शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

समाजभवनच झाले त्या विद्यार्थ्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:02 IST

गराडा येथील दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होती. या शााळेत शिकणारी ११ चिमुकले मागील महिनाभरापासून शाळेतच जात नाही. प्रशासनाने येथील शाळाच कायमची बंद केली.

ठळक मुद्दे गावातील युवकांनी स्वीकारली जबाबदारी : गराडा शाळा बंद प्रकरण, पालकांचा उपोषणाचा इशारा

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गराडा येथील दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होती. या शााळेत शिकणारी ११ चिमुकले मागील महिनाभरापासून शाळेतच जात नाही. प्रशासनाने येथील शाळाच कायमची बंद केली. मात्र पालकांनी आपले पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गावातील समाजभवनात शाळा सुरू केली. या विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी गावातील एका सुशिक्षित बेरोजगार युवकांनी स्विकारली. त्यामुळे गराडा येथील समाजभवन विद्यार्थ्यांची शाळा झाल्याचे चित्र आहे.येथील शिक्षण विभागाने ३ जानेवारीला क्रांतोज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनीच कमी पटसंख्येचे कारण पुढे करीत गराडा येथील शाळा बंद केली. या विरोधात गावकरी व पालकांनी रोष व्यक्त केला. गावातील शाळा बंद करुन नये असा प्रस्ताव देखील गावकऱ्यांनी पारीत करुन जि.प.शिक्षण विभागाकडे पाठविला. जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन शाळा बंद न करण्याची विनंती केली. मात्र प्रशासनाने नियम पुढे करीत व वरुनच आदेश असल्याचे सांगत येथील शाळा बंद केली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणपासून वंचित राहण्याची वेळ आली. मात्र यानंतरही पालक डगमगले नाही.लहान मुलांना जंगलातून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या शाळेत पायी पाठवायचे कसे, त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार, यापेक्षा त्यांनी गावातील समाजभवनात शाळा सुरू केली. गावातील सुशिक्षित तरुणांनी त्यांना शिकविण्याची जबाबदारी स्विकारली.गराडा येथील शाळा बंद केल्याच्या विरोधात रोष व्यक्त केला. पण प्रशासनाला पाझर फुटला नाही. एक महिना वाट पाहून आता पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यालाच पत्र पाठविले. गराडा येथील शाळा सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा या पत्रातून दिला आहे. प्रशासनाने शिक्षणाचा अधिकार कायद्याला मुठमाती देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद केली. त्या शाळेतील ११ विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार येथे समयोजन केले. पण, गराडा ते मुंडीपार प्राथमिक शाळेचे अंतर ३ कि.मी. चे आहे. मुलांना शाळेत पाठवायचे कसे, हा प्रश्न पालकांना पडला. मुलांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. नाईलाजाने पालकांनी त्या चिमुकल्यांना शाळेतच न पाठविण्याचा पवित्रा घेतला.मागील एक महिन्यापासून गराडा येथील ११ चिमुकले शाळेचत गेली नाही. मुंडीपारच्या प्राथमिक शाळेत गराडा शाळेतील मुले येत नाही. ही बाब प्राशसनाला माहित आहे, पण प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचचले नाही.परीक्षेचे नियोजन कसे करणारगराडा प्राथमिक शाळा सध्या समाजभवनात भरते. गावातील एका सुशिक्षीत बेरोजगाराने त्या ११ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी गराडा ग्रामपंचायतीने त्या सुशिक्षीत बेरोजगार शिक्षकाला ५ हजार रुपये मानधन देण्याचे ठरविले आहे. मात्र तीन महिन्यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेचे नियोजन गराडाचे पालक कसे करतील. विद्यार्थी परीक्षा कसे देतील हा प्रश्न आता पालकांना सतावित आहे.पाल्यांसाठी पालकांची धडपडशिक्षण विभागाने कमी पटसंख्येचे कारण देत गराडा येथील शाळा बंद केली. महिनाभराचा कालावधी लोटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे पालकांनी आता शाळा सुरू करण्याच्या मागणीला घेवून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एकीकडे आपले पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे प्रशासन केवळ हातावर हात ठेऊन आहे.