शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

इलेक्ट्रॉनिक वजनाने ग्राहकांची लूट

By admin | Updated: January 3, 2015 23:06 IST

जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात

गोंदिया : जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात इलेक्ट्रॉनिक वजनात बराच घोळ पहायला मिळत आहे. वजन माप निरीक्षक प्रत्यक्ष भेटीत केवळ नूतनीकरणाची पावती बघून मोकळे होतात. इलेक्ट्रॉनिक काट्यात लहानापासून तर मोठ्यापर्यंत बऱ्याच दुकानात सेटिंग असल्याचे समजते. पाच किलो क्षमतेच्या काट्यात ५० ग्रॅम वजनाची सेटिंग तर १०, २०, ३०, ५०, १००, ५०० किलो वजनाच्या काट्यात दुकानदाराच्या इच्छेने सेटिंग केली जाते. इलेक्ट्रॉनिक काटे विक्रीकरिता घरपोच सेवा असल्याने सेटिंग करण्याला अडचण येत नाही. दुकानदाराच्या समोरच ही व्यवस्था केली जाते. त्यामुळे वर्तमानात ९० टक्के दुकानात इलेक्ट्रॉनिक काट्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्राहकांची पडद्याआडून लूट केली जात आहे. वजन माप निरीक्षकांनी जर हे काटे तपासून सहानिशा केली तर हा प्रकार बंद झाला असता. पण, असे होतांना दिसत नाही.पाकीटबंद वस्तू विक्रीला असताना त्यावर उत्पादक किंमत, वजन, उत्पादन दिनांक योग्यतेची तिथी नोंद असते. उत्पादन स्थानावरु न ही वस्तू हजारो किमीचा प्रवास करीत व्यवहारात हजर होते. यामुळे त्या पाकीटवर उत्पादकांनी लिहिलेले कमी-जास्त प्रमाणात खोडतोड होते. व्यापारीही खरेदी बिल तपासून विक्र ी किंमत ठरवते. मात्र अशावेळी वजनमाप निरीक्षक नेमकी हीच अडचण समोर करुन व्यापाऱ्याला कायद्याच्या कचाट्यात पकडून कार्यवाही कंपनीवर करून दुकानदाराकडून चिरीमिरी मागितली जाते. हा प्रकार दोन वर्षापासून सगळीकडेच जोमात सुरु झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दिशेने तपास करु न सामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)