिबंध लावला होता. परंतु तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही एकाही शाळेत अग्निशमन यंत्राची व्यवस्था करण्यात आलेली नाही.सुरक्षेच्या या अनास्थेमुळे शाळा व्यवस्थापकाव्दारे शासनाच्या निर्देशाची अवहेलना होत आहे. तसेच प्रशासनाव्दारेही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाच्या निर्देशनुसार, नवीन शाळांच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत: सुरक्षेचे मापदंड लक्षात घेवून केले जाते. तसेच नॅशनल बिल्डींग उपायाचे निरीक्षण करून तसे प्रमाणपत्र होणे गरजेचे असते. सर्व शाळांत अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण कमीत कमी दोन व्यक्तींना असावे व अग्निशमन यंत्राजवळ त्या व्यक्तीचे नाव स्पष्ट अक्षरात लिहीलेले असावे. तसेच सर्व शाळांत प्रथमोपचार पेटी ठेवण्यात यावी, गट शिक्षणाधिकाऱ्याव्दारे प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जावे, पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसाठी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांना जबाबदार ठरविण्यात यावे अशा तरतुदी आहेत. शासनाच्या निर्देशानुसार बालवाडी व पूर्व माध्यमिक शाळा इमारतीच्या खालच्या मजल्यावर असायला हवी. मात्र शासनाव्दारे जाहीर दिशानिर्देशाचे पालन जिल्ह्यात कुठेही होत असल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात एकूण १ हजार ७० प्राथमिक, २९८ उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय ३९ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व २५ ते ३० महाविद्यालये आहेत. या सर्व शाळेत आगीपासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक शाळेत अग्निशमन यंत्र तर दूर, प्रथमोपचार पेटीसुध्दा उपलब्ध नाही. शासनाच्या आदेशाची शाळा प्रशासनाव्दारे उपेक्षाच केली जात आहे. असे असतानाही शिक्षण विभागाव्दारे अद्यापही कोणत्याही शाळा प्रशासनावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शाळा इमारतीचे बांधकामही शासनाव्दारे देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून केले जात नाही. शाळा व्यवस्थापनाकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात असून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ केला जात आहे. (वार्ताहर)