शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

सन्मानाने बोलावले अन्‌ गेटवर रोखले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST

गोंदिया : जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांना पत्रपरिषदेसाठी बुधवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, कार्यालयाच्या मुख्य ...

गोंदिया : जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांना पत्रपरिषदेसाठी बुधवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावर पोलिसांनी चक्क सर्वच पत्रकारांना अडविले. त्यामुळे सन्मानाने बोलावतात आणि गेटमध्येच रोखून पत्रकारांचा अपमान करण्यात आल्याने गृहमंत्र्यांच्या पत्रपरिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला. जिल्हाधिकाऱ्यांची माध्यम प्रतिनिधींना दिलेली अपमानजनक वागणूक व निष्क्रिय भूमिका दिसली. परंतु, याची दखल घेत पत्रकारांना भेटण्याचे सौजन्य गृहमंत्र्यांनीही दाखविले नाही.

जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर बुधवारी दुपारी १.३० वाजता विविध विकासासंदर्भात माहिती देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती. त्यानुसार जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी पत्रकारांना आमंत्रित केले होते. तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशासंदर्भात कुठलीही सूचना नसल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी सर्वांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. जिल्हा नियोजन समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारच जिल्हा माहिती अधिकारी सभेतील विकासासंदर्भातील माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रपरिषदेचे आयोजन करतात. परंतु, जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली नाही, असे बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी पत्रकारांना सांगून गेटवरच अडविले. गेटवर तैनात असलेल्या पोलिसांचेही कृत्य तेथे उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अपमानजनक होते. त्यामुळे पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या पत्रपरिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनात असमन्वयाची बाब पालकमंत्र्यांना कळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री आपल्या ताफ्यातील वाहनातून निघून गेले.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून पत्रपरिषदेसाठी येण्याची विनंती केली. परंतु, अडवणूक करून झालेला अपमान हा लोकप्रतिनिधींच्या नाते प्रशासनातील असमन्वयाची बाब पालकमंत्र्यांपुढे मांडावी, अशी भावना माध्यमांच्या प्रतिनिधींची होती. राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे महत्त्व त्यांना कळू नये, ही बाब लाेकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अनादर करणारीच ठरत आहे.