शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून यातूनच कित्येकदा अपघात घडतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील अतिक्रमणचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अशात हे अतिक्रमण काढण्याचेही ठरले होते. 

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची मोहीम : वाहतुकीसाठी रस्ते केले मोकळे

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढत्या अतिक्रमणामुळे अरूंद असलेले शहरातील रस्ते आणखीच अरूंद होत चालले आहेत. अशात या अतिक्रमणवर आळा घालता यावा व रस्ते मुक्त करता यावे यासाठी नगर परिषद, वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी एकत्र येत संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून यातूनच कित्येकदा अपघात घडतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील अतिक्रमणचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अशात हे अतिक्रमण काढण्याचेही ठरले होते. त्यानुसार, नगर परिषद, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते जयस्तंभ चौक व तेथून म्युनिसिपल शाळेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे आता रस्ते अतिक्रमणात गेलेले रस्ते व फुटपाथ मोकळे झाले आहे. जिल्हाधिकारी मीना व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या मोहिमेत नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, नगर परिषद अभियंता डॉली मदान, उप अभियंता अनिल दाते, रविंद्रनाथ कावडे, मनिष जुनघरे, वीज अभियंता मोनिका वानखेडे, नगर रचनाकार सागर मोगरे, प्रतीक नाकाडे, सौरभ कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खोब्रागडे, आवडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे व या विभागांच्या यंत्रणांनी भाग घेतला होता. 

नागरिकांच्या सहकार्याची गरज रस्त्यांवर वाढत असलेल्या अतिक्रमणमुळे नागरिकांना वाहतुकीला त्रास होतो. कधी-कधी यामुळे अपघातही घडत असून अप्रिय घटनांची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह संबंधीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण