शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:35 IST

शहरातील महत्त्वपूर्ण अशा अग्निशमन विभागाचा कारभार मागील पाच वर्षांपासून प्रभारावर चालत आहे. सन २०१२ पासूनचा हा प्रकार असून सध्या विभागातील लिडींग फायरमनकडे विभागाचा प्रभार देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासूनचा प्रकार : लिडींग फायरमनकडे दिला प्रभार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील महत्त्वपूर्ण अशा अग्निशमन विभागाचा कारभार मागील पाच वर्षांपासून प्रभारावर चालत आहे. सन २०१२ पासूनचा हा प्रकार असून सध्या विभागातील लिडींग फायरमनकडे विभागाचा प्रभार देण्यात आला आहे. यातून नगर परिषदेतील कारभाराची प्रचिती येते. नगर परिषदेकडून या विषयावर पाठपुरावा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र मागील पाच वर्षात या विषयात नगर परिषदेच्या हाती काहीच लागले नाही हे विशेष.शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभाग म्हणजे एक महत्वपूर्ण व जबाबदार विभाग आहे. आगीची एखादी घटना घडल्यास हा विभाग किती महत्वाचा आहे याची प्रचिती येते. मात्र गोंदिया शहराची कमनशिबीच म्हणावी लागेल की एवढ्या महत्वाच्या या विभागाला प्रभाराचे ग्रहण लागले आहे. मागील पाच वर्षांपासून या विभागाला मुख्य अग्निशमन अधिकारी लाभलेले नाही. परिणामी विभागातील कर्मचाºयांना त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार प्रभार देण्याचे काम सुरू आहे.सन २०१२ मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी जी.एच.ब्राम्हणकर सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच अग्निशमन विभागाला प्रभाराचे ग्रहण लागले आहे. ब्राम्हणकर गेल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकाºयांचा प्रभार प्रकाश कापसे यांच्याकडे देण्यात आला होता. आता मात्र कापसे ३१ आॅक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने पुन्हा रिक्त झालेली ही खुर्ची आता लिडींग फायरमन सी.एल.पटले यांच्याकडे देण्यात आली आहे. मागील पाच वर्षांपासून अग्निशमन विभागात हा प्रकार सुरू आहे.नगर परिषद प्रशासनाकडून या विषयाला घेऊन पाठपुरावा केला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र यात वास्तवीकता किती हेच कळत नाही. कारण, सन २०१२ पासून प्रयत्न सुरू असूनही एवढ्या महत्त्वपूर्ण विषयाकडे शासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने एकतर नगर परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी कमी पडत असतील. नाही तर शासनाला गोंदिया शहर व शहरातील जनतेशी काहीच घेणे नाही असे समजावे अशा प्रतिक्रिया आता शहरवासी देत आहेत. त्यामुळे आता आणखी किती काळ येथील अग्निशमन विभागाचा कारभार प्रभारावर चालतो हे बघायचे आहे.हॉटेल बिंदलच्या घटनेने कारभार उजेडातशहरातील हॉटेल बिंदलमध्ये आग लागल्याची घटना अत्यंत दुर्देवी घडली. याप्रसंगी अदानीच्या अग्निशामकांचा मोठा आधार झाला होता. येथील अग्निशमन विभागानेही पाहिजे तसे प्रयत्न केले होते. मात्र या घटनेने येथील अग्निशमन विभाग किती तत्पर आहे हे उजेडात आणले होते. विभागाकडे जबाबदार प्रमुखच नसल्याने त्या विभागाचा कारभार कसा चालणार हे सांगायची गोष्ट नाही.मुख्य अग्निशमन अधिकाºयांचे पद भरावे यासाठी सप्टेंबर महिन्यापासून दोन वेळा प्रधान सचिवांसोबत बैठका झाल्या आहेत. यात अतिरिक्त पदे भरण्याचीही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र अग्निशमन संचालनालयाच्या संचालकांनीही ८० पदे मंजूर करण्याबाबतचे शिफारस पत्र शासनाकडे पाठविले आहे. आमच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे.- चंदन पाटीलमुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.