शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भूस्खलन झालेल्या विहिरीच्या डागडुजीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:54 IST

तालुक्यात सोमवारी (दि.२०) झालेल्या अतिवृष्टीमुळे मालकनपूर येथील सार्वजनिक विहिरी खचली. त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला असून तो बुजविण्यासाठी खर्च कुठून आणि कुणी करायचा असा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमालकनपूर येथील घटना : तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्याने केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात सोमवारी (दि.२०) झालेल्या अतिवृष्टीमुळे मालकनपूर येथील सार्वजनिक विहिरी खचली. त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला असून तो बुजविण्यासाठी खर्च कुठून आणि कुणी करायचा असा पेच निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे विहिरीची तोंडी खचली की भुस्खलनाचा प्रकार आहे. गावातील जमीन कशी आहे. याचा शोध घेण्यासाठी भूवैज्ञानिक विभागाशी तहसीलदार धनंजय देशमुख यांनी संपर्क साधल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार सोमवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. चार तासात १०३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. या अतिवृषटीमध्येच गावातील सार्वजनिक विहिरी खचली. तोंडी खचून वरचा सिमेंटचा भाग या विहिरीत गेला. ही विहीर सुमारे ६० फूट खोल होती. विहिरीचा वरील भाग खचून विहिरीत गेला. त्यामुळे त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला. विहिरीपासून अगदी जवळच गोवारी शहीद स्मारक आहे. अगदी ५ फूट अंतरावर एक मोठे झाड व त्याला लागूनच हेमराज पांडुरंग मेश्राम यांचे घर आहे. केवळ विहिरी पूरतीच जागा नव्हे तर आजूबाजूची जागा सुद्धा खचत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुन्हा दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळ मोठा पाऊस झाला तर आजूबाजूची जागा खचून गोवारी शहीद स्मारक व मेश्राम यांच्या घराला धोका पोहोचू शकतो. ग्रामपंचायतने विहिरीकडे कुणी जाऊ नये यासाठी विहिरीच्या सभोवताल दोरखंड बांधून अडवणूक केली आहे. मात्र केवळ एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही.माहुरकुडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल हे घटनेच्या दिवशीपासूनच गावकऱ्यांच्या संर्पकात आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि.२३) त्यांनी तहसीलदार धनंजय देशमुख यांची भेट घेवून संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात काय? यावर चर्चा केली. तहसीलदारांनी यासाठी खर्च कुठून करायचा असा प्रश्न केला. त्यांनी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी यासंदर्भात चर्चा केली. मात्र कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले. ग्रामपंचायतकडेही दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता नसल्याचे सांगितले. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.भूवैैज्ञानिक विभागाला पाठविले फोटोतहसीलदार देशमुख व जि.प.सदस्य पालीवाल यांनी गुरुवारी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते. त्यांनी गावकºयांशी चर्चा केली. याच प्रकारे गावातील जमीन सुद्धा भुसभुशीत झाली आहे काय? ही बाब जाणून घेण्यासाठी भूवैज्ञानिक कार्यालयाशी त्यांनी संपर्क केला. त्यांना घटनास्थळाचे छायाचित्र पाठविले.त्वरित उपाययोजना कराजिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास संकट उद्भवण्याची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून विहिरीचा खड्डा तातडीने बुजवावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. या परिसराला ताराचे कुंपण करण्याचे निर्देश तहसीलदारांनी ग्रामसेवकाला दिले आहेत.

टॅग्स :Rainपाऊस