शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नियम 40 किलोग्रॅमचा, खरेदी 42 किलोंनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

सध्या शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बीतील धान खरेदी सुरू आहे. रब्बीसाठी धानखरेदीची मर्यादा केंद्र सरकारने ठरवून दिली असून, यामुळे ७० सहकारी संस्थांनी धान खरेदीला सुरुवातच केलेली नाही; तर सध्या स्थितीत ४८ धान खरेदी केंद्र  सुरू झाले असृून, या केंद्रावरून १ लाख ३० हजार क्विंटलपर्यंत धान खरेदी झाली आहे. गोंदिया तालुक्यातील ४, आमगाव तालुक्यातील २ आणि तिरोडा तालुक्यातील १ केंद्राची धान खरेदीची मर्यादाही पूर्ण झाली असून, या केंद्रावर खरेदी बंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर कट्ट्यांमध्ये धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करताना प्रतिकट्टा ४० किलो ६०० ग्रॅम धान घेण्याचा नियम असताना खरेदी केंद्रावर मात्र कट्ट्यामध्ये ४२ किलो धान शेतकऱ्यांकडून घेतले जात  असल्याने शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ३ ते ४ किलो अतिरिक्त जात आहे. पण या सर्व प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बीतील धान खरेदी सुरू आहे. रब्बीसाठी धानखरेदीची मर्यादा केंद्र सरकारने ठरवून दिली असून, यामुळे ७० सहकारी संस्थांनी धान खरेदीला सुरुवातच केलेली नाही; तर सध्या स्थितीत ४८ धान खरेदी केंद्र  सुरू झाले असृून, या केंद्रावरून १ लाख ३० हजार क्विंटलपर्यंत धान खरेदी झाली आहे. गोंदिया तालुक्यातील ४, आमगाव तालुक्यातील २ आणि तिरोडा तालुक्यातील १ केंद्राची धान खरेदीची मर्यादाही पूर्ण झाली असून, या केंद्रावर खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र यातही गौडबंगाल असून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान आधीच खरेदी करून चार-पाच दिवसांतच खरेदी पूर्ण झाल्याचे दाखविल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर प्रत्यक्षात धान खरेदी झाली अथवा  नाही, याची चाचपणी करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याची माहिती आहे. खरेदी सुरू असलेल्या केंद्रांना भेट दिल्यास बरेच वास्तविक चित्र पुढे येण्याची शक्यता आहे. खरेदी केंद्रावर नियमानुसार धानाचे वजन न घेता अतिरिक्त धान  घेतले जात आहे; तर १ क्विंटल धानासाठी शेतकऱ्यांना ६० रुपयांचा बारदाना लागत आहे. शासनाकडून खरेदी केंद्रावरील हमालांना प्रतिक्विंटल १० रुपये ७५ पैसे हमाली दिली जाते. मात्र यानंतरही केंद्रावर शेतकऱ्यांकडून हमालीचे पाच रुपये घेतले जात आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे कुणाचेच लक्ष नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

मर्यादा वाढण्याची शक्यता कमीच - पावसाळा तोंडावर असून रब्बीतील शासकीय धान खरेदीची मुदत ही ३० जूनपर्यंतच असते; पण सध्याची खरेदीची स्थिती  पाहता पुन्हा पंधरा दिवस व्यवस्थित धान खरेदी होण्याची शक्यता आहे; तर केंद्र सरकारने अद्यापही धान खरेदीची मर्यादा वाढवून दिलेली नाही. सध्या चित्र पाहता ती वाढवून मिळण्याची शक्यताही कमीच असल्याचे बोलले जाते. रब्बीचे लागवड क्षेत्र कमी दाखविल्याने घोळ - जिल्ह्यातील रब्बीचे लागवड क्षेत्र हे. ६८ हजार १२० हेक्टर असताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि संबंधित यंत्रणेकडून कमी लागवड क्षेत्राची माहिती पाठविण्यात आल्याने धान खरेदीची मर्यादा कमी झाली. मात्र सुधारित आकडेवारी नुकतीच पाठविण्यात आली असून खरेदीची मर्यादा वाढवून मिळेल, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड