शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

शालेय पोषण की शोषण आहार?

By admin | Updated: September 2, 2016 23:58 IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्हाला देण्यात येत असलेल्या खिचडीत अनेकांची ‘खिचडी’ पकते. त्यामुळे शालेय पोषणहार देणारा

आमगाव : शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्हाला देण्यात येत असलेल्या खिचडीत अनेकांची ‘खिचडी’ पकते. त्यामुळे शालेय पोषणहार देणारा व घेणारा हाच खरा शोषणहार असल्याचे दिसून येत आहे.शासनाकडून सुरु झालेल्या शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना जो निकष ठरवून देण्याचे ठरले आहे त्या निकषाचा योग्य उपयोग होत नाही. पोषण आहाराअंतर्गत प्रत्येक शाळेत खिचडी तयार होते. अद्यावत रेकॉर्ड तयार केला जातो. मात्र तो रेकार्ड फक्त देखावा आहे. शळेला दिलेला धान्यसाठा हा विद्यार्थी संख्येनुसार असतो. त्यात उपस्थिती शाळेत कायम राहिली पाहिजे हा मुख्य उद्देश आहे. मग वाटप झालेला पोषण आहार शाळेत महिन्याकाठी उरतो कसा? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. साठा कसा उरेल हीच नामी युक्ती देणाऱ्याकडे व घेणाऱ्याकडे आहे. तेथूनच मलाई लाटणे प्रारंभ होते. आॅनलाईन प्रक्रिया सांगून सर्वच बरोबर आहे असे सांगितल्या जाते. महिन्याकाठी उरलेला साठा कोण तपासणार? यासाठी ठोस वेळापत्रक शासनाकडे नाही. योजना सुरु झाली, मात्र वास्तविक त्याची खरी अंमलबजावणी नाही. गटशिक्षणाधिकारी किंवा केंद्र प्रमुखाकडून ही माहिती वरच्या स्तरावर सादर केली जाते. हीच खरी मलाईची खरी जड आहे. शालेय पोषण आहार एकाच एजंसीकडे अनेक वर्ष दिल्याने कोणत्या मार्गाने गेल्याने काय नफा-तोटा होतो हे त्यांना माहित आहे. एजंसीला एवढा पैसा न देता गावातील महिला बचत गटांना दरवर्षी बचत गट बदलवून दिले तर गावातील शाळेत शालेय पोषण आहाराचे शोषण होणार नाही. किंवा सरळ महिन्याचा पैसा शासनाने महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)