शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोमातेच्या विक्रीस लागणार लगाम

By admin | Updated: September 18, 2015 01:34 IST

पहिलीच्या पुस्तकापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गाय ही माता असल्याची शिकवण दिली जाते.

गर्रा (खुर्द) गौग्राम घोषित : शेण खतानेच केली जाणार शेती गोंदिया : पहिलीच्या पुस्तकापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गाय ही माता असल्याची शिकवण दिली जाते. शिक्षीत ही शिकवण विसरले असून मातेचीच हत्या केली जात आहे. मात्र तालुक्यातील गर्रा (खुर्द) येथील गावकऱ्यांना ती शिकवण आठवून असून त्यांनी गावाला गौग्राम घोषीत केले आहे. आता या गावातील कुणीही गायीची विक्री करणार नाही तसेच शेतीत रासायनीक खतांचा वापर सोडून फक्त शेणखताचाच वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी गावातील महिलांनी मंडळाची स्थापना केली असून त्यांनीच या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून तिचे पूजन केले जाते. आज मात्र आपल्या फायद्यासाठी त्या मातेचीच विक्री केली जात असल्याचे दिसून येते. आपल्या स्वार्थासाठी होत असलेल्या गोहत्येच्या या प्रकारावर आळा घालण्यासाठी ग्राम गर्रा येथे महिलांनी पुढाकार घेत १० सप्टेंबर रोजी सभा घेऊन साईधाम महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळाने आता पुढे गावातील कुणीही गाईची विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कार्यासह गावात शांती व धार्मिकतेचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशातून साईंची शोभायात्रा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लगतच्या ग्राम गोंडीटोला व लोधीटोला येथे शोभायात्रा काढण्यात आली. यासह धनंजय तुरकर यांच्या हस्ते गर्रा येथे आरती व महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. तर याप्रसंगी मंहिला मंडळाद्वारा घोषीत गौग्रामच्या पोस्टरचे प्रकाशनही तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपले दूधच काय तर शरिरातील प्रत्येक अवयवातून मानवजातीला फायदाच मिळवून देणाऱ्या गौमातेचे उपकार फेडता येणार नाही. मात्र तिच्या प्रती असलेली मानवाची काही जबाबदारी पार पाडता यावी यासाठी महिला मंडळाने घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करण्याचे व या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळातील दिपा दरवडे, सुषमा गावड, शालू शहारे, सरीता तुरकर, सिंधू भोयर, तिरूकला तुरकर, गुणवंता तुरकर, केसर भोयर, कमला कुंभीरकर, ललीता तुरकर, निर्मला ठाकरे, दिपीका बोपचे, वंदना दिहारी, शशीकला न्यायकरे, ज्ञानेश्वरी तुरकर, मानवी बोपचे, नीलावंती तुरकर, वंदना रहांगडाले, छन्नू टेंभरे, वर्षा पटले, छमेश्वरी रहांगडाले, कुंदा दरवडे आदिंनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)शेण खताचा वापर व प्रक्रिया केंद्र सुरू करणार पिकांसाठी शेणखतापेक्षा महत्वपूर्ण खत दुसरे कोणतेही नसताना रासायनिक खतांचा भरमसाट वापर करून खाद्यान्न विषारी केले जात आहे. मात्र आता हा प्रकार गर्रा येथे चालणार नसल्याचा निर्णय महिला मंडळाने घेतला आहे. गावातील कुणीही गौमातेची विक्री करणार नसतानाच आता शेणखताचा वापरही आपल्या शेतात क रावयाचा असून त्यातूनच पीक घ्यायची आहेत. शिवाय धान शेती झाल्यावर उर्वरित सहा महिन्यांच्या काळात भाजीपाला, फळ व गायीच्या चाऱ्यासाठी गवताची लागवड केली जाईल. तसेच गाईचे दूध बाहेर न विकता गावातच खोवा, पनीर, तूप व मिठाई निर्मितीसाठी प्रक्रिया केंद्र सुरू केले जाईल व यातून गावचा विकास होणार असल्याचे साई कुष्ठ व एड्स सेवा संस्था अध्यक्ष अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांनी कळविले.