शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

शालेय पोषण की शोषण आहार?

By admin | Updated: September 2, 2016 23:58 IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्हाला देण्यात येत असलेल्या खिचडीत अनेकांची ‘खिचडी’ पकते. त्यामुळे शालेय पोषणहार देणारा

आमगाव : शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्हाला देण्यात येत असलेल्या खिचडीत अनेकांची ‘खिचडी’ पकते. त्यामुळे शालेय पोषणहार देणारा व घेणारा हाच खरा शोषणहार असल्याचे दिसून येत आहे.शासनाकडून सुरु झालेल्या शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना जो निकष ठरवून देण्याचे ठरले आहे त्या निकषाचा योग्य उपयोग होत नाही. पोषण आहाराअंतर्गत प्रत्येक शाळेत खिचडी तयार होते. अद्यावत रेकॉर्ड तयार केला जातो. मात्र तो रेकार्ड फक्त देखावा आहे. शळेला दिलेला धान्यसाठा हा विद्यार्थी संख्येनुसार असतो. त्यात उपस्थिती शाळेत कायम राहिली पाहिजे हा मुख्य उद्देश आहे. मग वाटप झालेला पोषण आहार शाळेत महिन्याकाठी उरतो कसा? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. साठा कसा उरेल हीच नामी युक्ती देणाऱ्याकडे व घेणाऱ्याकडे आहे. तेथूनच मलाई लाटणे प्रारंभ होते. आॅनलाईन प्रक्रिया सांगून सर्वच बरोबर आहे असे सांगितल्या जाते. महिन्याकाठी उरलेला साठा कोण तपासणार? यासाठी ठोस वेळापत्रक शासनाकडे नाही. योजना सुरु झाली, मात्र वास्तविक त्याची खरी अंमलबजावणी नाही. गटशिक्षणाधिकारी किंवा केंद्र प्रमुखाकडून ही माहिती वरच्या स्तरावर सादर केली जाते. हीच खरी मलाईची खरी जड आहे. शालेय पोषण आहार एकाच एजंसीकडे अनेक वर्ष दिल्याने कोणत्या मार्गाने गेल्याने काय नफा-तोटा होतो हे त्यांना माहित आहे. एजंसीला एवढा पैसा न देता गावातील महिला बचत गटांना दरवर्षी बचत गट बदलवून दिले तर गावातील शाळेत शालेय पोषण आहाराचे शोषण होणार नाही. किंवा सरळ महिन्याचा पैसा शासनाने महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)