शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून यातूनच कित्येकदा अपघात घडतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील अतिक्रमणचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अशात हे अतिक्रमण काढण्याचेही ठरले होते. 

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची मोहीम : वाहतुकीसाठी रस्ते केले मोकळे

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढत्या अतिक्रमणामुळे अरूंद असलेले शहरातील रस्ते आणखीच अरूंद होत चालले आहेत. अशात या अतिक्रमणवर आळा घालता यावा व रस्ते मुक्त करता यावे यासाठी नगर परिषद, वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी एकत्र येत संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून यातूनच कित्येकदा अपघात घडतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील अतिक्रमणचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अशात हे अतिक्रमण काढण्याचेही ठरले होते. त्यानुसार, नगर परिषद, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते जयस्तंभ चौक व तेथून म्युनिसिपल शाळेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे आता रस्ते अतिक्रमणात गेलेले रस्ते व फुटपाथ मोकळे झाले आहे. जिल्हाधिकारी मीना व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या मोहिमेत नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, नगर परिषद अभियंता डॉली मदान, उप अभियंता अनिल दाते, रविंद्रनाथ कावडे, मनिष जुनघरे, वीज अभियंता मोनिका वानखेडे, नगर रचनाकार सागर मोगरे, प्रतीक नाकाडे, सौरभ कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खोब्रागडे, आवडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे व या विभागांच्या यंत्रणांनी भाग घेतला होता. 

नागरिकांच्या सहकार्याची गरज रस्त्यांवर वाढत असलेल्या अतिक्रमणमुळे नागरिकांना वाहतुकीला त्रास होतो. कधी-कधी यामुळे अपघातही घडत असून अप्रिय घटनांची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह संबंधीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण