शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

गोमातेच्या विक्रीस लागणार लगाम

By admin | Updated: September 18, 2015 01:34 IST

पहिलीच्या पुस्तकापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गाय ही माता असल्याची शिकवण दिली जाते.

गर्रा (खुर्द) गौग्राम घोषित : शेण खतानेच केली जाणार शेती गोंदिया : पहिलीच्या पुस्तकापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गाय ही माता असल्याची शिकवण दिली जाते. शिक्षीत ही शिकवण विसरले असून मातेचीच हत्या केली जात आहे. मात्र तालुक्यातील गर्रा (खुर्द) येथील गावकऱ्यांना ती शिकवण आठवून असून त्यांनी गावाला गौग्राम घोषीत केले आहे. आता या गावातील कुणीही गायीची विक्री करणार नाही तसेच शेतीत रासायनीक खतांचा वापर सोडून फक्त शेणखताचाच वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी गावातील महिलांनी मंडळाची स्थापना केली असून त्यांनीच या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून तिचे पूजन केले जाते. आज मात्र आपल्या फायद्यासाठी त्या मातेचीच विक्री केली जात असल्याचे दिसून येते. आपल्या स्वार्थासाठी होत असलेल्या गोहत्येच्या या प्रकारावर आळा घालण्यासाठी ग्राम गर्रा येथे महिलांनी पुढाकार घेत १० सप्टेंबर रोजी सभा घेऊन साईधाम महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळाने आता पुढे गावातील कुणीही गाईची विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कार्यासह गावात शांती व धार्मिकतेचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशातून साईंची शोभायात्रा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लगतच्या ग्राम गोंडीटोला व लोधीटोला येथे शोभायात्रा काढण्यात आली. यासह धनंजय तुरकर यांच्या हस्ते गर्रा येथे आरती व महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. तर याप्रसंगी मंहिला मंडळाद्वारा घोषीत गौग्रामच्या पोस्टरचे प्रकाशनही तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आपले दूधच काय तर शरिरातील प्रत्येक अवयवातून मानवजातीला फायदाच मिळवून देणाऱ्या गौमातेचे उपकार फेडता येणार नाही. मात्र तिच्या प्रती असलेली मानवाची काही जबाबदारी पार पाडता यावी यासाठी महिला मंडळाने घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करण्याचे व या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळातील दिपा दरवडे, सुषमा गावड, शालू शहारे, सरीता तुरकर, सिंधू भोयर, तिरूकला तुरकर, गुणवंता तुरकर, केसर भोयर, कमला कुंभीरकर, ललीता तुरकर, निर्मला ठाकरे, दिपीका बोपचे, वंदना दिहारी, शशीकला न्यायकरे, ज्ञानेश्वरी तुरकर, मानवी बोपचे, नीलावंती तुरकर, वंदना रहांगडाले, छन्नू टेंभरे, वर्षा पटले, छमेश्वरी रहांगडाले, कुंदा दरवडे आदिंनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)शेण खताचा वापर व प्रक्रिया केंद्र सुरू करणार पिकांसाठी शेणखतापेक्षा महत्वपूर्ण खत दुसरे कोणतेही नसताना रासायनिक खतांचा भरमसाट वापर करून खाद्यान्न विषारी केले जात आहे. मात्र आता हा प्रकार गर्रा येथे चालणार नसल्याचा निर्णय महिला मंडळाने घेतला आहे. गावातील कुणीही गौमातेची विक्री करणार नसतानाच आता शेणखताचा वापरही आपल्या शेतात क रावयाचा असून त्यातूनच पीक घ्यायची आहेत. शिवाय धान शेती झाल्यावर उर्वरित सहा महिन्यांच्या काळात भाजीपाला, फळ व गायीच्या चाऱ्यासाठी गवताची लागवड केली जाईल. तसेच गाईचे दूध बाहेर न विकता गावातच खोवा, पनीर, तूप व मिठाई निर्मितीसाठी प्रक्रिया केंद्र सुरू केले जाईल व यातून गावचा विकास होणार असल्याचे साई कुष्ठ व एड्स सेवा संस्था अध्यक्ष अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांनी कळविले.