शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

परतीच्या पावसाने धानपिकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली पिकांची पाहणी : सर्वेक्षण करुन अहवाल सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : परतीच्या पावसाने तालुक्याच्या खामखुरा, हेटी, कोरंभी,अरुणनगर शिवारात धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.१२) आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी या गावाला भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ताबडतोब सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले.अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.अनेक शेतात धान अक्षरशः लोळलेले आहे. उभ्या धानपिकात पाणी साचले आहे. अधिक दिवसात निघणाऱ्या वाणाला पाऊस फायदेशीर समजला जात असला तरी नेमके हेच धानपिक लोळलेले दिसून येत आहे. यात विशेषतः जय श्रीराम व आरपीएन या वाणाला जबर फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खामखुरा येथील विलास दुनेदार यांचेकडे सात एकर शेती आहे. संपूर्ण शेतात धानपिक लागवड केली आहे. सुमारे पाच एकर शेतातील धान लोळलेले आहे. एरव्ही एका एकरात २५ पोती धानपिक येत होते.यावेळी एकरी १०ते १२ पोती उत्पादन येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. धानाचा दाणा भरण्यापूर्वीच शेतातील उभा धान कोसळल्याचे ते म्हणाले. यासोबतच संजय राऊत खामखुरा व सुरेश झोडे, पंढरी झोडे,निताराम झोडे रा. हेटी यांनीही आपले मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. ओमप्रकाश संग्रामे यांनी पाच एकरात जय श्रीराम या धान वाणाची लागवड केली.अर्ध्याहून अधिक शेतातील धान लोळल्याचे सांगितले. अरुणनगर या बंगाली वसाहतीतील शेतकऱ्यांनी तर २५ टक्के शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले.येथील शेतकऱ्यांचे नेतृत्व सरपंच बाबूल बनिक यांनी केले. यावेळी अमूल्य हलदार,अजित हलदार, राधेश्याम मंडल, गौरपाद मंडल, शांती वैद्य, देवेन्द्र गोरख पांडे, निखील रंगदार, पुलिद बाला, हरिदास महालदार,निर्मल मल्लीक, निर्मल बाईन, मेनका सरकार यांनीही आ.चंद्रिकापुरे यांना नुकसानीची माहिती दिली. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, निप्पल बरय्या, कृषी सहायक,तलाठी उपस्थित होते.तातडीने पंचनामे करा - आ.चंद्रिकापुरेपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निमार्ण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धानपिक सुस्थितीत असताना परतीच्या पावसाने दगा दिला आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची व्यवस्था करावी असे उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्याशी बोलणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस