शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता स्वस्त धान्य दुकानातून होणार स्टेशनरी साहित्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 16:15 IST

स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे.

ठळक मुद्देउत्पन्न वाढविण्यासाठी निर्णय कंपनी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात थेट करार शासनाचा हस्तक्षेप नसणार

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्त धान्य दुकानात आता अन्नधान्यासह स्टेशनरी आणि शालेय उपयोगी साहित्य सुध्दा मिळणार आहे. यासंबंधिचा निर्णय शासनाने ३० ऑक्टोबर रोजी घेतला असून याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर संकट ओढवण्याची शक्यता असून बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने शिधापत्रिकधारकांना स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात गहू,तांदूळ, तेल, साखर, तूरदाळ, चनादाळ उपलब्ध करुन देत आहेत. याचा लाभ केसरी आणि बीपीएल,अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना होत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना अन्न धान्य वितरणाच्या बदल्यात मिळणारे कमिश्न फार कमी असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर होता. त्यामुळे ही नाराजी दूर करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य आणि शालेय उपयोगी वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.या वस्तूंची विक्री करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेशनरी साहित्य विक्री करणाऱ्या कंपनीशी थेट करार करुन कमिश्न निश्चित करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत शासनाचा कुठलाही हस्तक्षेप नसेल. शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना स्टेनरी आणि शालेय उपयोगी साहित्य ठेवता येणार आहे. स्वस्त धान्य दुकान हे ग्रामीण भागात अधिक असून नियमित स्वस्त धान्याची उचल सुध्दा याच भागातील शिधापत्रिकाधारक हे अधिक प्रमाणात करतात. मात्र या निर्णयाचा काही स्वस्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे.त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. स्वस्त धान्य दुकानदाराच्या मागे आधीच भरपूर कामे आहेत त्यात तो स्टेशनरी साहित्य विक्री करणाºया कंपनीचा शोध घेऊन त्यांच्याशी करार केव्हा करणार, शिवाय कंपनीवर त्यांचे वजन पडणार का? त्यांना कंपनी योग्य प्रमाणात कमिश्न देणार का आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे.ग्रामीण भागात पुन्हा बेरोजगारी वाढणारस्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांना बसणार आहे. ग्रामीण भागात छोट्या छोट्या दुकानामध्ये स्टेशनरी आणि शालेय साहित्याची विक्री केली जाते. यातून गावातील छोट्या दुकानदारांची रोजी रोटी चालते. मात्र आता स्वस्त धान्य दुकानातून हे साहित्य विक्री केल्यास त्यांचा रोजगार हिरावला जाणार असून पुन्हा बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमी जागेची समस्यास्वस्त धान्य दुकान हे फार कमी जागेत असते. त्यातच अन्नधान्याचे पोते आणि इतर साहित्यामुळे जागाच शिल्लक राहत नाही. त्यातच आता स्टेशनरी साहित्य विक्री करायचे म्हटल्यास ते साहित्य ठेवण्यासाठी जागा लागेल, शिवाय त्यांना मनुष्यबळ सुध्दा वाढवावे लागेल. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना आधीच मिळणारे कमिश्न हे अल्प असल्याने त्यातच मनुष्यबळ ठेवल्यास त्याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये फारसा उत्साह नाही.

शासनाच्या नवीन धोरणामुळे आधीच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही ढासळत चालली आहे.त्यातच आता स्वस्त धान्य दुकानातून स्टेशनरी साहित्य विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायीकांवर बेरोजगारीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही.- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.

टॅग्स :Governmentसरकार