शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बस शालेय समित्या नावापुरत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:13 IST

विद्यार्थ्यांची घरापासून शाळेपर्यंत सुरक्षित वाहतूक व्हावी, खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाऊ नये या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत स्कूल बस शालेय समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

ठळक मुद्देखासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक : शिक्षण विभागाच्या डोळ्यावर पट्टी, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांची घरापासून शाळेपर्यंत सुरक्षित वाहतूक व्हावी, खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाऊ नये या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत स्कूल बस शालेय समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. याअंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये १३०१ तर माध्यमिक शाळांमध्ये ३५४ स्कूल बस शालेय समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र यापैकी आत्तापर्यंत केवळ १६ समित्यांनी अहवाल सादर केला असून उर्वरित दीड हजारावर शाळांमधील समित्या नावापुरत्याच असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे टाटा सुमो वाहन उलटून एका चार वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) तालुक्यातील मुंडीपारजवळ घडली. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष जिल्ह्यात काही ठिकाणी अनाधिकृत शाळा सुरू असून त्याची माहीती सुध्दा शिक्षण विभागाला नसल्याची बाब या घटनेमुळे पुढे आली. केवळ खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांची नव्हे तर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुध्दा खासगी वाहनातून असुरक्षीतपणे वाहतूक केली जात आहे. मात्र शिक्षण विभाग आम्हाला काहीच माहिती नसल्याचे अर्विभावात वावरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे अधिकारी कितपत जागृत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.शालेय विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीच्या मुद्दाची सर्वोच्य न्यायालयाने दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली तयार करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण विभाग, पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले. मात्र या तिन्ही विभागाकडून याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.त्याला मंगळवारी जिल्ह्यात घडलेल्या घटनेने दुजोरा मिळाला आहे. केवळ शिक्षण विभागाचा गलथान कारभारामुळे एका चारवर्षीय निष्पाप बालिकेला जीव गमवावा लागला. शालेय विद्यार्थ्यांची घरापासून ते शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत सुरक्षित वाहतूक व्हावी, यासाठी परवानाधारक स्कूल बस अथवा इतर वाहनातून वाहतूक करण्याचे निर्देश दिले आहे. शिवाय ज्या परवानाधारक वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते, त्या वाहनामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाय योजना तसेच जीवन विमा देखील उतरविणे आवश्यक आहे.वाहन चालकाच्या फिटनेस प्रमाणपत्रापासून ते त्याच्या पोलीस रेकार्डची माहिती ठेवण्याची जबाबदारी संबंधित शाळा आणि शाळा व्यवस्थापन याच्यांवर आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रत्येक शाळांमध्ये स्कूल बस शालेय समित्या स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.या समित्यांमध्ये पालक, मुख्याध्यापक, शिक्षण, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे.याअंतर्गत जिल्ह्यातील १३०१ प्राथमिक आणि ३५४ माध्यमिक अशा एकूण १६५५ शाळांमध्ये स्कूल बस शालेय समित्या स्थापन करण्यात आल्याचे पत्र एका विभागाला शिक्षणाधिकाºयांनी दिले आहे. मात्र यापैकी आत्तापर्यंत केवळ १६ समित्यांनी अहवाल सादर केला असून उर्वरित शाळांमधील समित्या केवळ कागदावरच असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीबाबत शिक्षण विभागच उदासीन असल्याचे चित्र आहे.हेल्मेटकडे लक्ष खासगी वाहतुकीकडे दुर्लक्षपोलीस विभागाच्या यंत्रणेचे संपूर्ण लक्ष सध्या हेल्मेट सक्ती मोहीमेकडेच आहे. शहर तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून वाहतूक सुरू आहे. अधिक नफा कमविण्यासाठी खासगी वाहन चालक अक्षरक्ष: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करीत आहे. एका वाहनांमध्ये १५ ते २० विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जाते. मात्र या वाहन चालकांवर कारवाई करण्याकडे या विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.शिक्षण विभागाला येणार का जागविद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक शाळांमध्ये गठीत करण्यात आलेल्या स्कूल बस शालेय समित्यांची सर्व शाळांमध्ये स्थापना झाली का, त्या कार्यरत आहे का, एखाद्या शाळेचे विद्यार्थी खासगी वाहनातून तर येत नाही या सर्व गोष्टींची खातरजमा शाळांना आकस्मिक भेटी देवून करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. मात्र हा विभाग आपल्या जबाबदारीपासून दूर जात आहे.समित्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हशासकीय अथवा खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची परवानाधारक वाहनातून वाहतूक केली जावी, तसेच नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे,यासाठी मुख्याध्यापक व पालकांचा समावेश असलेली शालेय स्कूल बस समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र यानंतर सुध्दा विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून असुरक्षीतपणे वाहतूक सुरू असल्याने या समित्या आहेत अथवा नाही. यावर प्रश्न निर्माण झाला आहे.पालकांनी काळजी घेण्याची गरजआपल्या पाल्यांना शाळेत खासगी वाहनातून न पाठविता परवानाधारक स्कूल बसमधून पाठविण्याची गरज आहे. मात्र बरेच पालक याकडे दुर्लक्ष करीत असून पाल्यांना खासगी वाहनातून शाळेत पाठवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांनी जागृत होवून परवानधारक स्कूल बसमधूनच पाल्यांना शाळेत पाठविण्याची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा