शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

भर उन्हात सुटणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:34 IST

चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.

ठळक मुद्देसकाळची शाळा नावाचीच : शिक्षण विभागाचा अजब कारभार, पदाधिकारी निद्रावस्थेत

ऑनलाईन लोकमतगोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत दोन लाखांवर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. आता उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व क्रिडा समितीने १५ मार्च रोजी झालेल्या मासीक सभेत २१ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मार्च पासून सकाळ पाळीत शाळा सुरू करण्यात आली. दरवर्षी सकाळीपाळीत शाळा म्हटले की सकाळी ७.३० ते १०.३० ही वेळ असायची. परंतु यंदा सकाळी ७.१५ ते दुपारी १२.१५ ही वेळ ठरविण्यात आली आहे.दरवर्षीपेक्षा तब्बल १ तास ४५ मिनीटे विद्यार्थ्यांना जास्त वेळ शाळेत राहावे लागेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून आरटीईच्या निकषानुसार तासीका पूर्ण होतील असे ठरवून शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ही वेळ वाढवून त्या वेळेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे मात्र चिमुकले विद्यार्थी अडचणीत आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वच शाळांतील विद्यार्थी पायी शाळेत जातात. यातही विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांच्या पायात चप्पलही नसते. उघड्या पायाने शाळेत येणारे विद्यार्थी भर उन्हात शाळेतून बाहेर पडतील.सद्यस्थितीत गोंदियाचे तापमान ३८ अंशाच्या घरात आहे असून दररोज तापमानात वाढ होत आहे. परंतु शिक्षण विभागाने वाढत्या तपामानाकडे दुर्लक्ष करून दरवर्षीच्या वेळेला तिलांजली देऊन भर उन्हात शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या चुकीचा निर्णय असतानाही जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व अधिकारीही गप्प बसले आहेत. मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक बोंबा ठोकत आहेत.उष्माघात झाल्यास जबाबदार कोण?वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होऊ शकतो. या उष्माघातामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे. आपला उदोउदो करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग वेठीस धरत असल्याची प्रतिक्रीया जनमाणसात आहे.अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी सुटीच्या दिवशी सभारविवारी (दि.२५) सुटी असतानाही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग १ ते ८ च्या भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची मूलभूत क्षमता विकासासाठी स्तर निश्चीती कार्यवाही व पुढील नियोजन करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधानसचिव नंदकुमार व विद्या प्राधीकरणचे संचालक सुनिल मगर या सभेला उपस्थित राहणार आहेत असे सांगून सुटीच्या दिवशीही विशेष म्हणजे रामनवमी असतानाही सभा बोलाविण्यात आली आहे. यामुळे शिक्षक व कंत्राटी कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे.

टॅग्स :Schoolशाळा