शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

साहेब,वीज द्या हो वीज!

By admin | Updated: March 31, 2017 01:18 IST

कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा

केशोरी परिसरात शेतकऱ्यांचा टाहो : कमी वीज दाबाने शेकडो एकरातील पीक करपलेअर्जुनी-मोरगाव : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजलेले. २४ तास व अल्पदरात वीजेचा शासनाचा नारा भ्रमाचा भोपळा असल्याचे अनुभव तालुक्यातील शंभर टक्के सिंचनाखाली असलेल्या केशोरी परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून येत आहे. इटियाडोह धरणापासून २४ तास सिंचनाची सोय आहे. मात्र वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील कन्हाळगाव, सातगाव, तुकुम, इळदा व धमदीटोला येथील शेतकऱ्यांचे जवळपास ७५ हेक्टर क्षेत्रातील उभे पीक करपले. पीक करपून जाण्याचे हे सतत तिसरे वर्ष आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा वीज विभागाला माहिती दिली. वीज दाब वाढविण्यासाठी निवेदने दिली. मात्र अजूनही त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा होत आहे. ज्या लोकप्रतिनिधिंनी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असा भाव आणला ते सत्तेत आले व मोठे झाले. मात्र शेतकरी अजूनही उपेक्षीत आहे. केशोरी क्षेत्रातील कन्हाळगाव, सातगाव, तुकूम, इळदा व धमदीटोला येथील मागील तीन वर्षापासून कमी वीज दाबामुळे धानाचे पीक करपत आहे. या प्रकरणी वारंवार वीज विभागाला माहिती दिली जाते. मात्र या समस्येवर अजूनही तोडगा निघाला नाही. वीज दाब पूर्ववत करण्यात यावा, योग्य ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा याबाबत उपविभागीय अभियंता केशोरी, अर्जुनी-मोरगाव तथा देवरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या परिसरात आठवड्यातून मंगळवारी २४ तासांची लोडशेडिंग असते. कृषीपंपांना लोडशेडींग मुक्त करण्याची मागणी आहे. कमी वीज दाबाने शेकडो हेक्टर मधील धान पीक करपल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. सदरचा पंचनामा करुन संबंधित विभागाने नुकसान भरपाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री, उर्जामंत्री, कृषी मंत्री यांना तहसीलदारांमार्र्फत पाठविले आहे. यावेळी मोहनलाल दमाहे, दादाजी चव्हाण, आसाराम दमाहे, उध्दव पुस्तोडे, अशोक पुस्तोडे, उत्तम देशमुख, मेहबूब पठान, जयंत रामटेके, अलीराम हुंडरी, श्रीराम झोडे, नरेश ताराम, कृष्णा घरतकर, जागेश्वर छगवा, आनंदराव रंगारी, हरपाल जांभुळकर, सुरेश मडावी, भोजराम लोगडे, दीपक चव्हाण, दिनदयाल दुधकवार, रामविलास केवास, दसरु कोल्हे, देवदत्त दूधनाग सह शेकडो शेतकरी उपस्थित होते. कमी वीज दाब व ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न त्वरित तोडगा काढण्यात यावा अन्यथा येथील शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)प्रयत्न सुरु आहेतयासंदर्भात केशोरी येथील अभियंता जी.आय.विधानेंशी संपर्क केला असता माहिती मिळाली की, कमी वीज दाबाचा प्रश्न आहे. याबद्दल विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. कृषी पंप खूप वाढले, सोबतच वीज चोरही खूप आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कमी वीज दाबाचा प्रश्न निर्माण होतो. लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मरची सोय होईल. गेल्या दोन-तीन दिवसांपासून साकोली येथील सब स्टेशनमध्ये बिघाड आल्याने लाखांदूर वरुन वीज घेतली जाते;मात्र तिथून अपूर्ण पुरवठा होत असल्याने हे प्रश्न निर्माण होतात. वरिष्ठ पातळीवरुन लवकरच तोडगा काढण्याची माहिती त्यांनी दिली.