शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भूस्खलन झालेल्या विहिरीच्या डागडुजीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:54 IST

तालुक्यात सोमवारी (दि.२०) झालेल्या अतिवृष्टीमुळे मालकनपूर येथील सार्वजनिक विहिरी खचली. त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला असून तो बुजविण्यासाठी खर्च कुठून आणि कुणी करायचा असा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमालकनपूर येथील घटना : तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्याने केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात सोमवारी (दि.२०) झालेल्या अतिवृष्टीमुळे मालकनपूर येथील सार्वजनिक विहिरी खचली. त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला असून तो बुजविण्यासाठी खर्च कुठून आणि कुणी करायचा असा पेच निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे विहिरीची तोंडी खचली की भुस्खलनाचा प्रकार आहे. गावातील जमीन कशी आहे. याचा शोध घेण्यासाठी भूवैज्ञानिक विभागाशी तहसीलदार धनंजय देशमुख यांनी संपर्क साधल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार सोमवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. चार तासात १०३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. या अतिवृषटीमध्येच गावातील सार्वजनिक विहिरी खचली. तोंडी खचून वरचा सिमेंटचा भाग या विहिरीत गेला. ही विहीर सुमारे ६० फूट खोल होती. विहिरीचा वरील भाग खचून विहिरीत गेला. त्यामुळे त्याठिकाणी मोठा खोल खड्डा पडला. विहिरीपासून अगदी जवळच गोवारी शहीद स्मारक आहे. अगदी ५ फूट अंतरावर एक मोठे झाड व त्याला लागूनच हेमराज पांडुरंग मेश्राम यांचे घर आहे. केवळ विहिरी पूरतीच जागा नव्हे तर आजूबाजूची जागा सुद्धा खचत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुन्हा दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळ मोठा पाऊस झाला तर आजूबाजूची जागा खचून गोवारी शहीद स्मारक व मेश्राम यांच्या घराला धोका पोहोचू शकतो. ग्रामपंचायतने विहिरीकडे कुणी जाऊ नये यासाठी विहिरीच्या सभोवताल दोरखंड बांधून अडवणूक केली आहे. मात्र केवळ एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही.माहुरकुडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल हे घटनेच्या दिवशीपासूनच गावकऱ्यांच्या संर्पकात आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि.२३) त्यांनी तहसीलदार धनंजय देशमुख यांची भेट घेवून संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात काय? यावर चर्चा केली. तहसीलदारांनी यासाठी खर्च कुठून करायचा असा प्रश्न केला. त्यांनी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी यासंदर्भात चर्चा केली. मात्र कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले. ग्रामपंचायतकडेही दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता नसल्याचे सांगितले. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.भूवैैज्ञानिक विभागाला पाठविले फोटोतहसीलदार देशमुख व जि.प.सदस्य पालीवाल यांनी गुरुवारी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते. त्यांनी गावकºयांशी चर्चा केली. याच प्रकारे गावातील जमीन सुद्धा भुसभुशीत झाली आहे काय? ही बाब जाणून घेण्यासाठी भूवैज्ञानिक कार्यालयाशी त्यांनी संपर्क केला. त्यांना घटनास्थळाचे छायाचित्र पाठविले.त्वरित उपाययोजना कराजिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास संकट उद्भवण्याची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून विहिरीचा खड्डा तातडीने बुजवावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. या परिसराला ताराचे कुंपण करण्याचे निर्देश तहसीलदारांनी ग्रामसेवकाला दिले आहेत.

टॅग्स :Rainपाऊस