शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आमचे संसार तुटण्यापासून वाचवा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 01:55 IST

‘ज्यांनी स्वत: उपाशी राहून आम्हाला शिकवलं, शिक्षक बनवलं त्या आई-वडिलांना आता आमची गरज असताना आम्ही त्यांची सेवा करू शकत नाही.

शिक्षकांची आर्त हाक : आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे उद्यापासून बेमुदत उपोषणगोंदिया : ‘ज्यांनी स्वत: उपाशी राहून आम्हाला शिकवलं, शिक्षक बनवलं त्या आई-वडिलांना आता आमची गरज असताना आम्ही त्यांची सेवा करू शकत नाही. आता आमचा भरला संसार तरी मोडू नका. पती एकीकडे तर पत्नी ६०० ते १००० किलोमीटर अंतरावरच्या जिल्ह्यात, कसा चालत असेल आमचा संसार? अहो चालतो कशाचा, चक्क तुटण्याच्या मार्गावर आहे. अनेकांचे तर घटस्फोटही झाले. पण आमची व्यथा ना जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली, ना कोण्या अधिकाऱ्याने. आता एकमेव पर्याय म्हणून सहकुटुंबच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे...’ही व्यथा शनिवारी शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोर मांडली. २०१२ पासून आंतरजिल्हा बदली होऊन स्वगृही गोंदिया जिल्ह्यात येऊ पाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवून थकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या आणि राज्यातील इतर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना कोणीही दाद देण्यास तयार नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांपासून तर सर्व पदाधिकारी, एवढेच नाही तर विरोधी पक्षातील सदस्यांपर्यंत सदर शिक्षकांनी आंतरजिल्हा बदल्या सुरू करण्यासाठी गळ घातली. पण कोणाचाच पायपोस कोणात नसल्यामुळे टोलवाटोलवी करण्याशिवाय त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे येत्या २८ मार्चपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करीत असल्याचे कृती समितीचे रविंद्रकुमार अंबुले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हाभरात शिक्षकांची १०४ पदे रिक्त३० सप्टेंबर २०१५ च्या पटसंख्येवरून जिल्हा परिषदेच्या शाळांची संचमान्यता निश्चित करण्यात आली. त्यात पदोन्नतीची पदे भरल्यानंतर शिक्षकांची १०४ पदे रिक्त होणार असल्याची माहिती शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समितीला शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मात्र ही प्रक्रिया करण्यास विलंब लावला जात आहे. मे महिन्यात पदोन्नतीची पदे भरली जातील. त्यानंतर आंतरजिल्हा बदल्या केल्या जातील असे सांगून जिल्हा परिषदेकडून चालढकलपणा केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हा परिषदेला बाबुगिरीचे ग्रहणजिल्हा परिषदेत कोणातही ताळमेळ नाही. सर्व कारभार बाबुगिरीच्या हाती आहे. पदाधिकारीच नाही तर अधिकाऱ्यांचाही कोणावर वचक नाही. बदलीसंदर्भात विचारणा करण्यासाठी बाबूलोकांकडे गेलो तर दोन-तीन वर्षे इकडे येऊच नका, असा सल्ला ते देतात. कारभारात स्पष्टता नाही. त्यामुळे नेमके काय गौडबंगाल आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. बाबूगिरीत अडकलेल्या जिल्हा परिषदेला कोणीतरी बाहेर काढावे, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.- असे शिक्षक, अशा व्यथाशुभांगी चौधरी : गोंदियातील तिरोडा माहेर असलेल्या शुभांगी चौधरी यवतमाळ जिल्ह्यात आपल्या १४ महिन्याच्या मुलीसोबत एकट्या राहतात. इकडे घरी पती आणि सासरे आहेत. पण पतीपत्नी एकत्रिकरणाचाही त्यांना लाभ मिळालेला नाही.रविंद्रकुमार अंबुले : गोंदियाचे अंबुले साडेसात वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. शिकवून तुला आम्हीच दूर केले. त्यापेक्षा अशिक्षित ठेवून शेळ्या चारण्यासाठी पाठविले असते तर आमच्या जवळ तरी राहिला असता, अशी व्यथा त्यांचे आई-वडिल त्यांच्याकडे व्यक्त करतात.नंदकुमार उईके : पत्नी दासगाव येथे शिक्षिका तर उईके राज्याच्या दुसऱ्या टोकावरील कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. येण्याजाण्याच्या प्रवासातच ४ दिवस जातात. कसे यायचे, कुटुंबियांना कधी भेटायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.राहुल नंदागवळी :जालना जिल्ह्यात ड्युटी असलेले नंदागवळी म्हणतात, आता आमचे शिकवण्यातही लक्ष लागत नाही. मानसिकता बिघडत चालली. यासोबतच प्रकाश बन्सोड (परभणी), सुरेंद्र गौतम (नांदेड), राजकुमार वरखडे (गडचिरोली), मुकेश खरकाटे (हिंगोली), प्रमोद शहारे, तुषार सिंगनजुडे या शिक्षकांनीही आपल्या व्यथा मांडल्या.