शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित ग्रामसेवकांना पुनर्स्थापित करा

By admin | Updated: February 7, 2017 00:54 IST

जिल्ह्यातील ५५१ ग्रामपंचायतींचा कारभार ३५० ग्रामसेवक सांभाळतात.

ग्रामसेवक युनियनची मागणी : उपमुख्य कार्यपालन अधिकारी देतात त्रासगोंदिया : जिल्ह्यातील ५५१ ग्रामपंचायतींचा कारभार ३५० ग्रामसेवक सांभाळतात. विपरीत परिस्थितीत जिद्द व चिकाटीने काम करणाऱ्या ग्रामसेवकांना उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागडे त्रास देत असून ते निलंबीत ग्रामसेवकांना पुनर्स्थापीत करीत नाही. यामुळे त्यांचे विरोधात ग्रामसेवकांचा आक्रोश असून त्रास देणाऱ्या बागडे यांच्यावर कारवाई करावी व ग्रामसेवकांना पुर्नस्थापित करावे, अशी मागणी ग्रामसेवकांनी एका पत्रातून केली आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तसेच जंगलाने व्यापलेला असून शासनाच्या लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक करतात. हे काम करताना त्याच्या समोर विविध आव्हाने समोर उभी राहत असतात. तरी ही उपमुख्य कार्यपालन अधिकारी बागडे त्यांना दमदाटी देऊन असभ्य शब्दांचा वापर करतात. दबावतंत्र टाकून आर्थिक पिळवणूक करण्याचे काम करतात. त्यांची मागणी पूर्ण न केल्यास निलंबीत करतात. जिल्ह्यातील २३ ग्रामसेवक आतापर्यंत निलंबीत झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सात लोकांना पकडले. मात्र इतरांना का निलंबीत करण्यात आले. तणावात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना वेठीस धरणे ते योग्य नाही.या अन्यायाविरुध्द लढून सामूहिक राजीनामा देण्याचा विचार आमच्या संघटनेचा असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण, प्रदीप ठाकरे, कमलेश बिसेन, वनिता कांबळे, पी.बी.कटरे, एल.आर.ठाकरे, योगेश रुद्रकार, सुनिल पटले व इतरांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)२३ ग्रामसेवकांपैकी सात ग्रामसेवकांना एसीबीने पकडले. तर काहींवर फौजदारी गुन्हे दाखल झाले. ज्यांनी शासनाचा निधीची अफरातफर केली तेच निलंबित करण्यात आले आहे. रेकार्ड न ठेवणाऱ्या ग्रामसेवकांच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्या त्यानंतर रितसर चौकशी करूनच निलंबित करण्यात आले.-राजेश बागडेउपमुख्य कार्यपालन अधिकारी, पंचायत जि.प. गोंदिया.