शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

एसीबीने उघडकीस आणली २.३२ कोटींची अपसंपदा

By admin | Updated: July 18, 2014 00:08 IST

काम करून देण्यासाठी चहा-पाण्याच्या नावावर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात अशा २४ व्यवहारांवर या विभागाने कारवाई करून

कारवायांचे फलित : सर्वाधिक संपत्ती पऱ्हाटेंकडे, बहुतांश प्रकरणे न्यायालयात प्रलंबितकपिल केकत - गोंदियाकाम करून देण्यासाठी चहा-पाण्याच्या नावावर सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात अशा २४ व्यवहारांवर या विभागाने कारवाई करून त्यातून दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक संपत्ती अभियंता दीपक पऱ्हाटे यांची असल्याचे दिसते.एखाद्या शासकीय किंवा खाजगी कार्यालयातील अडलेले काम करवून घेण्यासाठी त्या मोदबल्यात संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून पैसा मागणे ही सामान्य बाब झाली आहे. कायद्याच्या भाषेत याला ‘लाच’ म्हटले जाते. आजघडीला हा प्रकार दररोजच्या व्यवहारातील एक भाग झाला आहे. लाच न मागता क्वचितच कुणी कामे करून देत असतील यावर सर्वसामान्यांचा विश्वासच बसणार नाही अशी स्थिती झाली आहे. या लाच मागणाऱ्यांवर लगाम घालून असे व्यवहार संपुष्टात यावे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे.एखाद्या कामाच्या मोबदल्यात अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीने विभागाकडे तक्रार करायली हवी. मात्र असे केल्यास समोरचा अधिकारी किंवा कर्मचारी आपली ‘खुन्नस’ ठेवणार व आपले काम होऊ देणार नाही अशी भिती मनात ठेऊन नागरिक तक्रार करण्यास घाबरतात. त्यामुळे चहा-पाण्याचा हा व्यवहार एक औपचारिकताच झाला आहे. याला घालण्यात आता एसीबीला बरेच यश येत आहे.शासनाने सन २००९ पासून गोंदिया जिल्ह्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्वतंत्र कार्यालय दिले. मात्र नागरिकांच्या मनातील भिती आड येत असल्याने मागील साडेचार वर्षांत पाहिजे त्या प्रमाणात कारवाया करता आल्या नाही. मात्र तक्रार केल्यानंतर विभाग तक्रारदाराच्या पाठीशी राहून त्यांचे अडलेले काम सुद्धा करवून देण्याची हमी दिली जात असल्याने आता नागरिकांच्या मनातली भिती निघत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सन २०१४ च्या सहा महिने १५ दिवसांच्या काळात या विभागाने नऊ कारवाया केल्या. सन २००९ पासून अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या २५ कारवायांत विभागाने लाचखोरीत अडकलेल्यांची दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली आहे. यामध्ये सन २०१० मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत २४ लाख चार हजार ६८२ रूपयांची तर सन २०१२ मध्ये ८४ लाख ३१ हजार ५७० रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली. जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई अभियंता दीपक पऱ्हाटे यांच्यावरील आहे. विभागाने त्यांच्याकडील एक कोटी २३ लाख ४२ हजार ६४७ रूपयांची अपसंपदा उघडकीस आणली. अशा प्रकारे एकूण दोन कोटी ३१ लाख ७८ हजार ८९९ रूपयांची अपसंपदा विभागाने उघडकीस आणली आहे.