शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:14 IST

कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्ह्यातील शेततळ्यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हयातील शेती पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या शेतात येत्या काळात रोहित्रासकट वीज जोडणी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जा, नवीन आणि नविकरणीय उर्जामंत्री उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.तिरोडा तालुक्यातील ग्राम पांजरा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम महागाव, गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी, गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी या महावितरणच्या ५ उपकेंद्राच्या ई-लोकार्पण. तसेच मुंडीपार, ठाणेगाव, कोकणा, ठाणा, मुल्ला, तिरखेडी, रामनगर, रापेवाडा, गुमधावडा या ९ वीज उपकेंद्राच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. येथील गोरेगाव रोड मार्गावर आयोजीत कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. मंचावर आमदार गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भैरसिंग नागपूरे , केशवराव मानकर, रमेश कुथे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद उपस्थित होते.नामदार बडोले यांनी, एक शेतकरी एक रोहित्र ही योजना अतिशय उपयुक्त असून यामुळे शेतीला मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये पथदिवे व वीज सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने ८१० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. प्रास्तावीक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी मांडले. संचालन श्रीमती मनिषा दुबे व कुमार कोकणे यांनी केले.विद्युत सेवकांची हजेरी लवकरचगोंदिया शहर परिसरातील विजेची समस्या दुर करण्यासाठी २८ कोटी रूपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात आणखी १८ कोटी रूपयांची कामे करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून याला लवकरच प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे नामदार बावनकुळे यांनी सांगीतले. ग्रामीण भागात वीज पुरवठा बंद झाल्यावर तो सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागतो. यावर उपाय म्हणुन जिल्हयातील ४८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हयातील २२२ ग्रामपंचायतींनी ठराव पारीत करून उमेदवारांची नावे महावितरणकडे पाठवली आहेत. लवकरच हे ग्रामविद्युत सेवक हजर होतील अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे