शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाने केली शेतकऱ्यांची निराशा : उत्पादनावर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस जोर धरत नसल्याने रोवणीच्या कामात खंड पडला आहे.त्यामुळे रोवण्या लांबल्या असून त्याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात दररोज पावसासाठी अनुकुल वातावरण तयार होते. मात्र पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस होवून तूट भरुन न निघाल्यास पुढील काळ शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी सुध्दा अडचणीचा आहे.यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसल्याने सर्वच सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. तर काही सिंचन प्रकल्पातील पाणी रोवणीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा आता राखीव साठा शिल्लक आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर रुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे मागील तीन चार वर्षांच्या कालावधीत प्रथमच रोवणीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्याची वेळ आली. तर पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने धानाच्या उत्पादनात सुध्दा १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी विभागाने सुध्दा पाऊस लांबत असल्याने पिकांची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. सध्या जिल्ह्यावासीयांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस