शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

सामाजिक सुरक्षेसाठी समता सैनिक दल- दहिवले

By admin | Updated: June 22, 2014 00:03 IST

माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली,

नवेगावबांध : माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली, असे मत रत्नदीप दहिवले यांनी व्यक्त केले. सिरेगावबांध येथे समता सैनिक दलाच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष बोदानंद गुरुजी तर प्रा. गजेंद्र गजभिये, डॉ. अजय अंबादे, दिलावर रामटेके, सुषमा रामटेके, सुरेखा टेंभुर्णे, करिष्मा माणे, धर्मदास सुखदेवे, मिथुन मेश्राम, वासंती सरदार उपस्थित होते.देशात समाजविद्यातक शक्तींचा उदय झालेला आहे. सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नातुन जातीय वादाचे मनसुबे आपल्याला निष्प्रभ करावयाचे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदानंद गुरुजी यांनी समात सैनिक दल ही बाबासाहेबाची चळवळ असून भारत बौद्धमय करण्याचा सल्ला दहिवले यांनी दिला. गाव तेथे समता सैनिक दल आणि घर तेथे सैनिक निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रा. वासंती सरदार, प्रा. गजेंद्र गजभिये, दिलावर रामटेके, डॉ. अजय अंबादे यांनी मार्गदर्शन केले. गावातून प्रमुख मार्गाने रॅलीने पथसंचालन करण्यात आले. सर्वांनी मिळून भोजनाचा सामूहिक आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपसरपंच धर्मदास सुखदेवे, बौद्ध समाजाचे अध्यक्ष तुळशीदास सुखदेवे, धनलाल मेश्राम, भुवनदास डोंगरवार, लोकपाल गहावे, व धम्मदीप बौद्ध विहाराच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील व परिसरातील लोक उपस्थित होते. (वार्ताहर)