शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी

By admin | Updated: July 21, 2014 23:56 IST

पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी,

काचेवानी : पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी, असा सल्ला तिरोडा कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी पावसाच्या अभावाने बळीराजा खूप धास्तावला आहे. कडक उन्हामुळे पेरण्यांचे अंकुर वाळले आहेत. वरचे धान्य चिमण्या-पाखरांनी वेचून आपले आहार बनविले. त्यामुळे झालेल्या पेरण्यांमधील ५० ते ६० टक्के बियाणे नाहिसे झाले. वास्तव म्हणजे यावेळी पेरणी करायची की नाही अशा गंभीर विचारात बळीराजा पडलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी केलेली आहे. अशीच परिस्थिती असली तर दुबार पेरणीसुद्धा नष्ट होईल. यावर तिरोडा कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, यावर्षी पाऊस उशिरा येणार असला तरी पाऊस समाधानकारक होईल. पेरण्या बिघडल्या, ५० ते ६० टक्के रोपे नाहिसे झाले. तरी शेतकऱ्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही. शेतकऱ्यांनी हिंमत बांधून आणि संयम बाळगून सतर्कतेने शेतीची रोवणी करण्याचा सल्ला रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला. पेरण्या बिघडल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या कमीत कमी २५ ते ५० टक्के जमिनीत रोवणीची कामे होणार नाहीत. परंपरागत पद्धतीने रोवणी केल्याने ही समस्या उद्भवणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीमध्ये (श्रीपद्धती) व कृषी विभागाच्या सल्ल्याने रोवणीचे कार्य केल्यास शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे मत मंडळ कृषी अधिकारी रहांगडाले यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. २५ बाय २५ सेमी अंतरावर श्रीपद्धतीने पेरणी करून एक किंवा दोन रोपे लावावी. बांधीत पाणी ठेवू नये व बांध्या वाळणार नाही याची काळजी घेवून रोवणीचे कार्य केल्यास दुबार पेरण्या करण्याची गरज भासणार नाही. आणि रोपे कमी असल्याने शेती पडीक राहण्याची समस्या उद्भवणार नाही. शासकीय यंत्रणा आणि कृषी विभाग शेतकऱ्यांवर होत असणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल चिंतेत असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे तात्काळ कामे केली जातील. शेतकऱ्यांच्या हितासाठी येणाऱ्या योजना व सुविधांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत विशेषत: हिंदू धर्मामध्ये आजही धार्मिक विधीला, नक्षत्रांना मान्यता आहे. पुरातन काळापासून आजही ईश्वरीय शक्तीवर विश्वास आहे. पावसाळ्याचे दिवस आले की प्रत्येक व्यक्ती नक्षत्र केव्हा लागणार आणि केव्हा बदलणार, याकडे लक्ष ठेवतो. मृग नक्षत्रात पेरण्या करणे योग्य असते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पेरण्या वेळेत झाल्या. अर्दळा नक्षत्रात पाऊस भरपूर येतो, अशी शेतकऱ्यांची आशा असते. परंतु यावर्षी निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा तळागाळाला गेली आणि त्यांना निराश व्हावे लागले. सध्या फुक आणि यानंतर फुंडरस या नक्षत्रात पाऊस जोर पकडत नाही, अशी समजूत आहे. यानंतर नक्षत्र असरका लागणार असून या नक्षत्रात भरपूर पाऊस येतो. या नक्षत्रात रोवणी केल्यास ‘असरकाच्या सुटल्या पेंड्या आणि धान झाले कुडो खंड्या’ अशी शेतकऱ्यांची समजूत आहे. निसर्गाने आताही साथ दिल्यास शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळू शकते. पेरण्या बिघडल्या, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे खरे. मात्र आताही निसर्गाने कृपा केली तर शेतकऱ्यांचा लाग होईल. (वार्ताहर)