शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: September 12, 2016 00:30 IST

जात प्रमाणपत्रातील त्रुट्या दोन ते तीन वर्षाचा कालावधी लोटूनही दूर न करणाऱ्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

पांढरी : जात प्रमाणपत्रातील त्रुट्या दोन ते तीन वर्षाचा कालावधी लोटूनही दूर न करणाऱ्या सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.ग्रामपंचायत कार्यालय गोंगले येथे १५ नोव्हेंबर २०१२ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वार्ड नं.३ मधील जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवार दामिनी सावळराम गावढ यांची सर्वानुमते सरपंच पदावर निवड केली होती. यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी यांनी मात्र प्रमाणपत्र मागितले होते. तेव्हा सदर सरपंचाने तहसील कार्यालय येथे जात प्रमाणपत्र दिले असता त्यामध्ये त्रुट्या असल्याने ते प्रकरण परत करण्यात आले होते. परंतु सदर सरपंचाने दोन ते तीन वर्षाचा कालावधी आटोपूनसुध्दा जात प्रमाणपत्रातील त्रुट्यांची भरपाई केली नाही. परिणामी त्यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यामार्फत कसलीही कारवाई होवू शकते. शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्वी निवडणूक झालेल्या दिवसांपासून सहा महिन्यामध्ये जात प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी माहितीच्या आधारावर तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती मागितली असता सदर प्रकार निदर्शनास आला. दामिनी सावळराम गावढ यांनी जात प्रमाणपत्रातील त्रुट्यांची भरपाई न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्र ठरल्याची कारवाई होवू शकते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दोन ते तीन वर्षाचा कालावधी आटोपूनसुध्दा गोंगले येथील सरपंच यांची चौकशी झाल्याचे दिसत नाही. (वार्ताहर)