शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सुरक्षेसाठी समता सैनिक दल- दहिवले

By admin | Updated: June 22, 2014 00:03 IST

माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली,

नवेगावबांध : माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली, असे मत रत्नदीप दहिवले यांनी व्यक्त केले. सिरेगावबांध येथे समता सैनिक दलाच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष बोदानंद गुरुजी तर प्रा. गजेंद्र गजभिये, डॉ. अजय अंबादे, दिलावर रामटेके, सुषमा रामटेके, सुरेखा टेंभुर्णे, करिष्मा माणे, धर्मदास सुखदेवे, मिथुन मेश्राम, वासंती सरदार उपस्थित होते.देशात समाजविद्यातक शक्तींचा उदय झालेला आहे. सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नातुन जातीय वादाचे मनसुबे आपल्याला निष्प्रभ करावयाचे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदानंद गुरुजी यांनी समात सैनिक दल ही बाबासाहेबाची चळवळ असून भारत बौद्धमय करण्याचा सल्ला दहिवले यांनी दिला. गाव तेथे समता सैनिक दल आणि घर तेथे सैनिक निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रा. वासंती सरदार, प्रा. गजेंद्र गजभिये, दिलावर रामटेके, डॉ. अजय अंबादे यांनी मार्गदर्शन केले. गावातून प्रमुख मार्गाने रॅलीने पथसंचालन करण्यात आले. सर्वांनी मिळून भोजनाचा सामूहिक आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपसरपंच धर्मदास सुखदेवे, बौद्ध समाजाचे अध्यक्ष तुळशीदास सुखदेवे, धनलाल मेश्राम, भुवनदास डोंगरवार, लोकपाल गहावे, व धम्मदीप बौद्ध विहाराच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील व परिसरातील लोक उपस्थित होते. (वार्ताहर)