शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

दोन दिवसाच्या पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:33 IST

जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देसरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद : कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी सुध्दा जोमाने कामाला लागले होते. वेळेत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेळेत आटोपली. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने रोवणीची कामे खोळबंली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली होती. मात्र तब्बल महिनाभर पाऊस न झाल्याने केलेली रोवणी वाळत चालली होती. परिणामी मागील वर्षी सारखेच पुन्हा यंदाही दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी आणि गुरूवारी (दि.१६) जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली. तर सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धानासाठी अनुकुल मानला जातो. यंदा १८ आॅगस्टपर्यंत सरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही सरासरी समाधानकारक आहे. धान हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असल्याने यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवंलबून आहे. मागील दोन तीन वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होतीे. मात्र तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर धरणातील पाणी साठ्यात थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याने त्याची शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस