शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

राइस पार्कचे आश्वासन अधांतरीच; केव्हा होईल पूर्ण, शेतकऱ्यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 14:34 IST

चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : गोंदिया जिल्ह्यात धान पीक घेतले जाते. येथे राइस पार्क व गोदामाची समस्या यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, हे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी येथील सभेत दिले होते. पण अद्याप या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. व्यावरून आश्वासन केवळ देण्यासाठीच असतात का?, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीया संस्थेमार्फत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर १५ ते १७ फेब्रुवारी २०१८ रोजी संपन्न झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस येथे आले होते. पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत राइस पार्क झाले पाहिजे. राइस पार्कला मान्यता देऊन चांगल्याप्रकारे संशोधनात्मक कार्य या राइस पार्कमध्ये व्हावं आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळावी, असे आश्वासित केले होते. सोबतच गोदामाचे प्रॉब्लेम आहेत ते तत्काळ दूर करणार. या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत उचित मालाचा दाम पोहोचला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले होते.

उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा ठेवून हमी भावाचे दर ठरविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले असल्याचे ते १६ फेब्रुवारी २०१८ रोजी भाषणात म्हणाले. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजप सत्तेत आली नाही. मात्र, अडीच वर्षांनंतर भाजप सत्तेत आहे. फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. गेल्या चार वर्षांपासून या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. गतवर्षी गोदाम नसल्याने व हमी भावाने साठवणूक केलेल्या जुन्या धानाची उचल झाली नाही म्हणून वेळेवर हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत, हे सर्वश्रुत आहे. उपमुख्यमंत्री महोदय आता आपण सत्तेत आहात. नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. आतातरी आपण दिलेले शब्द नव्हे आश्वासन पाळणार का?, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

बोनसचेही केवळ आश्वसन

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी सरकार अनुकूल असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात. यासाठी उपसमिती गठित करण्यात आली आहे. पण अद्याप बोनस संदर्भातील निर्णय झाला नाही. त्यामुळे हेसुद्धा राइस पार्कसारखे पोकळ आश्वासन ठरणार का?

टॅग्स :agricultureशेतीgondiya-acगोंदिया