शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:14 IST

कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्ह्यातील शेततळ्यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हयातील शेती पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या शेतात येत्या काळात रोहित्रासकट वीज जोडणी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जा, नवीन आणि नविकरणीय उर्जामंत्री उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.तिरोडा तालुक्यातील ग्राम पांजरा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम महागाव, गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी, गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी या महावितरणच्या ५ उपकेंद्राच्या ई-लोकार्पण. तसेच मुंडीपार, ठाणेगाव, कोकणा, ठाणा, मुल्ला, तिरखेडी, रामनगर, रापेवाडा, गुमधावडा या ९ वीज उपकेंद्राच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. येथील गोरेगाव रोड मार्गावर आयोजीत कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. मंचावर आमदार गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भैरसिंग नागपूरे , केशवराव मानकर, रमेश कुथे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद उपस्थित होते.नामदार बडोले यांनी, एक शेतकरी एक रोहित्र ही योजना अतिशय उपयुक्त असून यामुळे शेतीला मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये पथदिवे व वीज सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने ८१० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. प्रास्तावीक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी मांडले. संचालन श्रीमती मनिषा दुबे व कुमार कोकणे यांनी केले.विद्युत सेवकांची हजेरी लवकरचगोंदिया शहर परिसरातील विजेची समस्या दुर करण्यासाठी २८ कोटी रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात आणखी १८ कोटी रूपयांची कामे करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून याला लवकरच प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे नामदार बावनकुळे यांनी सांगीतले. ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद झाल्यावर तो सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागतो. यावर उपाय म्हणुन जिल्हयातील ४८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हयातील २२२ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करून उमेदवारांची नावे महावितरणकडे पाठवली आहेत. लवकरच हे ग्रामविद्युत सेवक हजर होतील अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे