शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

संत नरहरी महाराजांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

नवेगावबांध : संत नरहरी महाराज चौदाव्या शतकातील थोर संत होऊन गेले. त्यांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले. त्यांच्या शिकवणीवरच ...

नवेगावबांध : संत नरहरी महाराज चौदाव्या शतकातील थोर संत होऊन गेले. त्यांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले. त्यांच्या शिकवणीवरच आज संपूर्ण समाज वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

नवेगावबांध येथे संत श्री नरहरी महाराज सोनार समाजभवन लोकार्पण सोहळा व पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. २५१५ लेखाशिर्षा अंतर्गत सोनार समाजभवन तयार करण्यात आले. या वेळी सोनार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप रोकडे, कार्याध्यक्ष मधुकर कावळे, प्राध्यापक भजे, नरेंद्र भुजाडे, अशोक काळबांधे, हेमंत पोगडे, अमृतलाल यावलकर, रचना गहाणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, सामाजिक कार्यकर्ता खुशाल काशिवार, मुलचंद गुप्ता, अण्णा डोंगरवार, संतोष नरुले, जगदीश पवार, सतीश कोसरकर, बाबूराव नेवारे, रेवचंद शहरे, मधुकर कावळे, होमराज पुस्तोडे, संजय खरवडे आदी उपस्थित होते. सोनार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर स्पर्धा सुरू झाल्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन समाज संघटना मजबूत करून पुढील वाटचाल करावी, असे बडोले यांनी सांगितले. संत हे कोणत्याही एका जाती समूहाचे नसतात. ते सर्व मानव समाजासाठी प्रेरणास्थान असतात, सध्याची पिढी ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी आहे, असे मत नरुले यांनी व्यक्त केले. समाजाने संघटित होऊन सहकार्याने समाज हितासाठी कार्य करावे तरच आपला समाज सद्य:स्थितीवर मात करू शकेल, असे मत डॉ. प्रदीप रोकडे यांनी मांडले. संत नरहरी महाराज यांच्या छायाचित्राचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कीर्तनकार हाडगे महाराज पिंपरीवाले यांच्या सुमधूर वाणीतून गोपाल काला करण्यात आला. स्थानिक श्री संतोषी माता भजन मंडळ व जय दुर्गा भजन मंडळ यांनी सहकार्य केले. या वेळी रांगोळी स्पर्धा व बालकांची विविध वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली. प्रास्तविक अध्यक्ष कृष्णराव गजापुरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर यांनी केले तर आभार हाडगे महाराज यांनी मानले. कार्यक्रमासाठी जनार्दन पोवळे, हरिभाऊ पोवळे, त्र्यंबक बेहरे, दिलीप पोवळे, पुरुषोत्तम रोकडे, प्रदीप गजापुरे, लायकराम फाये, स्वाती गजापुरे, सरोज पोवळे, स्नेहल गजापुरे, अर्चना टेटे, सुनंदा फाये, संध्या गजापुरे, दीपा खरवडे यांनी सहकार्य केले.