शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी

By admin | Updated: July 21, 2014 23:56 IST

पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी,

काचेवानी : पेरण्या बिघडल्या, ५० टक्क्यांच्या वर बियाणे नष्ट झाले. तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. दुबार पेरणी करण्यापेक्षा तेवढ्याच रोपात सुधारित पद्धतीने रोवणी करावी, असा सल्ला तिरोडा कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी पावसाच्या अभावाने बळीराजा खूप धास्तावला आहे. कडक उन्हामुळे पेरण्यांचे अंकुर वाळले आहेत. वरचे धान्य चिमण्या-पाखरांनी वेचून आपले आहार बनविले. त्यामुळे झालेल्या पेरण्यांमधील ५० ते ६० टक्के बियाणे नाहिसे झाले. वास्तव म्हणजे यावेळी पेरणी करायची की नाही अशा गंभीर विचारात बळीराजा पडलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी केलेली आहे. अशीच परिस्थिती असली तर दुबार पेरणीसुद्धा नष्ट होईल. यावर तिरोडा कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, यावर्षी पाऊस उशिरा येणार असला तरी पाऊस समाधानकारक होईल. पेरण्या बिघडल्या, ५० ते ६० टक्के रोपे नाहिसे झाले. तरी शेतकऱ्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही. शेतकऱ्यांनी हिंमत बांधून आणि संयम बाळगून सतर्कतेने शेतीची रोवणी करण्याचा सल्ला रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना दिला. पेरण्या बिघडल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या कमीत कमी २५ ते ५० टक्के जमिनीत रोवणीची कामे होणार नाहीत. परंपरागत पद्धतीने रोवणी केल्याने ही समस्या उद्भवणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीमध्ये (श्रीपद्धती) व कृषी विभागाच्या सल्ल्याने रोवणीचे कार्य केल्यास शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे मत मंडळ कृषी अधिकारी रहांगडाले यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. २५ बाय २५ सेमी अंतरावर श्रीपद्धतीने पेरणी करून एक किंवा दोन रोपे लावावी. बांधीत पाणी ठेवू नये व बांध्या वाळणार नाही याची काळजी घेवून रोवणीचे कार्य केल्यास दुबार पेरण्या करण्याची गरज भासणार नाही. आणि रोपे कमी असल्याने शेती पडीक राहण्याची समस्या उद्भवणार नाही. शासकीय यंत्रणा आणि कृषी विभाग शेतकऱ्यांवर होत असणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल चिंतेत असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे तात्काळ कामे केली जातील. शेतकऱ्यांच्या हितासाठी येणाऱ्या योजना व सुविधांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत विशेषत: हिंदू धर्मामध्ये आजही धार्मिक विधीला, नक्षत्रांना मान्यता आहे. पुरातन काळापासून आजही ईश्वरीय शक्तीवर विश्वास आहे. पावसाळ्याचे दिवस आले की प्रत्येक व्यक्ती नक्षत्र केव्हा लागणार आणि केव्हा बदलणार, याकडे लक्ष ठेवतो. मृग नक्षत्रात पेरण्या करणे योग्य असते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पेरण्या वेळेत झाल्या. अर्दळा नक्षत्रात पाऊस भरपूर येतो, अशी शेतकऱ्यांची आशा असते. परंतु यावर्षी निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा तळागाळाला गेली आणि त्यांना निराश व्हावे लागले. सध्या फुक आणि यानंतर फुंडरस या नक्षत्रात पाऊस जोर पकडत नाही, अशी समजूत आहे. यानंतर नक्षत्र असरका लागणार असून या नक्षत्रात भरपूर पाऊस येतो. या नक्षत्रात रोवणी केल्यास ‘असरकाच्या सुटल्या पेंड्या आणि धान झाले कुडो खंड्या’ अशी शेतकऱ्यांची समजूत आहे. निसर्गाने आताही साथ दिल्यास शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळू शकते. पेरण्या बिघडल्या, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे खरे. मात्र आताही निसर्गाने कृपा केली तर शेतकऱ्यांचा लाग होईल. (वार्ताहर)