शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाच्या पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:33 IST

जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देसरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद : कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी सुध्दा जोमाने कामाला लागले होते. वेळेत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेळेत आटोपली. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने रोवणीची कामे खोळबंली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली होती. मात्र तब्बल महिनाभर पाऊस न झाल्याने केलेली रोवणी वाळत चालली होती. परिणामी मागील वर्षी सारखेच पुन्हा यंदाही दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी आणि गुरूवारी (दि.१६) जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली. तर सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धानासाठी अनुकुल मानला जातो. यंदा १८ आॅगस्टपर्यंत सरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही सरासरी समाधानकारक आहे. धान हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असल्याने यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवंलबून आहे. मागील दोन तीन वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होतीे. मात्र तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर धरणातील पाणी साठ्यात थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याने त्याची शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस