शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:14 IST

कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्ह्यातील शेततळ्यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हयातील शेती पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या शेतात येत्या काळात रोहित्रासकट वीज जोडणी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जा, नवीन आणि नविकरणीय उर्जामंत्री उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.तिरोडा तालुक्यातील ग्राम पांजरा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम महागाव, गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी, गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी या महावितरणच्या ५ उपकेंद्राच्या ई-लोकार्पण. तसेच मुंडीपार, ठाणेगाव, कोकणा, ठाणा, मुल्ला, तिरखेडी, रामनगर, रापेवाडा, गुमधावडा या ९ वीज उपकेंद्राच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. येथील गोरेगाव रोड मार्गावर आयोजीत कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. मंचावर आमदार गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भैरसिंग नागपूरे , केशवराव मानकर, रमेश कुथे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद उपस्थित होते.नामदार बडोले यांनी, एक शेतकरी एक रोहित्र ही योजना अतिशय उपयुक्त असून यामुळे शेतीला मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये पथदिवे व वीज सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने ८१० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. प्रास्तावीक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी मांडले. संचालन श्रीमती मनिषा दुबे व कुमार कोकणे यांनी केले.विद्युत सेवकांची हजेरी लवकरचगोंदिया शहर परिसरातील विजेची समस्या दुर करण्यासाठी २८ कोटी रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात आणखी १८ कोटी रूपयांची कामे करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून याला लवकरच प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे नामदार बावनकुळे यांनी सांगीतले. ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद झाल्यावर तो सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागतो. यावर उपाय म्हणुन जिल्हयातील ४८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हयातील २२२ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करून उमेदवारांची नावे महावितरणकडे पाठवली आहेत. लवकरच हे ग्रामविद्युत सेवक हजर होतील अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे