शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भर उन्हात सुटणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:34 IST

चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.

ठळक मुद्देसकाळची शाळा नावाचीच : शिक्षण विभागाचा अजब कारभार, पदाधिकारी निद्रावस्थेत

ऑनलाईन लोकमतगोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत दोन लाखांवर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. आता उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व क्रिडा समितीने १५ मार्च रोजी झालेल्या मासीक सभेत २१ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मार्च पासून सकाळ पाळीत शाळा सुरू करण्यात आली. दरवर्षी सकाळीपाळीत शाळा म्हटले की सकाळी ७.३० ते १०.३० ही वेळ असायची. परंतु यंदा सकाळी ७.१५ ते दुपारी १२.१५ ही वेळ ठरविण्यात आली आहे.दरवर्षीपेक्षा तब्बल १ तास ४५ मिनीटे विद्यार्थ्यांना जास्त वेळ शाळेत राहावे लागेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून आरटीईच्या निकषानुसार तासीका पूर्ण होतील असे ठरवून शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ही वेळ वाढवून त्या वेळेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे मात्र चिमुकले विद्यार्थी अडचणीत आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वच शाळांतील विद्यार्थी पायी शाळेत जातात. यातही विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांच्या पायात चप्पलही नसते. उघड्या पायाने शाळेत येणारे विद्यार्थी भर उन्हात शाळेतून बाहेर पडतील.सद्यस्थितीत गोंदियाचे तापमान ३८ अंशाच्या घरात आहे असून दररोज तापमानात वाढ होत आहे. परंतु शिक्षण विभागाने वाढत्या तपामानाकडे दुर्लक्ष करून दरवर्षीच्या वेळेला तिलांजली देऊन भर उन्हात शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या चुकीचा निर्णय असतानाही जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व अधिकारीही गप्प बसले आहेत. मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक बोंबा ठोकत आहेत.उष्माघात झाल्यास जबाबदार कोण?वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होऊ शकतो. या उष्माघातामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे. आपला उदोउदो करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग वेठीस धरत असल्याची प्रतिक्रीया जनमाणसात आहे.अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी सुटीच्या दिवशी सभारविवारी (दि.२५) सुटी असतानाही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग १ ते ८ च्या भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची मूलभूत क्षमता विकासासाठी स्तर निश्चीती कार्यवाही व पुढील नियोजन करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधानसचिव नंदकुमार व विद्या प्राधीकरणचे संचालक सुनिल मगर या सभेला उपस्थित राहणार आहेत असे सांगून सुटीच्या दिवशीही विशेष म्हणजे रामनवमी असतानाही सभा बोलाविण्यात आली आहे. यामुळे शिक्षक व कंत्राटी कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे.

टॅग्स :Schoolशाळा