शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोत गोंदिया राज्यात प्रथम

By admin | Updated: June 18, 2017 00:18 IST

गोंदिया जिल्ह्यात वर्षातून एकदाच पीक घेतले जाते. त्यामुळे डिसेंबर ते जून या काळात गोंदिया

देशातील १७ जिल्ह्यांत समावेश: उद्या दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात वर्षातून एकदाच पीक घेतले जाते. त्यामुळे डिसेंबर ते जून या काळात गोंदिया जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम राहात नाही. त्यामुळे येथील मजुरांचे इतर प्रातांत स्थलांतर होत होते. परंतु सन २०१५-१६ या वर्षात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही बाब ओळखून डिसेंबर ते जून या काळात प्रत्येक दिवशी ९० हजार मजूरांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्था केल्यामुळे जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतरण थांबले होते. परिणामी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सन २०१५-१६ या वर्षात उत्तमरीत्या अमंलबजावणी केल्यामुळे गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला. मग्रारोहयोत देशपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येत असून या गौरवात १७ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत गोंदिया जिल्ह्याने केलेली कामगिरी महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होतीच तसेच देशात टॉप टेन मध्ये होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ६९ हजार मनुष्यबळ दिवसाची निर्मीती केली होती. रोहयोच्या कामावर येणाऱ्या मजूरांची आधार लिंकिंग करण्यात गोंदिया पहिल्या क्रमांकाव होता. या कामावर येणाऱ्या मजूरांना पंतप्रधान विमा योजनेचा लाभ देण्यात आघाडी घेतली होती. ६९ लाख मनुष्यबळ दिवस निर्माण केले. रोहयोच्या कामावर येणाऱ्या मजूरांमध्ये ४० टक्के मजूर मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती, जमातीचे होते. एकूण मजूरांपैकी ६० टक्के महिला मजूरांना कामावर घेण्यात आले होते. १२६ कोटी रूपये खर्च करण्यात आले. त्यापैकी ७० टक्के रक्कम मजूरांच्या वेतनावर खर्च करण्यात आले. या कामातून गोंदिया जिल्ह्यात १८ हजार मालमत्ता निर्माण करण्यात आले. त्यात विहीर व शौचालयांचा समावेश आहे. या कार्यासाठी गोंदिया जिल्ह्याला सोमवारी १९ जून रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी नरेगा अवार्डने सन्मानित केले जाणार आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षात ७८ लाख ७० हजार ९३६ मनुष्यबळ दिवस काम करण्याचे उद्दीट्ये ठेवण्यात आले आहे. परंतु ७३ लाख ५३ हजार ८४२ मनुष्यबळ दिवस काम उपलब्ध करण्यात आले. सन २०१७-१८ मध्ये १५ एप्रिल पर्यंत १९ हजार ५४३ मनुष्यदिवस काम उपलब्ध करण्यात आले. सन २०१६-१७ मध्ये १५७ कोटी २८ लाख ९७ हजार रूपये खर्च करण्यात आले. अकुशल मजूरीवर ११४ कोटी १६ हजार, कुशल मजूरीवर ३६ कोटी ३६ लाख ८ हजार तसेच ६ कोटी ९१ लाख ९८ हजार प्रशासकीय खर्चाचा समावेश आहे. यापूर्वी सन २०१५-१६ मध्ये ७१ लाख ४ हजार ९५३ मनुष्यबळ काम देण्याचे उद्दीट्ये होते. यातून ६९ लाख ५६ हजार ८२८ म्हणजेच ९७.९२ टक्के मनुष्यबळ काम देण्यात आले. देशात टॉप टेन मध्ये गोंदिया मग्रारोहयोच्या कामात उत्तम सादरीकरण करणाऱ्या राज्य, जिल्हा, विभाग व ग्राम पंचायतींना सन २०१५-१६ या वर्षासाठी केंद्रीय पंचायत राज विभागाद्वारे प्रस्ताव मागविण्यात आले होते. ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे महात्मा गांधी जिल्हा स्तरीय मनरेगा पुरस्कारासाठी देशातील १७ जिल्ह्यांची निवड करण्यात आली. यात गोंदिया जिल्हा देशात दहाव्या क्रमांकावर तर राज्यात प्रथम आहे. सदर पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (रोहयो) नरेश भांडारकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे स्वीकारतील. नरेगाच्या कामामध्ये सुसूत्रता आणली जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाची कामे मिळवून दिली. मजूरांना तत्काळ मजूरी मिळण्याची व्यवस्था व नरेगाच्या कामाची वैशिष्टपूर्ण अमलबजावणी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. -विजय सूर्यवंशी, माजी जिल्हाधिकारी, गोंदिया तथा सरंक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव