शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

रिमझीम पावसाने उभ्या धानपिकाला जीवदान

By admin | Updated: October 13, 2014 23:22 IST

हुडहुड या चक्रीवादळाने आंध्र व ओरिसा या राज्यांना चांगलेच झोडपून काढले असतानाच महाराष्ट्रातही पावसाळा पुन्हा परतून आल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारच्या (दि.१२)

गोंदिया : हुडहुड या चक्रीवादळाने आंध्र व ओरिसा या राज्यांना चांगलेच झोडपून काढले असतानाच महाराष्ट्रातही पावसाळा पुन्हा परतून आल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारच्या (दि.१२) सायंकाळपासून अचानकच पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. यापावसाने सोमवारीही (दि.१३) उसंत दिली नाही. संततधार पावसाने जनजव्ीान विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सकाळपर्यंत ५१.७ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या पावसामुळे धानाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला. मात्र शेतात कापून ठेवलेल्या हलक्या धानासाठी हा पाऊस नुकसानकारक ठरला आहे.आंध्र व ओरीसा या राज्यांसाठी शाप ठरणारा हुडहुड चक्रीवादळ पावसाच्या रूपाने महाराष्ट्रासाठीही नुकसानदायक ठरला. या चक्रीवादळाचे पडसाद असे उमटले की रविवारपासून (दि.१२) पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. रात्रभर बरसलेल्या या पावसाने सोमवारीही (दि.१३) आपला जोर दाखवून देत जनजिवन विस्कळीत सोडले. पावसाची सकाळपर्यंतची आकडेवारी बघितल्यास यात, गोंदिया तालुक्यात १३ मिमी., तिरोडा २ मिमी., गोरेगाव १३.३ मिमी., देवरी ९ मिमी., आमगाव ७.४ मिमी., सालेकसा २ मिमी., सडक अर्जुनी ७ मिमी. बरसला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाऊस बरसला नसल्याची नोंद आहे. अशाप्रकारे सकाळपर्यंत एकूण ५१.७ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून सोमवारी रात्री पर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. (शहर प्रतिनिधी)