शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

निवेदनांवर कारवाई करून लेखी उत्तर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

गोंदिया : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव येथे बुधवारी (दि. २७) आयोजित केलेल्या जनता ...

गोंदिया : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव

येथे बुधवारी (दि. २७) आयोजित केलेल्या जनता दरबारात भरपूर प्रमाणात निवेदन आलेत. धान खरेदी, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, घरकुल पट्टे, वन हक्क पट्टे व रोजगार हमीची कामे या समस्यांचा यात प्रमुख्याने समावेश होता. आलेल्या प्रत्येक निवेदनावर त्या-त्या विभागाने कारवाई करून लवकरात लवकर लेखी उत्तर दयावे, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा

परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सोपविले.

निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन व त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा नागरिकांनी लेखी निवेदन सादर करून जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नाही, दवाखान्यात स्वच्छता राहत नसल्याच्या

तक्रारी यावेळी करण्यात आल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी प्रश्न मांडला. पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याबाबत निवेदन, रोजंदारी नोकर भरती, वीजपुरवठा, कृषी पंप वीज जोडणी, पीक विमा लाभ, वनहक्क पट्टे, आदी विषयांवरील निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या सगळ्या निवेदनांवर संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, शेतकऱ्यांच्या धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडविण्यात येतील. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून मक्याची शेती केली तर नक्कीच फायदा होईल, असे सांगितले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी, आपला जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उषा चौधरी यांनी मांडले. आभार तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला अर्जुनी-मोरगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

धान खरेदीबाबतच सर्वाधिक निवेदन

यावेळी धान खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात निवेदन प्राप्त झाले. धान उत्पादक शेतकऱ्यांचा सगळा धान खरेदी

करण्यात येईल. कोणाचेही धान शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. धान भरडाई बाबत

लवकरच मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.