शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

आता स्वस्त धान्य दुकानातून होणार स्टेशनरी साहित्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 16:15 IST

स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे.

ठळक मुद्देउत्पन्न वाढविण्यासाठी निर्णय कंपनी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात थेट करार शासनाचा हस्तक्षेप नसणार

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे. यासंबंधिचा निर्णय शासनाने ३० ऑक्टोबर रोजी घेतला असून याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर संकट ओढवण्याची शक्यता असून बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने शिधापत्रिकधारकांना स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात गहू,तांदूळ, तेल, साखर, तूरदाळ, चनादाळ उपलब्ध करुन देत आहेत. याचा लाभ केसरी आणि बीपीएल,अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना होत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना अन्न धान्य वितरणाच्या बदल्यात मिळणारे कमिश्न फार कमी असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर होता. त्यामुळे ही नाराजी दूर करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य आणि शालेय उपयोगी वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.या वस्तूंची विक्री करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेशनरी साहित्य विक्री करणाऱ्या कंपनीशी थेट करार करुन कमिश्न निश्चित करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत शासनाचा कुठलाही हस्तक्षेप नसेल. शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेनरी आणि शालेय उपयोगी साहित्य ठेवता येणार आहे. स्वस्त धान्य दुकान हे ग्रामीण भागात अधिक असून नियमित स्वस्त धान्याची उचल सुध्दा याच भागातील शिधापत्रिकाधारक हे अधिक प्रमाणात करतात. मात्र या निर्णयाचा काही स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे.त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. स्वस्त धान्य दुकानदाराच्या मागे आधीच भरपूर कामे आहेत त्यात तो स्टेशनरी साहित्य विक्री करणाºया कंपनीचा शोध घेऊन त्यांच्याशी करार केव्हा करणार, शिवाय कंपनीवर त्यांचे वजन पडणार का? त्यांना कंपनी योग्य प्रमाणात कमिश्न देणार का आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे.ग्रामीण भागात पुन्हा बेरोजगारी वाढणारस्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांना बसणार आहे. ग्रामीण भागात छोट्या छोट्या दुकानामध्ये स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री केली जाते. यातून गावातील छोट्या दुकानदारांची रोजी रोटी चालते. मात्र आता स्वस्त धान्य दुकानातून हे साहित्य विक्री केल्यास त्यांचा रोजगार हिरावला जाणार असून पुन्हा बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमी जागेची समस्यास्वस्त धान्य दुकान हे फार कमी जागेत असते. त्यातच अन्नधान्याचे पोते आणि इतर साहित्यामुळे जागाच शिल्लक राहत नाही. त्यातच आता स्टेशनरी साहित्य विक्री करायचे म्हटल्यास ते साहित्य ठेवण्यासाठी जागा लागेल, शिवाय त्यांना मनुष्यबळ सुध्दा वाढवावे लागेल. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना आधीच मिळणारे कमिश्न हे अल्प असल्याने त्यातच मनुष्यबळ ठेवल्यास त्याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये फारसा उत्साह नाही.

शासनाच्या नवीन धोरणामुळे आधीच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही ढासळत चालली आहे.त्यातच आता स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर बेरोजगारीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही.- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.

टॅग्स :Governmentसरकार