शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारचाच पाऊस खरा !

By admin | Updated: July 4, 2016 01:22 IST

पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता.

सरासरी ५१.१० मिमी. नोंद : पेरणीसह वृक्षारोपणालाही फायदागोंदिया : पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता. मात्र शनिवारी (दि.२) बरसलेल्या पावसाने ही पोकळी भरून काढली असून शनिवारी बरसलेल्या पावसानंतरच पावसाळा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ५१.१० मीमी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारचाच पाऊस खरा असा सुर ऐकू येत आहे. विशेष म्हणजे रविवारीही (दि.३) शहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील शेतकरी मागील चार वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका सहन करीत आहेत. आता खरीप हंगामाचा संपूर्ण भरवसा केवळ पावसावरच अवलंबून होता. शनिवार (दि.२) पूर्वीपर्यंत जिल्ह्यात केवळ १५ टक्केच बियाण्यांची पेरणी झाली होती. उन्हामुळे उगवलेल्या खारी वाळल्या व करपलेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी थांबविली होती. कदाचित खरीप हंगाम लांबण्याची भीती त्यांच्यात निर्माण झाली होती. यावर्षी पावसाचा जोर चांगला असेल, असा हवामान खात्याचा अंदाजच फोल ठरण्याची शक्यता निर्माण झालेली दिसत होती. मात्र शनिवारी जिल्ह्यात बरसलेल्या सरासरी ५१.१० मिमी. पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसानंतर त्यांनी बियाणे पेरणीचा शुभारंभ केला आहे. रखडलेल्या पेरण्या पूर्ण करण्याच्या तयारीत शेतकरी गुंतला आहे. तर जिल्ह्याभरात होत असलेल्या वृक्षारोपण अभियानासाठी जमिनीतही ओलावा निर्माण झाल्याने त्यांचे संवर्धन होण्याचा विश्वासही बळावला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५१.१० मिमी पाऊस बरसला आहे. यात गोंदिया तालुका ७५ मिमी, तिरोडा तालुका ११०.८० मिमी, गोरेगाव तालुका ४४.२० मिमी, आमगाव तालुका ७५.८० मिमी, सालेकसा तालुका ४६ मिमी, देवरी तालुका १५ मिमी, सडक-अर्जुनी तालुका २८ मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४.२० मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी (दि.३) जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत सरासरी १९०.८० मिमी पाऊस१ जून ते ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९०.८० मिमी पाऊस झालेला आहे. यात गोंदिया तालुका १४९ मिमी, तिरोडा तालुका २९९.९०, गोरेगाव तालुका १९८.२० मिमी, आमगाव तालुका १७०.६० मिमी, सालेकसा तालुका २०८.६० मिमी, देवरी तालुका १२७ मिमी, सडक-अर्जुनी तालुका १८०.२० मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आतापर्यंत १९३ मिमी पाऊस झालेला आहे. गाय व बैलाचा मृत्यूशनिवारच्या पावसामुळे कटंगटोला येथे दोन वीज पोल तुटून पडले. त्यामुळे करंट प्रवाहित होवून एका बैलाचा मृत्यू झाला. हिवराज नंदलाल लिल्हारे (रा.कटंगटोला) यांच्या मालकीचा बैल होता. तर हिवरा येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून करंट लागून एका गाईचा मृत्यू झाला.