शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

दांडी मारणाऱ्या शिक्षकांसाठी ‘स्कूल मॉनिटरिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:22 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील काही शिक्षकांमुळे जि.प.शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. शाळेत उशीरा येणे, गप्पा मारणे, दांडी मारणे या प्रकारामुळे येथील विद्यार्थी शाळेच्या वेळेतही इकडे-तिकडे भटकत असतात.

ठळक मुद्दे१०६९ शाळांवर वॉच : केंद्रप्रमुखासह सर्व अधिकाºयांच्या शाळांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांतील काही शिक्षकांमुळे जि.प.शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. शाळेत उशीरा येणे, गप्पा मारणे, दांडी मारणे या प्रकारामुळे येथील विद्यार्थी शाळेच्या वेळेतही इकडे-तिकडे भटकत असतात. त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळात शिकविले जावे, यासाठी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी ३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील १०६९ शाळांतील शिक्षकांवर वॉच ठेवण्यासाठी स्कुल मॉनिटरींग उपक्रम सुरू केला आहे.जिल्ह्यात डिजीटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, प्रगत शाळा, स्पोकन इंग्लिश, शाळा सिद्धी, समाज सहभाग, ज्ञानरचनावाद, वाचन कुटी, डिजीटल शाळा, वाचन आनंद दिवस, वाचन प्रेरणा दिवस यासारखे विविध उपक्रम राबविले जात आहे. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागे राहु नये, असा शिक्षण विभागाचा माणस आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.महाराष्टÑ विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून भाषा व गणित या विषयातील संकल्पना समृद्धी करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरातून प्रत्येक मूल निर्धारित पातळी गाठू शकेल याचे नियोजन केले आहे.शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाशी संबंधित यशोगाथा त्यामध्ये केस स्टडीज, व्हिडिओज इत्यादी उल्लेखनीय बाबींचे मराठी व इंग्रजीमध्ये दस्ताऐवज भारत सरकारच्या एसएसए सौगन या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी योग्य पद्धतीने विद्यार्थी निहाय कृती कार्यक्रम आखून अपेक्षित अध्ययन संपादन पातळी साध्य करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण स्तरावरुन काम झाल्यास १०० टक्के मुलांना शाळेत दाखल करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल. हा उद्देश आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळेवर शाळेत पोहचत नाही किंवा शाळा सुरू असतानाही आपले काम आटोपण्यासाठी शाळेच्या बाहेर अनेकदा जातात. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी ‘स्कुल मॉनिटरींग’ ही संकल्पना आणली.जिल्ह्यातील ८५ केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व स्वत: मुख्य कार्यपालन अधिकारी शाळांना अचनाक भेटी देऊन शिक्षक वेळेत उपस्थित झाले किंवा नाही याची पाहणी करीत आहे.वेळेवर हजर व्हा अन्यथा; घरी जा‘स्कुल मॉनिटरींग’ या उपक्रमात वेळेवर शाळेत न पोहचणाºया शिक्षकांना घरी पाठविले जाणार आहे. वेळेत शाळेत शिक्षक न आल्यामुळे विद्यार्थी इकडे-तिकडे भटकत असतात. ही बाब योग्य नसल्यामुळे ‘स्कुल मॉनिटरींग’ उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक शाळेत पोहचण्यापूर्वी अधिकारी शाळेत आले आणि वेळ निघून गेल्यावर शाळेत शिक्षक उशीरा आले तर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. त्या दिवसाचे वेतनही त्या शिक्षकाला मिळणार नाही.यशस्वी झाल्यास राज्यभरात अंमलगोंदिया जिल्हा परिषदेने शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सुरू केलेला ‘स्कुल मॉनिटरींग’ हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर या उपक्रमाची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याला शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त भागात ही स्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वेळेच्या आत शाळेत उपस्थित राहिले पाहिजे यासाठी हा उपक्रम आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक दर्जा सुधारण्यास निश्चितच मदत होईल.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी प्राथमिक, गोंदिया.