शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

परतीच्या पावसाने धानपिकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली पिकांची पाहणी : सर्वेक्षण करुन अहवाल सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : परतीच्या पावसाने तालुक्याच्या खामखुरा, हेटी, कोरंभी,अरुणनगर शिवारात धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.१२) आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी या गावाला भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ताबडतोब सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले.अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.अनेक शेतात धान अक्षरशः लोळलेले आहे. उभ्या धानपिकात पाणी साचले आहे. अधिक दिवसात निघणाऱ्या वाणाला पाऊस फायदेशीर समजला जात असला तरी नेमके हेच धानपिक लोळलेले दिसून येत आहे. यात विशेषतः जय श्रीराम व आरपीएन या वाणाला जबर फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खामखुरा येथील विलास दुनेदार यांचेकडे सात एकर शेती आहे. संपूर्ण शेतात धानपिक लागवड केली आहे. सुमारे पाच एकर शेतातील धान लोळलेले आहे. एरव्ही एका एकरात २५ पोती धानपिक येत होते.यावेळी एकरी १०ते १२ पोती उत्पादन येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. धानाचा दाणा भरण्यापूर्वीच शेतातील उभा धान कोसळल्याचे ते म्हणाले. यासोबतच संजय राऊत खामखुरा व सुरेश झोडे, पंढरी झोडे,निताराम झोडे रा. हेटी यांनीही आपले मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. ओमप्रकाश संग्रामे यांनी पाच एकरात जय श्रीराम या धान वाणाची लागवड केली.अर्ध्याहून अधिक शेतातील धान लोळल्याचे सांगितले. अरुणनगर या बंगाली वसाहतीतील शेतकऱ्यांनी तर २५ टक्के शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले.येथील शेतकऱ्यांचे नेतृत्व सरपंच बाबूल बनिक यांनी केले. यावेळी अमूल्य हलदार,अजित हलदार, राधेश्याम मंडल, गौरपाद मंडल, शांती वैद्य, देवेन्द्र गोरख पांडे, निखील रंगदार, पुलिद बाला, हरिदास महालदार,निर्मल मल्लीक, निर्मल बाईन, मेनका सरकार यांनीही आ.चंद्रिकापुरे यांना नुकसानीची माहिती दिली. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, निप्पल बरय्या, कृषी सहायक,तलाठी उपस्थित होते.तातडीने पंचनामे करा - आ.चंद्रिकापुरेपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निमार्ण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धानपिक सुस्थितीत असताना परतीच्या पावसाने दगा दिला आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची व्यवस्था करावी असे उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्याशी बोलणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस