शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते मग शाळेची का नाही? (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ११ पर्यतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण ...

गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ११ पर्यतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यातील वर्ग १ ते ११ पर्यंतवीच्या १९२३२५ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण केले जाणार आहे. एकीकडे शासन शिष्यवृत्तीची परीक्षा घेणार आहे मात्र शाळेची परीक्षा घेणार नाही हे दुहेरी धोरण दिसून येत आहे.

जिल्ह्यात वर्ग पहिलीत मुले ७४७७ तर मुली ७०८८ असे १४५४५ विद्यार्थी आहेत. वर्ग दुसरीत मुले ९६२४ तर मुली ८९१८ असे १८५४२ विद्यार्थी, तिसऱ्या वर्गातील मुले १०४६३ तर मुली ९७१३ असे २०१७६ विद्यार्थी, चवथीत मुले १०५३७ तर मुली ९८६९ असे २०४०६ विद्यार्थी, पाचवीत मुले १०१०१ तर मुली ९५५८ असे १९६६४ विद्यार्थी, सहावीत मुले १००३८ तर मुली ९४०२ असे १९४४० विद्यार्थी, सातवीत मुले १००६२ तर मुली ९५८८ असे १९६५० विद्यार्थी, आठवीत मुले १०४७५ तर मुली १०१२६ असे २०६०१ विद्यार्थी, नववीत १०७१५ मुले तर १००५७ मुली असे २०७७२ विद्यार्थी, अकरावीत ९००९ मुले तर ९५०० मुली असे १८ ५०९ विद्यार्थी असून अभ्यास न करता ते पुढच्या वर्गात जात आहेत. शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे तर शाळेची परीक्षा का नाही असा सवाल उपिस्थत होत आहे.

------------------

पालक असे म्हणतात...

कोरोनामुळे सरकारने वर्ग १ ते ११ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही. परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

- अविनाश मेंढे, पालक, खातिया.

----------------

कोट

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी पालकांचा आग्रह आहे.

- सुनिता पाऊलझगडे, पालक, आसोली.

.......---------

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात

सध्या कोरोना परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे. जीव वाचविणे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने घेतलेला निर्णय विचार करूनच घेतला आहे.

- विरेंद्र कटरे, शिक्षक जि.प. शाळा, बलमाटोला

...

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही. त्यांना शाळेतही बोलावता येणार नाही. अशात घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

-अनिरूध्द मेश्राम, शिक्षक, जि.प. शाळा, दत्तोरा

.......

शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा उत्तीर्ण केले जाणार आहे. आता १० वी वगळता ११ वी पर्यंतच्या सर्व मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे स्वागतच करावे लागेल.

-सुरेश रहांगडाले, शिक्षक जि.प. शाळा करंजी

जिल्ह्यातील विद्यार्थी वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली १४५६५

दुसरी १८५४२

तिसरी २०१७६

चौथी २०४०६

पाचवी १९६६४

सहावी १९४४०

सातवी १९६५०

आठवी २०६०१

नववी २०७७२

अकरावी १८५०९

.....

नवव्या वर्गात सर्वाधीक विद्यार्थी संख्या-२०७७२

.....

ही ढकलगाडी काय कामाची

एकही अभ्यास न करता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास केले जाते. ही ढकलपास गाडी काय कामाची असा प्रश्न सर्वांच्या समोर येतो. एकही धडा न वाचता पुढच्या वर्गात जाण्याची संधी देणे म्हणजे विद्यार्थ्यांना खुळा बनविण्यासारखेच आहे. शिक्षणाची प्रत्येक पायरी महत्वाची आहे. पहिल्या वर्गापासूनचे शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे जेवढे पदवीचे शिक्षण आहे.