शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

परतीच्या पावसाने धानपिकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली पिकांची पाहणी : सर्वेक्षण करुन अहवाल सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : परतीच्या पावसाने तालुक्याच्या खामखुरा, हेटी, कोरंभी,अरुणनगर शिवारात धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.१२) आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी या गावाला भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ताबडतोब सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले.अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.अनेक शेतात धान अक्षरशः लोळलेले आहे. उभ्या धानपिकात पाणी साचले आहे. अधिक दिवसात निघणाऱ्या वाणाला पाऊस फायदेशीर समजला जात असला तरी नेमके हेच धानपिक लोळलेले दिसून येत आहे. यात विशेषतः जय श्रीराम व आरपीएन या वाणाला जबर फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खामखुरा येथील विलास दुनेदार यांचेकडे सात एकर शेती आहे. संपूर्ण शेतात धानपिक लागवड केली आहे. सुमारे पाच एकर शेतातील धान लोळलेले आहे. एरव्ही एका एकरात २५ पोती धानपिक येत होते.यावेळी एकरी १०ते १२ पोती उत्पादन येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. धानाचा दाणा भरण्यापूर्वीच शेतातील उभा धान कोसळल्याचे ते म्हणाले. यासोबतच संजय राऊत खामखुरा व सुरेश झोडे, पंढरी झोडे,निताराम झोडे रा. हेटी यांनीही आपले मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. ओमप्रकाश संग्रामे यांनी पाच एकरात जय श्रीराम या धान वाणाची लागवड केली.अर्ध्याहून अधिक शेतातील धान लोळल्याचे सांगितले. अरुणनगर या बंगाली वसाहतीतील शेतकऱ्यांनी तर २५ टक्के शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले.येथील शेतकऱ्यांचे नेतृत्व सरपंच बाबूल बनिक यांनी केले. यावेळी अमूल्य हलदार,अजित हलदार, राधेश्याम मंडल, गौरपाद मंडल, शांती वैद्य, देवेन्द्र गोरख पांडे, निखील रंगदार, पुलिद बाला, हरिदास महालदार,निर्मल मल्लीक, निर्मल बाईन, मेनका सरकार यांनीही आ.चंद्रिकापुरे यांना नुकसानीची माहिती दिली. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, निप्पल बरय्या, कृषी सहायक,तलाठी उपस्थित होते.तातडीने पंचनामे करा - आ.चंद्रिकापुरेपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निमार्ण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धानपिक सुस्थितीत असताना परतीच्या पावसाने दगा दिला आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची व्यवस्था करावी असे उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्याशी बोलणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस