शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

भर उन्हात सुटणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:34 IST

चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.

ठळक मुद्देसकाळची शाळा नावाचीच : शिक्षण विभागाचा अजब कारभार, पदाधिकारी निद्रावस्थेत

ऑनलाईन लोकमतगोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत दोन लाखांवर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. आता उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व क्रिडा समितीने १५ मार्च रोजी झालेल्या मासीक सभेत २१ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मार्च पासून सकाळ पाळीत शाळा सुरू करण्यात आली. दरवर्षी सकाळीपाळीत शाळा म्हटले की सकाळी ७.३० ते १०.३० ही वेळ असायची. परंतु यंदा सकाळी ७.१५ ते दुपारी १२.१५ ही वेळ ठरविण्यात आली आहे.दरवर्षीपेक्षा तब्बल १ तास ४५ मिनीटे विद्यार्थ्यांना जास्त वेळ शाळेत राहावे लागेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून आरटीईच्या निकषानुसार तासीका पूर्ण होतील असे ठरवून शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ही वेळ वाढवून त्या वेळेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे मात्र चिमुकले विद्यार्थी अडचणीत आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वच शाळांतील विद्यार्थी पायी शाळेत जातात. यातही विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांच्या पायात चप्पलही नसते. उघड्या पायाने शाळेत येणारे विद्यार्थी भर उन्हात शाळेतून बाहेर पडतील.सद्यस्थितीत गोंदियाचे तापमान ३८ अंशाच्या घरात आहे असून दररोज तापमानात वाढ होत आहे. परंतु शिक्षण विभागाने वाढत्या तपामानाकडे दुर्लक्ष करून दरवर्षीच्या वेळेला तिलांजली देऊन भर उन्हात शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या चुकीचा निर्णय असतानाही जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व अधिकारीही गप्प बसले आहेत. मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक बोंबा ठोकत आहेत.उष्माघात झाल्यास जबाबदार कोण?वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होऊ शकतो. या उष्माघातामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे. आपला उदोउदो करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग वेठीस धरत असल्याची प्रतिक्रीया जनमाणसात आहे.अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी सुटीच्या दिवशी सभारविवारी (दि.२५) सुटी असतानाही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग १ ते ८ च्या भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची मूलभूत क्षमता विकासासाठी स्तर निश्चीती कार्यवाही व पुढील नियोजन करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधानसचिव नंदकुमार व विद्या प्राधीकरणचे संचालक सुनिल मगर या सभेला उपस्थित राहणार आहेत असे सांगून सुटीच्या दिवशीही विशेष म्हणजे रामनवमी असतानाही सभा बोलाविण्यात आली आहे. यामुळे शिक्षक व कंत्राटी कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे.

टॅग्स :Schoolशाळा