शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

शनिवारचाच पाऊस खरा !

By admin | Updated: July 4, 2016 01:22 IST

पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता.

सरासरी ५१.१० मिमी. नोंद : पेरणीसह वृक्षारोपणालाही फायदागोंदिया : पावसाळा लागून महिना लोटला तरिही पाऊस पाहिजे तसा बरसला नव्हता. मात्र शनिवारी (दि.२) बरसलेल्या पावसाने ही पोकळी भरून काढली असून शनिवारी बरसलेल्या पावसानंतरच पावसाळा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ५१.१० मीमी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारचाच पाऊस खरा असा सुर ऐकू येत आहे. विशेष म्हणजे रविवारीही (दि.३) शहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील शेतकरी मागील चार वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका सहन करीत आहेत. आता खरीप हंगामाचा संपूर्ण भरवसा केवळ पावसावरच अवलंबून होता. शनिवार (दि.२) पूर्वीपर्यंत जिल्ह्यात केवळ १५ टक्केच बियाण्यांची पेरणी झाली होती. उन्हामुळे उगवलेल्या खारी वाळल्या व करपलेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी थांबविली होती. कदाचित खरीप हंगाम लांबण्याची भीती त्यांच्यात निर्माण झाली होती. यावर्षी पावसाचा जोर चांगला असेल, असा हवामान खात्याचा अंदाजच फोल ठरण्याची शक्यता निर्माण झालेली दिसत होती. मात्र शनिवारी जिल्ह्यात बरसलेल्या सरासरी ५१.१० मिमी. पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसानंतर त्यांनी बियाणे पेरणीचा शुभारंभ केला आहे. रखडलेल्या पेरण्या पूर्ण करण्याच्या तयारीत शेतकरी गुंतला आहे. तर जिल्ह्याभरात होत असलेल्या वृक्षारोपण अभियानासाठी जमिनीतही ओलावा निर्माण झाल्याने त्यांचे संवर्धन होण्याचा विश्वासही बळावला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५१.१० मिमी पाऊस बरसला आहे. यात गोंदिया तालुका ७५ मिमी, तिरोडा तालुका ११०.८० मिमी, गोरेगाव तालुका ४४.२० मिमी, आमगाव तालुका ७५.८० मिमी, सालेकसा तालुका ४६ मिमी, देवरी तालुका १५ मिमी, सडक-अर्जुनी तालुका २८ मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४.२० मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी (दि.३) जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत सरासरी १९०.८० मिमी पाऊस१ जून ते ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९०.८० मिमी पाऊस झालेला आहे. यात गोंदिया तालुका १४९ मिमी, तिरोडा तालुका २९९.९०, गोरेगाव तालुका १९८.२० मिमी, आमगाव तालुका १७०.६० मिमी, सालेकसा तालुका २०८.६० मिमी, देवरी तालुका १२७ मिमी, सडक-अर्जुनी तालुका १८०.२० मिमी तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आतापर्यंत १९३ मिमी पाऊस झालेला आहे. गाय व बैलाचा मृत्यूशनिवारच्या पावसामुळे कटंगटोला येथे दोन वीज पोल तुटून पडले. त्यामुळे करंट प्रवाहित होवून एका बैलाचा मृत्यू झाला. हिवराज नंदलाल लिल्हारे (रा.कटंगटोला) यांच्या मालकीचा बैल होता. तर हिवरा येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून करंट लागून एका गाईचा मृत्यू झाला.