शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

निवेदनांवर कारवाई करून लेखी उत्तर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

गोंदिया : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव येथे बुधवारी (दि. २७) आयोजित केलेल्या जनता ...

गोंदिया : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव

येथे बुधवारी (दि. २७) आयोजित केलेल्या जनता दरबारात भरपूर प्रमाणात निवेदन आलेत. धान खरेदी, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, घरकुल पट्टे, वन हक्क पट्टे व रोजगार हमीची कामे या समस्यांचा यात प्रमुख्याने समावेश होता. आलेल्या प्रत्येक निवेदनावर त्या-त्या विभागाने कारवाई करून लवकरात लवकर लेखी उत्तर दयावे, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा

परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सोपविले.

निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन व त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा नागरिकांनी लेखी निवेदन सादर करून जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नाही, दवाखान्यात स्वच्छता राहत नसल्याच्या

तक्रारी यावेळी करण्यात आल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी प्रश्न मांडला. पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याबाबत निवेदन, रोजंदारी नोकर भरती, वीजपुरवठा, कृषी पंप वीज जोडणी, पीक विमा लाभ, वनहक्क पट्टे, आदी विषयांवरील निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या सगळ्या निवेदनांवर संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, शेतकऱ्यांच्या धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडविण्यात येतील. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून मक्याची शेती केली तर नक्कीच फायदा होईल, असे सांगितले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी, आपला जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उषा चौधरी यांनी मांडले. आभार तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला अर्जुनी-मोरगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

धान खरेदीबाबतच सर्वाधिक निवेदन

यावेळी धान खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात निवेदन प्राप्त झाले. धान उत्पादक शेतकऱ्यांचा सगळा धान खरेदी

करण्यात येईल. कोणाचेही धान शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. धान भरडाई बाबत

लवकरच मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.