शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

रस्त्यात खड्डे नव्हे चक्क खड्ड्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:43 IST

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोलीकडे मार्गक्र मण करणार आहे. कोहमारा-वडसा राज्यमहामार्गात रस्त्यात खड्डे नव्हे तर चक्क खड्ड्यातच रस्ते आहेत.याची प्रत्यक्ष अनुभूती येणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दखल

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोलीकडे मार्गक्र मण करणार आहे. कोहमारा-वडसा राज्यमहामार्गात रस्त्यात खड्डे नव्हे तर चक्क खड्ड्यातच रस्ते आहेत.याची प्रत्यक्ष अनुभूती येणार आहे. मात्र मुख्यमंत्री या राज्य महामार्गाने जाणार असल्याने स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभागाने डागडुजी करण्यास प्रारंभ झाला आहे.रविवारी अर्जुनी मोरगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे. त्यानंतर महाजनादेश यात्रा गडचिरोली जिल्ह्यात वडसा-कोहमारा राज्यमार्गाने जाणार आहे. हा मार्ग अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.येथे रस्त्यात खड्डे नाहीत तर खड्डयात रस्ते आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाचे पाणी खड्डयात साचलेले आहे. शिवाय येथून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरु असते.त्यामुळे आधीच जर्जर असलेले रस्ते आणखीच जर्जर होत चालले आहेत. या रस्त्याला केवळ न केवळ मुख्यमंत्री अथवा बांधकाम मंत्र्यांचीच प्रतीक्षा करीत असतात.बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना जनता किंवा वाहतुकीशी सोयरसुतक नसते,हायवेट मंत्र्यांची चिंता असते. आता मुख्यमंत्री येणार त्यांना हेलकावे घ्यावे लागू नये म्हणून रस्ते सजू लागले आहेत.या रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे. हेविवेट नेते या रस्त्याने जाणार तेव्हाच यंत्रणेला डागडुजी करण्याचे कसे सुचते. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.दोन वर्षांपूर्वी या रस्त्याने बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात आगमन झाले होते.त्या वेळी सुद्धा रस्ते नववधू सारखे सजले होते.त्याची पुनरावृत्ती मुख्यमंत्र्याच्या यात्रेनिमित्त होतांना दिसून येत आहे. अशा हेविवेट नेत्यांनी सदैव या रस्त्याने यावे असे आमंत्रण येथील जनतेने दिले आहे.रस्त्याची अवदशा कधी संपणारराज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या मार्गाने गेले. रविवारी मुख्यमंत्री जाणार आहेत.पूर्व विदर्भाच्या नागपूरचे हेविवेट नेते नितीन गडकरी हे केंद्रात बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी देशभरात रस्त्यांचे प्रचंड जाळे विणले. कोटयवधी रुपयांचा खर्च केला जात आहे.मात्र हा राज्य महामार्ग दुर्लक्षतिच आहे. ते मागील ५ वर्षांत या रस्त्याने कारने आले नाहीत, हवेतून आले. त्यामुळे त्यांची या रस्त्यावर दृष्टीच पडली नाही, अन्यथा हा रस्ता केव्हाच नव्याने तयार होऊन लोकसेवेसाठी तत्पर असता नागरिक बोलतात.बांधकाम विभाग मोकळाया मार्गावर येरंडी ते देऊळगाव फाटा तसेच आसोली ते वडसापर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.इटखेडा ते खामखुरा रस्त्यावरही ठीकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहन कुठून हाकावे असा प्रश्न पडतो.खड्डयात पाणी साचलेले असल्याने खड्डा असल्याचे लक्षातच येत नाही. परिणामत: वाहन उसळून अनेक अपघात यापूर्वी घडले आहेत.जीवीतहानी सुध्दा झाली आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी अद्यापही याची गंभीर नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा