शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानाने बोलावले अन्‌ गेटवर रोखले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST

गोंदिया : जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांना पत्रपरिषदेसाठी बुधवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, कार्यालयाच्या मुख्य ...

गोंदिया : जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांना पत्रपरिषदेसाठी बुधवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावर पोलिसांनी चक्क सर्वच पत्रकारांना अडविले. त्यामुळे सन्मानाने बोलावतात आणि गेटमध्येच रोखून पत्रकारांचा अपमान करण्यात आल्याने गृहमंत्र्यांच्या पत्रपरिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला. जिल्हाधिकाऱ्यांची माध्यम प्रतिनिधींना दिलेली अपमानजनक वागणूक व निष्क्रिय भूमिका दिसली. परंतु, याची दखल घेत पत्रकारांना भेटण्याचे सौजन्य गृहमंत्र्यांनीही दाखविले नाही.

जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर बुधवारी दुपारी १.३० वाजता विविध विकासासंदर्भात माहिती देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती. त्यानुसार जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी पत्रकारांना आमंत्रित केले होते. तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशासंदर्भात कुठलीही सूचना नसल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी सर्वांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. जिल्हा नियोजन समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारच जिल्हा माहिती अधिकारी सभेतील विकासासंदर्भातील माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रपरिषदेचे आयोजन करतात. परंतु, जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली नाही, असे बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी पत्रकारांना सांगून गेटवरच अडविले. गेटवर तैनात असलेल्या पोलिसांचेही कृत्य तेथे उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अपमानजनक होते. त्यामुळे पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या पत्रपरिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनात असमन्वयाची बाब पालकमंत्र्यांना कळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री आपल्या ताफ्यातील वाहनातून निघून गेले.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून पत्रपरिषदेसाठी येण्याची विनंती केली. परंतु, अडवणूक करून झालेला अपमान हा लोकप्रतिनिधींच्या नाते प्रशासनातील असमन्वयाची बाब पालकमंत्र्यांपुढे मांडावी, अशी भावना माध्यमांच्या प्रतिनिधींची होती. राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे महत्त्व त्यांना कळू नये, ही बाब लाेकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अनादर करणारीच ठरत आहे.