शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पीएम किसानचे पैसै परत करा, नाही तर चढणार सातबारावर बोजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 05:00 IST

मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणारे शेतकरी पैसे परत करत नसल्याने आता या शेतकऱ्यांच्या सातबारावर बाेजा चढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी व अधिकारीसुद्धा घेत असल्याची बाब सर्वेक्षणात पुढे आली. गोंदिया जिल्ह्यात २९६९ आयकर भरणारे शेतकरी असून त्यांना जिल्हा प्रशासनाने नाेटीस बजावून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत घेतलेल्या पेन्शनची रक्कम परत करण्यास सांगितले. मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणारे शेतकरी पैसे परत करत नसल्याने आता या शेतकऱ्यांच्या सातबारावर बाेजा चढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पीएम किसानचे पैसे परत केले नाही तर सातबारावर बोजा चढून पुढे समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच रक्कम परत करावी लागणार आहे. 

पैस परत न केल्यास चढणार सातबारावर बोजा आयकर भरणारे शेतकरीसुद्धा पीएम किसान सन्मान योजनेच्या पेन्शनचा लाभ घेतली असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना नोटीस बजावून पेन्शन स्वरुपात घेतलेले पैसे परत करण्यासाठी नोटीस बजावली. मागील चार वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे पण त्यानंतरही दीड हजारांवर शेतकऱ्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर आता बाेजा चढविला जाणार आहे. 

१ कोटी २५ लाख रुपये झाले वसूल - जिल्ह्यात आयकर भरणारे २९६९ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतंर्गत २ कोटी ७५ लाख रुपयांचे पेन्शन स्वरूपात रक्कम घेतली होती. महसूल विभागाने या शेतकऱ्यांना नोटीस बजाविल्यानंतर १०९४ शेतकऱ्यांनी १ कोटी २५ लाख रुपये शासनाकडे जमा केले. 

१ कोटी २७ लाख रुपये लटकले- जिल्ह्यात आयकर भरणारे २९६९ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतंर्गत २ कोटी ७५ लाख रुपयांचे पेन्शन स्वरूपात रक्कम घेतली होती. यापैकी १०९४ शेतकऱ्यांनी रक्कम परत केली तर १९५४ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली नाही. 

शेतकऱ्यांनो ३१ जुलैपर्यंत करा केवायसी पीएम किसान पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील ८२ हजार शेतकरी केवायसी करण्यापासून वंचित असल्याने शासनाने केवायसी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना