शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

निवेदनांवर कारवाई करून लेखी उत्तर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

गोंदिया : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव येथे बुधवारी (दि. २७) आयोजित केलेल्या जनता ...

गोंदिया : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव

येथे बुधवारी (दि. २७) आयोजित केलेल्या जनता दरबारात भरपूर प्रमाणात निवेदन आलेत. धान खरेदी, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, घरकुल पट्टे, वन हक्क पट्टे व रोजगार हमीची कामे या समस्यांचा यात प्रमुख्याने समावेश होता. आलेल्या प्रत्येक निवेदनावर त्या-त्या विभागाने कारवाई करून लवकरात लवकर लेखी उत्तर दयावे, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा

परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सोपविले.

निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन व त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा नागरिकांनी लेखी निवेदन सादर करून जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नाही, दवाखान्यात स्वच्छता राहत नसल्याच्या

तक्रारी यावेळी करण्यात आल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी प्रश्न मांडला. पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याबाबत निवेदन, रोजंदारी नोकर भरती, वीजपुरवठा, कृषी पंप वीज जोडणी, पीक विमा लाभ, वनहक्क पट्टे, आदी विषयांवरील निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या सगळ्या निवेदनांवर संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, शेतकऱ्यांच्या धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडविण्यात येतील. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून मक्याची शेती केली तर नक्कीच फायदा होईल, असे सांगितले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी, आपला जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उषा चौधरी यांनी मांडले. आभार तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला अर्जुनी-मोरगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

धान खरेदीबाबतच सर्वाधिक निवेदन

यावेळी धान खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात निवेदन प्राप्त झाले. धान उत्पादक शेतकऱ्यांचा सगळा धान खरेदी

करण्यात येईल. कोणाचेही धान शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. धान भरडाई बाबत

लवकरच मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.