शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

साहेब,वीज द्या हो वीज!

By admin | Updated: March 31, 2017 01:18 IST

कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा

केशोरी परिसरात शेतकऱ्यांचा टाहो : कमी वीज दाबाने शेकडो एकरातील पीक करपलेअर्जुनी-मोरगाव : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा भ्रमाचा भोपळा असल्याचे अनुभव तालुक्यातील शंभर टक्के सिंचनाखाली असलेल्या केशोरी परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून येत आहे. इटियाडोह धरणापासून २४ तास सिंचनाची सोय आहे. मात्र वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील कन्हाळगाव, सातगाव, तुकुम, इळदा व धमदीटोला येथील शेतकऱ्यांचे जवळपास ७५ हेक्टर क्षेत्रातील उभे पीक करपले. पीक करपून जाण्याचे हे सतत तिसरे वर्ष आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा वीज विभागाला माहिती दिली. वीज दाब वाढविण्यासाठी निवेदने दिली. मात्र अजूनही त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा होत आहे. ज्या लोकप्रतिनिधिंनी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असा भाव आणला ते सत्तेत आले व मोठे झाले. मात्र शेतकरी अजूनही उपेक्षीत आहे. केशोरी क्षेत्रातील कन्हाळगाव, सातगाव, तुकूम, इळदा व धमदीटोला येथील मागील तीन वर्षापासून कमी वीज दाबामुळे धानाचे पीक करपत आहे. या प्रकरणी वारंवार वीज विभागाला माहिती दिली जाते. मात्र या समस्येवर अजूनही तोडगा निघाला नाही. वीज दाब पूर्ववत करण्यात यावा, योग्य ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा याबाबत उपविभागीय अभियंता केशोरी, अर्जुनी-मोरगाव तथा देवरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या परिसरात आठवड्यातून मंगळवारी २४ तासांची लोडशेडिंग असते. कृषीपंपांना लोडशेडींग मुक्त करण्याची मागणी आहे. कमी वीज दाबाने शेकडो हेक्टर मधील धान पीक करपल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. सदरचा पंचनामा करुन संबंधित विभागाने नुकसान भरपाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री, उर्जामंत्री, कृषी मंत्री यांना तहसीलदारांमार्र्फत पाठविले आहे. यावेळी मोहनलाल दमाहे, दादाजी चव्हाण, आसाराम दमाहे, उध्दव पुस्तोडे, अशोक पुस्तोडे, उत्तम देशमुख, मेहबूब पठान, जयंत रामटेके, अलीराम हुंडरी, श्रीराम झोडे, नरेश ताराम, कृष्णा घरतकर, जागेश्वर छगवा, आनंदराव रंगारी, हरपाल जांभुळकर, सुरेश मडावी, भोजराम लोगडे, दीपक चव्हाण, दिनदयाल दुधकवार, रामविलास केवास, दसरु कोल्हे, देवदत्त दूधनाग सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कमी वीज दाब व ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न त्वरित तोडगा काढण्यात यावा अन्यथा येथील शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)प्रयत्न सुरु आहेतयासंदर्भात केशोरी येथील अभियंता जी.आय.विधानेंशी संपर्क केला असता माहिती मिळाली की, कमी वीज दाबाचा प्रश्न आहे. याबद्दल विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. कृषी पंप खूप वाढले, सोबतच वीज चोरही खूप आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कमी वीज दाबाचा प्रश्न निर्माण होतो. लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मरची सोय होईल. गेल्या दोन-तीन दिवसांपासून साकोली येथील सब स्टेशनमध्ये बिघाड आल्याने लाखांदूर वरुन वीज घेतली जाते;मात्र तिथून अपूर्ण पुरवठा होत असल्याने हे प्रश्न निर्माण होतात. वरिष्ठ पातळीवरुन लवकरच तोडगा काढण्याची माहिती त्यांनी दिली.