शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

पीएम किसानचे पैसै परत करा, नाही तर चढणार सातबारावर बोजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 05:00 IST

मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणारे शेतकरी पैसे परत करत नसल्याने आता या शेतकऱ्यांच्या सातबारावर बाेजा चढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी व अधिकारीसुद्धा घेत असल्याची बाब सर्वेक्षणात पुढे आली. गोंदिया जिल्ह्यात २९६९ आयकर भरणारे शेतकरी असून त्यांना जिल्हा प्रशासनाने नाेटीस बजावून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्यास सांगितले. मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणारे शेतकरी पैसे परत करत नसल्याने आता या शेतकऱ्यांच्या सातबारावर बाेजा चढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पीएम किसानचे पैसे परत केले नाही तर सातबारावर बोजा चढून पुढे समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच रक्कम परत करावी लागणार आहे. 

पैस परत न केल्यास चढणार सातबारावर बोजा आयकर भरणारे शेतकरीसुद्धा पीएम किसान सन्मान योजनेच्या पेन्शनचा लाभ घेतली असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना नोटीस बजावून पेन्शन स्वरुपात घेतलेले पैसे परत करण्यासाठी नोटीस बजावली. मागील चार वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे पण त्यानंतरही दीड हजारांवर शेतकऱ्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर आता बाेजा चढविला जाणार आहे. 

१ कोटी २५ लाख रुपये झाले वसूल - जिल्ह्यात आयकर भरणारे २९६९ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतंर्गत २ कोटी ७५ लाख रुपयांचे पेन्शन स्वरूपात रक्कम घेतली होती. महसूल विभागाने या शेतकऱ्यांना नोटीस बजाविल्यानंतर १०९४ शेतकऱ्यांनी १ कोटी २५ लाख रुपये शासनाकडे जमा केले. 

१ कोटी २७ लाख रुपये लटकले- जिल्ह्यात आयकर भरणारे २९६९ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतंर्गत २ कोटी ७५ लाख रुपयांचे पेन्शन स्वरूपात रक्कम घेतली होती. यापैकी १०९४ शेतकऱ्यांनी रक्कम परत केली तर १९५४ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली नाही. 

शेतकऱ्यांनो ३१ जुलैपर्यंत करा केवायसी पीएम किसान पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील ८२ हजार शेतकरी केवायसी करण्यापासून वंचित असल्याने शासनाने केवायसी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना