शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साहेब,वीज द्या हो वीज!

By admin | Updated: March 31, 2017 01:18 IST

कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा

केशोरी परिसरात शेतकऱ्यांचा टाहो : कमी वीज दाबाने शेकडो एकरातील पीक करपलेअर्जुनी-मोरगाव : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा भ्रमाचा भोपळा असल्याचे अनुभव तालुक्यातील शंभर टक्के सिंचनाखाली असलेल्या केशोरी परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून येत आहे. इटियाडोह धरणापासून २४ तास सिंचनाची सोय आहे. मात्र वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील कन्हाळगाव, सातगाव, तुकुम, इळदा व धमदीटोला येथील शेतकऱ्यांचे जवळपास ७५ हेक्टर क्षेत्रातील उभे पीक करपले. पीक करपून जाण्याचे हे सतत तिसरे वर्ष आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा वीज विभागाला माहिती दिली. वीज दाब वाढविण्यासाठी निवेदने दिली. मात्र अजूनही त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा होत आहे. ज्या लोकप्रतिनिधिंनी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असा भाव आणला ते सत्तेत आले व मोठे झाले. मात्र शेतकरी अजूनही उपेक्षीत आहे. केशोरी क्षेत्रातील कन्हाळगाव, सातगाव, तुकूम, इळदा व धमदीटोला येथील मागील तीन वर्षापासून कमी वीज दाबामुळे धानाचे पीक करपत आहे. या प्रकरणी वारंवार वीज विभागाला माहिती दिली जाते. मात्र या समस्येवर अजूनही तोडगा निघाला नाही. वीज दाब पूर्ववत करण्यात यावा, योग्य ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा याबाबत उपविभागीय अभियंता केशोरी, अर्जुनी-मोरगाव तथा देवरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या परिसरात आठवड्यातून मंगळवारी २४ तासांची लोडशेडिंग असते. कृषीपंपांना लोडशेडींग मुक्त करण्याची मागणी आहे. कमी वीज दाबाने शेकडो हेक्टर मधील धान पीक करपल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. सदरचा पंचनामा करुन संबंधित विभागाने नुकसान भरपाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री, उर्जामंत्री, कृषी मंत्री यांना तहसीलदारांमार्र्फत पाठविले आहे. यावेळी मोहनलाल दमाहे, दादाजी चव्हाण, आसाराम दमाहे, उध्दव पुस्तोडे, अशोक पुस्तोडे, उत्तम देशमुख, मेहबूब पठान, जयंत रामटेके, अलीराम हुंडरी, श्रीराम झोडे, नरेश ताराम, कृष्णा घरतकर, जागेश्वर छगवा, आनंदराव रंगारी, हरपाल जांभुळकर, सुरेश मडावी, भोजराम लोगडे, दीपक चव्हाण, दिनदयाल दुधकवार, रामविलास केवास, दसरु कोल्हे, देवदत्त दूधनाग सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कमी वीज दाब व ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न त्वरित तोडगा काढण्यात यावा अन्यथा येथील शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)प्रयत्न सुरु आहेतयासंदर्भात केशोरी येथील अभियंता जी.आय.विधानेंशी संपर्क केला असता माहिती मिळाली की, कमी वीज दाबाचा प्रश्न आहे. याबद्दल विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. कृषी पंप खूप वाढले, सोबतच वीज चोरही खूप आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कमी वीज दाबाचा प्रश्न निर्माण होतो. लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मरची सोय होईल. गेल्या दोन-तीन दिवसांपासून साकोली येथील सब स्टेशनमध्ये बिघाड आल्याने लाखांदूर वरुन वीज घेतली जाते;मात्र तिथून अपूर्ण पुरवठा होत असल्याने हे प्रश्न निर्माण होतात. वरिष्ठ पातळीवरुन लवकरच तोडगा काढण्याची माहिती त्यांनी दिली.