शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकरीविरोधी तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST

गोंदिया : शेतकरीविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी शेतकरी मागील १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनांची ...

गोंदिया : शेतकरीविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी शेतकरी मागील १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनांची अद्यापही केंद्र सरकारने दखल न घेतल्याने आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरीविरोधी हे तिन्ही काळे कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन त्वरित सकारात्मक हस्तक्षेप करावा, शेतमालाला हमीभाव देणारा कायदा मंजूर करण्यात यावा, नवीन वीज कायदा प्रस्तावित करू नये, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी सक्षम उपाययोजना करण्यात यावी, केंद्रीय कृषी मूल्य आयोगांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता देण्यात यावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर दीडपट हमीभाव देण्यात यावा, दूध - भाजीपाला - फळे यांच्या किमान आधारभूत किमती निश्चित कराव्यात, शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ त्वरित थांबविण्यात यावी, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, पेट्रोल - डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात याव्यात, बहुजन विरोधी नवीन शैक्षणिक धोरण त्वरित रद्द करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात अतुल सतदेवे, पौर्णिमा नागदेवे, योगेश रामटेके, कैलाश भेलावे, बबलु कटरे, सुनील तरोणे, क्रांती ब्राम्हणकर, डॉ. एन. डी. किरसान, अफजल सिंह, किरण वासनिक, शिव नागपूरे, सुनील भोगांडे, रवी भांडारकर, वसंत गवळी, तिलक दीप, डी. एस. मेश्राम, पुरुषोत्तम मोदी, अबरार सिद्दिकी, सुरेंद्र सोनवाने यांचा समावेश आहे.