शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून यातूनच कित्येकदा अपघात घडतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील अतिक्रमणचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अशात हे अतिक्रमण काढण्याचेही ठरले होते. 

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची मोहीम : वाहतुकीसाठी रस्ते केले मोकळे

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढत्या अतिक्रमणामुळे अरूंद असलेले शहरातील रस्ते आणखीच अरूंद होत चालले आहेत. अशात या अतिक्रमणवर आळा घालता यावा व रस्ते मुक्त करता यावे यासाठी नगर परिषद, वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी एकत्र येत संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून यातूनच कित्येकदा अपघात घडतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील अतिक्रमणचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अशात हे अतिक्रमण काढण्याचेही ठरले होते. त्यानुसार, नगर परिषद, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते जयस्तंभ चौक व तेथून म्युनिसिपल शाळेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे आता रस्ते अतिक्रमणात गेलेले रस्ते व फुटपाथ मोकळे झाले आहे. जिल्हाधिकारी मीना व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या मोहिमेत नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, नगर परिषद अभियंता डॉली मदान, उप अभियंता अनिल दाते, रविंद्रनाथ कावडे, मनिष जुनघरे, वीज अभियंता मोनिका वानखेडे, नगर रचनाकार सागर मोगरे, प्रतीक नाकाडे, सौरभ कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खोब्रागडे, आवडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे व या विभागांच्या यंत्रणांनी भाग घेतला होता. 

नागरिकांच्या सहकार्याची गरज रस्त्यांवर वाढत असलेल्या अतिक्रमणमुळे नागरिकांना वाहतुकीला त्रास होतो. कधी-कधी यामुळे अपघातही घडत असून अप्रिय घटनांची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह संबंधीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण