शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते मग शाळेची का नाही? (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ११ पर्यतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण ...

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ११ पर्यतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यातील वर्ग १ ते ११ पर्यंतवीच्या १९२३२५ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण केले जाणार आहे. एकीकडे शासन शिष्यवृत्तीची परीक्षा घेणार आहे मात्र शाळेची परीक्षा घेणार नाही हे दुहेरी धोरण दिसून येत आहे.

जिल्ह्यात वर्ग पहिलीत मुले ७४७७ तर मुली ७०८८ असे १४५४५ विद्यार्थी आहेत. वर्ग दुसरीत मुले ९६२४ तर मुली ८९१८ असे १८५४२ विद्यार्थी, तिसऱ्या वर्गातील मुले १०४६३ तर मुली ९७१३ असे २०१७६ विद्यार्थी, चवथीत मुले १०५३७ तर मुली ९८६९ असे २०४०६ विद्यार्थी, पाचवीत मुले १०१०१ तर मुली ९५५८ असे १९६६४ विद्यार्थी, सहावीत मुले १००३८ तर मुली ९४०२ असे १९४४० विद्यार्थी, सातवीत मुले १००६२ तर मुली ९५८८ असे १९६५० विद्यार्थी, आठवीत मुले १०४७५ तर मुली १०१२६ असे २०६०१ विद्यार्थी, नववीत १०७१५ मुले तर १००५७ मुली असे २०७७२ विद्यार्थी, अकरावीत ९००९ मुले तर ९५०० मुली असे १८ ५०९ विद्यार्थी असून अभ्यास न करता ते पुढच्या वर्गात जात आहेत. शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे तर शाळेची परीक्षा का नाही असा सवाल उपिस्थत होत आहे.

------------------

पालक असे म्हणतात...

कोरोनामुळे सरकारने वर्ग १ ते ११ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही. परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

- अविनाश मेंढे, पालक, खातिया.

----------------

कोट

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी पालकांचा आग्रह आहे.

- सुनिता पाऊलझगडे, पालक, आसोली.

.......---------

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात

सध्या कोरोना परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे. जीव वाचविणे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने घेतलेला निर्णय विचार करूनच घेतला आहे.

- विरेंद्र कटरे, शिक्षक जि.प. शाळा, बलमाटोला

...

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही. त्यांना शाळेतही बोलावता येणार नाही. अशात घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

-अनिरूध्द मेश्राम, शिक्षक, जि.प. शाळा, दत्तोरा

.......

शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा उत्तीर्ण केले जाणार आहे. आता १० वी वगळता ११ वी पर्यंतच्या सर्व मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे स्वागतच करावे लागेल.

-सुरेश रहांगडाले, शिक्षक जि.प. शाळा करंजी

जिल्ह्यातील विद्यार्थी वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली १४५६५

दुसरी १८५४२

तिसरी २०१७६

चौथी २०४०६

पाचवी १९६६४

सहावी १९४४०

सातवी १९६५०

आठवी २०६०१

नववी २०७७२

अकरावी १८५०९

.....

नवव्या वर्गात सर्वाधीक विद्यार्थी संख्या-२०७७२

.....

ही ढकलगाडी काय कामाची

एकही अभ्यास न करता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास केले जाते. ही ढकलपास गाडी काय कामाची असा प्रश्न सर्वांच्या समोर येतो. एकही धडा न वाचता पुढच्या वर्गात जाण्याची संधी देणे म्हणजे विद्यार्थ्यांना खुळा बनविण्यासारखेच आहे. शिक्षणाची प्रत्येक पायरी महत्वाची आहे. पहिल्या वर्गापासूनचे शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे जेवढे पदवीचे शिक्षण आहे.