शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

परतीच्या पावसाने १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला.

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण : शासनाला पाठविणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा खरीप हंगामातील १४०० हेक्टरमधील धानाला फटका बसला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे ३३ टक्केहून अधिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तयार केला असून तो लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला. यंदा जवळपास ४० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी हलक्या धानाची लागवड केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी या धानाची कापणी देखील केली होती. तर काही शेतकऱ्यांनी मळणी सुरु केली होती. मात्र याच दरम्यान सलग आठवडाभर पाऊस झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर संपूर्ण हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले आहे. यात १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.याबाबतचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. हा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.केवळ २०६ शेतकऱ्यांच्या तक्रारीपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागते. मागील महिन्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र विमा कंपनीकडे केवळ २०६ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण कृषी विभागातंर्गत करण्यात आले. १४०० हेक्टरमधील पिकांना याचा फटका बसला असून यासंबंधिचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येईल.- गणेश घोरपडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती